शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य पाईपलाईनमधून दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:10 IST

अंजनगाव सुर्जी व अचलपूर तालुक्याच्या सीमेवरील शहानूर धरणातून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो.

जीवन प्राधिकरणचे अक्षम्य दुर्लक्ष : नागरिकांच्या आरोेग्याशी खेळलोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी व अचलपूर तालुक्याच्या सीमेवरील शहानूर धरणातून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, आठ वर्षांपूर्वी टाकलेल्या पाईपलाईनच्या कामात भ्रष्टाचार झाल्याने सद्यस्थितीत या पाईपलाईनमधून ७९ गावांना पाणी पुरवठा केला जातो. या सर्वच गावांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. शहानूर धरण हे दर्यापूर-अंजनगाव सुर्जीसाठी वरदान ठरले आहे. अंजनगाव व सुर्जी हे जुळे शहर व ७९ खेडी, तर दर्यापूर शहर व १७९ खेड्यांमध्ये शहानूरमधून पाणीपुरवठा केला जातो. विना विद्युतपुरवठा ग्रामस्थांना पाणी मिळत असल्याने ग्रामस्थ आनंदी आहेत. परंतु त्याकाळात शहानूर धरणातून गावांना पाणीपुरवठा करण्याकरिता टाकण्यात आलेल्या पाईपलाईनचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. ही पाईपलाईन जमिनीच्या आत २ मीटर खोदकाम करून टाकण्याचे नमूद असताना केवळ एक ते दीड फूट अंतरावरच ही पाईपलाईन टाकण्यात आली आहे.अलीकडेच शहरातील अंजनगाव सुर्जी - दर्यापूर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असताना रस्त्याच्या बाजूला सांडपाण्याच्या गटाराचे काम करीत असताना या पाण्याची पाईपलाईन वरच असल्याचे दिसून आले. ही पाईपलाईन फुटलेली आढळली. त्यामध्ये घाण पाणी मिसळत आहे. मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती मिळताच आ.रमेश बुंदिले, नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, वीज वितरण कंपनीचे सोनोने, पाणीपुरवठा विभागाचे पोकुलवार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाईपलाईनची पाहणी केली असता त्यांनाही हा गंभीर प्रकार दिसून आला. याबाबत, त्यांनी प्राधिकरणचे अभियंता सिनकर यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आमदार रमेश बुंदिले यांनी त्यांची खरडपट्टी काढून तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत. रोगराईला निमंत्रणघाण पाणी पाईपलाईनमध्ये शिरून नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होण्याची बाब अतिशय गंभीर आहे. यामुळे विविध आजार बळावले असून नागरिकांच्या आरोग्याला धोका उत्पन्न झाला आहे. यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.