शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

बीएसएनएलची अनियमित सेवा

By admin | Updated: October 13, 2014 23:15 IST

दूरसंचार क्षेत्रात शासकीय सेवा म्हणून काम करणाऱ्या बीएसएनएल कंपनीला ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. परंतु चांदूरबाजार तालुक्यात काही दिवसांपासून ही सेवा विस्कळीत झाली आहे.

चांदूरबाजार : दूरसंचार क्षेत्रात शासकीय सेवा म्हणून काम करणाऱ्या बीएसएनएल कंपनीला ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. परंतु चांदूरबाजार तालुक्यात काही दिवसांपासून ही सेवा विस्कळीत झाली आहे. मोबाईल सेवेत अनेक अडथळे येत असून इंटरनेट सेवेचीही तीच गत झाली आहे. त्यामुळे बीएसएनएल सेवा अनियमित झाली आहे.दूरसंचार क्षेत्रात मोठे संशोधन झाल्याने दिवसेंदिवस ही सेवा 'अपडेट' होते आहे. या क्षेत्रात बीएसएनएलसह अनेक खासगी कंपन्यादेखील काम करीत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात मोठी स्पर्धा आहे. म्हणून बीएसएनएलसह खासगी कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजना कार्यान्वित करीत आहेत. मोबाईलच्या ब्रॉडबँड, लॅन्डलाईन सुविधा फक्त बीएसएनएल कंपनीकडेच असल्याने साहजिकच या कंपनीकडे मोठा ग्राहक वर्ग जुळला आहे. त्याचप्रमाणे बीएसएनएल कंपनी ही शासकीय कंपनी असल्याने विश्वासार्हता व आपुलकी म्हणून ग्राहकांचा ओढा या कंपनीकडे जास्त होती. म्हणून चांदूरबाजार तालुक्यात बीएसएनएल कंपनीकडेच मोठ्या प्रमाणात ग्राहक संख्या आहे. सध्या इंटरनेट ही अशी आवश्यक सेवा झाली आहे. त्यामुळे या क्षेत्रात विविध कंपन्यांत मोठी स्पर्धा सुरू आहे. जास्तीत जास्त ग्राहक आपल्या कंपनीकडे यावे याकरिता खासगी कंपन्यांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध सोईसुविधा व सवलती देण्यात येत आहेत. या तुलनेत बीएसएनएलकडून ग्राहकांना सोई व सुविधा अपुऱ्या पडत असल्याने दिवसेंदिवस ग्राहकसंख्या रोडावत चालली आहे. चांदूरबाजार तालुक्यात तसेच शहरात अजूनही बीएसएनएलची इंटरनेट सेवासुद्धा व्यवस्थित मिळत नाही. अनेकदा शनिवार व रविवारी इंटरनेट कनेक्ट होतच नाही. तसेच इंटरनेट कनेक्ट झाल्यानंतर वारंवार बंद पडते. इंटरनेटची गतीसुद्धा इतर कंपन्यांच्या तुलनेत ढिम्म आहे. लॅन्डलाईन सेवा देखील वारंवार खंडित होत असते. याबाबत ग्राहकांनी संबंधित कार्यालयात तक्रार केल्यानंतरही त्या तक्रारीची दखल घेतली जात नाही, अशी अनेक ग्राहकांची तक्रारी आहे. तसेच बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार काय? चांदूरबाजार येथील बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठांकडूनच अभय देण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)