शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

मृतांचा मेमो पोलिसांना देण्यास इर्विनच्या कर्मचाऱ्यांची हयगय

By admin | Updated: October 14, 2014 23:11 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्या माहितीचा मेमो पोलिसांपर्यंत पोहचविणे कर्मचाऱ्यांना आवश्यक असते. मात्र मेमो वेळेवर पोहचविण्यात कर्मचारी हयगय करतात.

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्या माहितीचा मेमो पोलिसांपर्यंत पोहचविणे कर्मचाऱ्यांना आवश्यक असते. मात्र मेमो वेळेवर पोहचविण्यात कर्मचारी हयगय करतात. अशाच घटनेत सोमवारी सायंकाळी एका महिलेच्या मृत्यूचा मेमो मंगळवारी सकाळी पोलिसांपर्यंत पोहचविण्यात आला. त्यामुळे मृताच्या नातेवाईकांना मृतदेह ताब्यात घेताना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाभरातील रुग्णांना आरोग्य सेवा पुरविली जाते. गोरगरीब नागरिक पैशा अभावी रुग्णालयात उपचाराकरिता येतात. मात्र योग्य आरोग्य सेवा पुरविण्यात रुग्णालयीन व्यवस्था अपुरी पडत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक वेळा नागरिकांनी व्यवस्था सुधारण्याचे प्रयत्नदेखील केले आहे. मात्र तात्पूरती व्यवस्था करुन प्रशासकीय अधिकारी रुग्णालयीन व्यवस्थेकडे दुर्लक्ष करीत आहेत. दररोज शेकडो रुग्ण विविध आजारांवर उपचार करण्याकरिता रुग्णालयात येतात. त्यामधील बहुतांश रुग्ण रुग्णालयात दाखलसुध्दा होतात. मात्र एखाद्या रुग्णांला डिस्चार्ज ध्यायचा असल्यास अथवा त्या रुग्णांचा मृत्यू झाल्यास पुढील प्रक्रिया करण्यात कर्मचारी हयगय करताना आढळुन येत आहे. नुकताच इर्विनच्या अतिदक्षता कक्षामध्ये शिला महादेव भुयार (४०, रा. बेलज) या महिलेला सर्पदंश झाल्याने दाखल करण्यात आले होते. मात्र शिला भुयार यांचा उपचारदरम्यान सोमवारी सायकांळी मृत्यू झाला. मृत्यूची माहिती पोलीसांना देणे अनिवार्य आहे. मात्र तरिसुध्दा आयसीयूमधील कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणाचा कळस गाठून शीला यांच्या मृत्यूचा मेमो मंगळवारी सकाळी १०.१० मिनिटांनी पोलिसांना दिला आहे. सोमवारी सायकांळपासून शीला यांचा मृतदेह रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात पडून होता. मंगळवारी सकाळी पोलिसांना उशिरा मेमो मिळाल्याने मृताच्या नातेवाईकांनी पोलिसांवरच रोष व्यक्त केला. त्यामुळे शवविच्छेदन करण्याच्या प्रक्रियेला उशीर लागला आहे. मेमो पोलिसांपर्यंत पोहचविण्यात उशीर झाल्याने मृतांच्या नातेवाईकांना शीला यांचे पार्थीव ताब्यात घेण्याकरिता उशीर झाला आहे. याकडे इर्विनची प्रशासकीय यंत्रणा दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक व पोलीस यंत्रणा इर्विनच्या कारभाराने त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)