शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, १ तासांत सर्व GR काढा, मग अंतिम निर्णय सांगतो: मनोज जरांगे पाटील
3
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
4
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
5
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
6
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
7
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
8
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
9
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
10
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
11
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
12
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
13
नाशिकच्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील फरार दोघांना बेड्या, पोलीस माजी नगरसेवक निमसेच्या मागावर
14
भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल
15
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
16
'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले
17
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
18
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
19
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
20
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!

‘इर्विन’मध्ये रक्त गोठलेलेच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 23:16 IST

जिल्ह्यातील रूग्णसेवेचा डोलारा सांभाळणाऱ्या जिल्हा सामान्य रूग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. ‘इर्विन’मध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांना वेळीच रक्त मिळत नसल्याने त्यांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या जात आहेत.

ठळक मुद्देरक्तदान शिबिराचे आयोजन मंदावले : रूग्णांना वेळेवर रक्ताचा पुरवठा नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील रूग्णसेवेचा डोलारा सांभाळणाऱ्या जिल्हा सामान्य रूग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. ‘इर्विन’मध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांना वेळीच रक्त मिळत नसल्याने त्यांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या जात आहेत. याचा सर्वाधिक फटका गरीब, सामान्य रूग्णांना बसत आहे.जिल्हा सामान्य रूग्णालय, जिल्हा स्त्री रूग्णालय, विभागीय संदर्भ सेवा रूग्णालयासह उपजिल्हा रूग्णालय, तालुका ग्रामीण रूग्णालय येथील रूग्णांना रक्त हवे असल्यास ‘इर्विन’ मध्ये धाव घ्यावी लागते. हल्ली उन्हाळ्यामुळे रक्तपेढीत रक्तसाठा कमी असून मागणी वाढली आहे. ग्रामीण भागातून ‘इर्विन’मध्ये दरदिवसाला शेकडो रूग्ण उपचारासाठी दाखल होतात. बरेचदा रूग्णांवर शस्त्रक्रियेसाठी आवश्यक रक्तपुरवठा होत नसल्याने अशा रूग्णावर चार ते पाच दिवसांनी रक्त पुरवठा झाल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा प्रसंग वैद्यकीय यंत्रणेवर आला आहे. त्यामुळे रूग्णांचे हाल होत आहे. ‘इर्विन’मध्ये दरदिवशी २० ते २५ रक्ताच्या पिशव्या लागतात. मात्र, शाळा व महाविद्यालयांना एप्रिल ते जूनपर्यंत सुट्या असल्यामुळे रक्तदान शिबिरांचे आयोजन मंदावरणार आहे. शासकीय रूग्णालयांना रक्तासाठी ‘इर्विन’वर अवलंबून रहावे लागते. परंतु, त्यातुलनेत रक्तदानासाठी नागरिक समोर येत नाही. एप्रिलमध्येच ‘इर्विन’ची रक्तपेढी गोठली असून, मे महिन्यात याची तीव्रता अधिक जाणवेल, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.खासगी रक्तपेढीत रक्ताची वानवाशासकीय रूग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असताना खासगी रक्तपेढींचीसुद्धा हीच स्थिती आहे. येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाची रक्तपेढी, बालाजी ब्लड बँक, डॉ. हेडगेवार रक्तपेढी, बडनेरा येथील संत गाडगेबाबा रक्तपेढी व अचलपूर, वरूड आदी ठिकाणच्या खासगी रक्तपेढीत रक्ताची वानवा असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.मागणीच्या तुलनेत पुरवठा कमीसध्या रूग्णांना हवे तेवढे रक्त मिळणे कठीण झाले आहे. उन्हाळ्याच्या सुटीत रक्तदान शिबिरांना अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे रक्ताच्या बाटल्या कमी उपलब्ध होत आहे. रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशाप्रसंगी रक्तदात्यांनी पुढे यावे, असे आवाहन वैद्यकीय यंत्रणांनी केले आहे.उन्हाळ्यामुळे रक्तदान शिबिरांचे आयोजन मंदावले आहे. त्यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत असून, सामाजिक संघटना, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रूग्णसेवेत सहकार्य करावे.- श्यामसुंदर निकम,शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रूग्णालय