शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

इर्विनचा मेळघाट सेल कुचकामी

By admin | Updated: January 31, 2015 23:12 IST

इर्विनमधील दाखल झालेल्या चिखलदरा येथील आदिवासी रुग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला होता. मृतदेह गावी नेण्यासाठी नातेवाईकांनी पायपीट केल्यावर तब्बल दोन तासांनी मृतदेह गावी नेला.

अमरावती : इर्विनमधील दाखल झालेल्या चिखलदरा येथील आदिवासी रुग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला होता. मृतदेह गावी नेण्यासाठी नातेवाईकांनी पायपीट केल्यावर तब्बल दोन तासांनी मृतदेह गावी नेला. त्यामुळे आदिवासी रुग्णांना आरोग्य सेवेबाबत मेळघाट सेलमधील कर्मचारी हलगर्जीपणा करीत असल्याचे आढळून आले आहे. आदिवासी नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात मेळघाट सेलची स्थापन करण्यात आली आहे. त्याकरिता मेळघाट सेलमध्ये ६ कर्मचारी सज्ज आहेत. हे कर्मचारी दोन पाळीत काम करीत असून अनेकदा मेळघाट सेलच्या कक्षात एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचे आढळून आले आहे. आदिवासी नागरिकांची भाषा समजावी याकरिता कोरकू समाजातील काही जणांची मेळघाट सेलमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र वेळेवरच कर्मचारी उपस्थित नसल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. चिखलदरा येथील रहिवासी रामलीला संजू दहीकर (३२, रा. गिरगुटी) या महिलेल्या ७५ टक्के भाजलेल्या अवस्थेत दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. इर्विनमध्ये मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यावर तब्बल दोन तास मृतदेह शवविच्छेदनगृहात पडलेला होता. मात्र मृताच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी तेथे कोणीही उपस्थित नव्हते. अखेर काही रुग्णवाहिका चालकांनी सामाजिक बांधिलकी दर्शवून त्या आदिवासी नागरिकांना सहकार्य केले. मृतदेह गावी नेण्यासाठी नातेवाईकांजवळ पैसे सुध्दा नव्हते, त्यामुळे काही जणांनी जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत यांच्याशी मोबाईलवर संपर्क केला. त्यावेळी रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली. आदिवासींना आरोग्य सुविधा पुरविण्यात मेळघाट सेलची अनास्था दिसून येत आहे. गोरगरीब आदिवासीसाठी शासनाकडून सुविधा देण्यात येते मात्र इर्विनच्या मेळघाट सेलमध्ये कर्मचारी कामात हलगर्जीपणा करीत असल्याचे आढळून येत आहे. (प्रतिनिधी)