शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पश्चिम विदर्भात १ लाख ६० हजार हेक्टर सिंचन अनुशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:13 IST

अमरावती/ संदीप मानकर अनुशेष निर्मूलन कार्यक्रमात समाविष्ट तीन मोठे, नऊ मध्यम व ९० लघु प्रकल्पांतून जून २०२० अखेर १ ...

अमरावती/ संदीप मानकर

अनुशेष निर्मूलन कार्यक्रमात समाविष्ट तीन मोठे, नऊ मध्यम व ९० लघु प्रकल्पांतून जून २०२० अखेर १ लाख ६० हजार ७६ हेक्टरचा रबी समतुल्य भौतिक अनुशेष असल्याची बाब जलसंपदा विभागाच्या अहवालातून समोर आली आहे.

शासनाने जेव्हा पश्चिम विदर्भामध्ये सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याकरिता अनुशेष निर्मूलन आरखडा तयार केला तेव्हा जून २०१२ अखेर २ लाख ३४ हजार ०१ हेक्टरचा रबी समतुल्य भौतिक अनुशेष शिल्लक होता. जून २०२० अखेर एक मोठा व ५४ लघु प्रकल्प पूर्ण झाले. जून २०१२ ते जून २०२० पर्यंत नऊ वर्षांत कार्यक्रमात समाविष्ट १०२ प्रकल्पांतून ७३,२५३ हेक्टर रबी समतुल्य अनुशेष दूर झाला. उर्वरित कार्यक्रमातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी जून २०२५ पर्यंत पूर्ण प्रतीक्षा करावी लागणार आहे, असे मत होणार असल्याचे विश्वास जलसंपदा विभागाच्या तज्ज्ञांचे व्यक्त केला आहे.

बॉक्स

२३,६२४ कोटी प्रकल्पाची अद्ययावत किंमत

सदर प्रकल्पातून पश्चिम विदर्भातील सिंचनाचा बॅकलॉग भरून निघणार आहे. त्याकरिता १०२ प्रकल्प सिंचन निर्मूलन कार्यक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आले होते. या प्रकल्पाची अद्ययावत किंमत ही २०१९-२० मध्ये २३ हजार ६२६ कोटी झाली झाली आहे. मार्च २०२० अखेर सदर प्रकल्पावर १४,८२३ कोटींचा खर्च झाला आहे. १ एप्रिल २०२० पर्यंत उर्वरित रक्कम ही ८८०१ कोटी एवढी आहे.

बॉक्स :

जून २०२१ पर्यंत २१,८४२ हेक्टरचे सिंचन निर्मितीचे उद्दिष्ट

सदर सिंचन निर्मूलन कार्यक्रमांतर्गत अमरावती, अकोला, वाशिम व बुलडाणा येथील २६ प्रकल्पांतून सूक्ष्म नियोजनासाठी घेण्यात आले आहे. यामध्ये २२ प्रकल्पांतून २१,८४२ हेक्टरचे सिंचन क्षमता निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. १६ प्रकल्प हे पूर्णत्वाचे उद्दिष्ट असून, १० प्रकल्प हे अंशत: पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जलसंपदा विभागाने नियोजन केले आहे. १४ प्रकल्पांतून ११०.२३ दलघमी पाणीसाठ्याचे उद्दिष्ट आहे.

बॉक्स

असा होत गेला विलंब

सुरुवातीला २०१२ मध्ये सिंचन निर्मूलनाचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला होता तेव्हा २०१५ पर्यंत सिंचनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, ते वेळीच पूर्ण न झाल्याने त्यानंतर २०१८, नंतर २०२०, त्यापुढे २०२२ व आता २०२५ पर्यंत नियोजन करण्यात आले आहे.

बॉक्स:

ही आहेत प्रकल्प रखडल्याची कारणे

वेळीत भूसंपादन, पुनर्वसन, वनविभागाची व पर्यावरणाची मान्यता, सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) निधीचा विलंब अशा अनेक कारणांमुळे प्रकल्प रखडले. त्यामुळे सिंचन अनुशेष दूर झाला नाही.

कोट

जून २०२१ पर्यंत २६ प्रकल्पांतून २१ हजार हेक्टर सिंचन निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी मदत होईल.

- आशिष देवगडे, मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प), अमरावती