शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

पश्चिम विदर्भात १ लाख ६० हजार हेक्टर सिंचन अनुशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:13 IST

अमरावती/ संदीप मानकर अनुशेष निर्मूलन कार्यक्रमात समाविष्ट तीन मोठे, नऊ मध्यम व ९० लघु प्रकल्पांतून जून २०२० अखेर १ ...

अमरावती/ संदीप मानकर

अनुशेष निर्मूलन कार्यक्रमात समाविष्ट तीन मोठे, नऊ मध्यम व ९० लघु प्रकल्पांतून जून २०२० अखेर १ लाख ६० हजार ७६ हेक्टरचा रबी समतुल्य भौतिक अनुशेष असल्याची बाब जलसंपदा विभागाच्या अहवालातून समोर आली आहे.

शासनाने जेव्हा पश्चिम विदर्भामध्ये सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याकरिता अनुशेष निर्मूलन आरखडा तयार केला तेव्हा जून २०१२ अखेर २ लाख ३४ हजार ०१ हेक्टरचा रबी समतुल्य भौतिक अनुशेष शिल्लक होता. जून २०२० अखेर एक मोठा व ५४ लघु प्रकल्प पूर्ण झाले. जून २०१२ ते जून २०२० पर्यंत नऊ वर्षांत कार्यक्रमात समाविष्ट १०२ प्रकल्पांतून ७३,२५३ हेक्टर रबी समतुल्य अनुशेष दूर झाला. उर्वरित कार्यक्रमातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी जून २०२५ पर्यंत पूर्ण प्रतीक्षा करावी लागणार आहे, असे मत होणार असल्याचे विश्वास जलसंपदा विभागाच्या तज्ज्ञांचे व्यक्त केला आहे.

बॉक्स

२३,६२४ कोटी प्रकल्पाची अद्ययावत किंमत

सदर प्रकल्पातून पश्चिम विदर्भातील सिंचनाचा बॅकलॉग भरून निघणार आहे. त्याकरिता १०२ प्रकल्प सिंचन निर्मूलन कार्यक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आले होते. या प्रकल्पाची अद्ययावत किंमत ही २०१९-२० मध्ये २३ हजार ६२६ कोटी झाली झाली आहे. मार्च २०२० अखेर सदर प्रकल्पावर १४,८२३ कोटींचा खर्च झाला आहे. १ एप्रिल २०२० पर्यंत उर्वरित रक्कम ही ८८०१ कोटी एवढी आहे.

बॉक्स :

जून २०२१ पर्यंत २१,८४२ हेक्टरचे सिंचन निर्मितीचे उद्दिष्ट

सदर सिंचन निर्मूलन कार्यक्रमांतर्गत अमरावती, अकोला, वाशिम व बुलडाणा येथील २६ प्रकल्पांतून सूक्ष्म नियोजनासाठी घेण्यात आले आहे. यामध्ये २२ प्रकल्पांतून २१,८४२ हेक्टरचे सिंचन क्षमता निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. १६ प्रकल्प हे पूर्णत्वाचे उद्दिष्ट असून, १० प्रकल्प हे अंशत: पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जलसंपदा विभागाने नियोजन केले आहे. १४ प्रकल्पांतून ११०.२३ दलघमी पाणीसाठ्याचे उद्दिष्ट आहे.

बॉक्स

असा होत गेला विलंब

सुरुवातीला २०१२ मध्ये सिंचन निर्मूलनाचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला होता तेव्हा २०१५ पर्यंत सिंचनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, ते वेळीच पूर्ण न झाल्याने त्यानंतर २०१८, नंतर २०२०, त्यापुढे २०२२ व आता २०२५ पर्यंत नियोजन करण्यात आले आहे.

बॉक्स:

ही आहेत प्रकल्प रखडल्याची कारणे

वेळीत भूसंपादन, पुनर्वसन, वनविभागाची व पर्यावरणाची मान्यता, सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) निधीचा विलंब अशा अनेक कारणांमुळे प्रकल्प रखडले. त्यामुळे सिंचन अनुशेष दूर झाला नाही.

कोट

जून २०२१ पर्यंत २६ प्रकल्पांतून २१ हजार हेक्टर सिंचन निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी मदत होईल.

- आशिष देवगडे, मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प), अमरावती