शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

सिंचन विभागाचा शेतकऱ्यांप्रति दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:12 IST

धरणात पाण्याचा साठा मुबलक : गहू पेरणीसाठी मात्र पाणी नाही अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना, ...

धरणात पाण्याचा साठा मुबलक : गहू पेरणीसाठी मात्र पाणी नाही

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना, शेतकऱ्यांना गहू पेरणीच्या हंगामात पाणी देण्यात आले नाही. त्यामुळे सिंचन विभाग शेतकऱ्यांप्रति दुजाभाव करीत असल्याचा आरोप होत आहे.

यंदा सुरुवातीला उडीद, मूग ही पिके हातची निघून गेली. त्यानंतर सोयाबीनवर नांगर फिरवावा लागला. कपाशीवर बोंडअळी व बोंडसडचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे उरलीसुरली आशादेखील मावळली. यानंतर शेतकरी रबी हंगामातील गहू व हरभरा पेरणीकडे वळला. मात्र, यंदा डिसेंबरची सुरुवात झाली असताना शहानूर धरणातून गव्हासाठी पाणी देण्यात आलेले नाही. धरण १०० टक्के भरले असताना शेतकऱ्यांसाठी सिंचन विभागाकडून आजपर्यंत कोणतीही तरतूद केली नसल्यामुळे व कालव्याची कोणतीही दुरुस्ती केली नसल्यामुळे शेतकरी वर्गात सिंचन विभागविषयी तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. गहू पेरणीचा हंगाम संपत असताना सिंचन विभागाकडून अद्याप कोणतीही तरतूद केली गेली नाही. त्यामुळे या भागातील बहुतांश शेतकरी हे यंदा गहू पेरणीपासून वंचित राहण्याची भीती शेतकरी दिलीप भोपळे यांनी व्यक्त केली.

---------------