शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

मृतांचा मेमो पोलिसांना देण्यास इर्विनच्या कर्मचाऱ्यांची हयगय

By admin | Updated: October 14, 2014 23:11 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्या माहितीचा मेमो पोलिसांपर्यंत पोहचविणे कर्मचाऱ्यांना आवश्यक असते. मात्र मेमो वेळेवर पोहचविण्यात कर्मचारी हयगय करतात.

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्या माहितीचा मेमो पोलिसांपर्यंत पोहचविणे कर्मचाऱ्यांना आवश्यक असते. मात्र मेमो वेळेवर पोहचविण्यात कर्मचारी हयगय करतात. अशाच घटनेत सोमवारी सायंकाळी एका महिलेच्या मृत्यूचा मेमो मंगळवारी सकाळी पोलिसांपर्यंत पोहचविण्यात आला. त्यामुळे मृताच्या नातेवाईकांना मृतदेह ताब्यात घेताना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाभरातील रुग्णांना आरोग्य सेवा पुरविली जाते. गोरगरीब नागरिक पैशा अभावी रुग्णालयात उपचाराकरिता येतात. मात्र योग्य आरोग्य सेवा पुरविण्यात रुग्णालयीन व्यवस्था अपुरी पडत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक वेळा नागरिकांनी व्यवस्था सुधारण्याचे प्रयत्नदेखील केले आहे. मात्र तात्पूरती व्यवस्था करुन प्रशासकीय अधिकारी रुग्णालयीन व्यवस्थेकडे दुर्लक्ष करीत आहेत. दररोज शेकडो रुग्ण विविध आजारांवर उपचार करण्याकरिता रुग्णालयात येतात. त्यामधील बहुतांश रुग्ण रुग्णालयात दाखलसुध्दा होतात. मात्र एखाद्या रुग्णांला डिस्चार्ज ध्यायचा असल्यास अथवा त्या रुग्णांचा मृत्यू झाल्यास पुढील प्रक्रिया करण्यात कर्मचारी हयगय करताना आढळुन येत आहे. नुकताच इर्विनच्या अतिदक्षता कक्षामध्ये शिला महादेव भुयार (४०, रा. बेलज) या महिलेला सर्पदंश झाल्याने दाखल करण्यात आले होते. मात्र शिला भुयार यांचा उपचारदरम्यान सोमवारी सायकांळी मृत्यू झाला. मृत्यूची माहिती पोलीसांना देणे अनिवार्य आहे. मात्र तरिसुध्दा आयसीयूमधील कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणाचा कळस गाठून शीला यांच्या मृत्यूचा मेमो मंगळवारी सकाळी १०.१० मिनिटांनी पोलिसांना दिला आहे. सोमवारी सायकांळपासून शीला यांचा मृतदेह रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात पडून होता. मंगळवारी सकाळी पोलिसांना उशिरा मेमो मिळाल्याने मृताच्या नातेवाईकांनी पोलिसांवरच रोष व्यक्त केला. त्यामुळे शवविच्छेदन करण्याच्या प्रक्रियेला उशीर लागला आहे. मेमो पोलिसांपर्यंत पोहचविण्यात उशीर झाल्याने मृतांच्या नातेवाईकांना शीला यांचे पार्थीव ताब्यात घेण्याकरिता उशीर झाला आहे. याकडे इर्विनची प्रशासकीय यंत्रणा दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक व पोलीस यंत्रणा इर्विनच्या कारभाराने त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)