शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

इर्विनचा मेळघाट सेल कुचकामी

By admin | Updated: January 31, 2015 23:12 IST

इर्विनमधील दाखल झालेल्या चिखलदरा येथील आदिवासी रुग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला होता. मृतदेह गावी नेण्यासाठी नातेवाईकांनी पायपीट केल्यावर तब्बल दोन तासांनी मृतदेह गावी नेला.

अमरावती : इर्विनमधील दाखल झालेल्या चिखलदरा येथील आदिवासी रुग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला होता. मृतदेह गावी नेण्यासाठी नातेवाईकांनी पायपीट केल्यावर तब्बल दोन तासांनी मृतदेह गावी नेला. त्यामुळे आदिवासी रुग्णांना आरोग्य सेवेबाबत मेळघाट सेलमधील कर्मचारी हलगर्जीपणा करीत असल्याचे आढळून आले आहे. आदिवासी नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात मेळघाट सेलची स्थापन करण्यात आली आहे. त्याकरिता मेळघाट सेलमध्ये ६ कर्मचारी सज्ज आहेत. हे कर्मचारी दोन पाळीत काम करीत असून अनेकदा मेळघाट सेलच्या कक्षात एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचे आढळून आले आहे. आदिवासी नागरिकांची भाषा समजावी याकरिता कोरकू समाजातील काही जणांची मेळघाट सेलमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र वेळेवरच कर्मचारी उपस्थित नसल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. चिखलदरा येथील रहिवासी रामलीला संजू दहीकर (३२, रा. गिरगुटी) या महिलेल्या ७५ टक्के भाजलेल्या अवस्थेत दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. इर्विनमध्ये मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यावर तब्बल दोन तास मृतदेह शवविच्छेदनगृहात पडलेला होता. मात्र मृताच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी तेथे कोणीही उपस्थित नव्हते. अखेर काही रुग्णवाहिका चालकांनी सामाजिक बांधिलकी दर्शवून त्या आदिवासी नागरिकांना सहकार्य केले. मृतदेह गावी नेण्यासाठी नातेवाईकांजवळ पैसे सुध्दा नव्हते, त्यामुळे काही जणांनी जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत यांच्याशी मोबाईलवर संपर्क केला. त्यावेळी रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली. आदिवासींना आरोग्य सुविधा पुरविण्यात मेळघाट सेलची अनास्था दिसून येत आहे. गोरगरीब आदिवासीसाठी शासनाकडून सुविधा देण्यात येते मात्र इर्विनच्या मेळघाट सेलमध्ये कर्मचारी कामात हलगर्जीपणा करीत असल्याचे आढळून येत आहे. (प्रतिनिधी)