शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

लोखंडी नामफलक गायब

By admin | Updated: December 7, 2014 22:41 IST

राज्य महामहामार्गावर दिशादर्शक, सूचना, मार्गदर्शनासाठी लावण्यात आलेले लोखंडी नामफलक चोरणारी टोळी संपूर्ण विदर्भात सक्रिय झाली आहे. बहुतांश मार्गांवरील नामफलक गायब झाले असून

राज्य महामार्गावरील घटना : बऱ्हाणपूर, अमरावती, वाशिम विक्रीचे केंद्र, विदर्भात टोळी सक्रिय गणेश वासनिक - अमरावतीराज्य महामहामार्गावर दिशादर्शक, सूचना, मार्गदर्शनासाठी लावण्यात आलेले लोखंडी नामफलक चोरणारी टोळी संपूर्ण विदर्भात सक्रिय झाली आहे. बहुतांश मार्गांवरील नामफलक गायब झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाला लाखोंचा फटका बसला आहे. राज्य महामार्गावर हे लोखंडी नामफलक नसल्याने चालकांना मार्गदर्शनाअभावी वाहने चालविण्याचा प्रसंग ओढवत आहे.राज्य महामार्गाची देखरेख, दुरुस्ती, नूतनीकरण किंवा नवीन रस्ता निर्माण करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे राज्य शासनाने सोपविली आहे. रस्त्याचे जाळे विणताना हे रस्ते चांगल्या दर्जाचे निर्माण व्हावेत, यासाठी राज्य महामार्गाशी प्रत्येक रस्ते जोळणीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. विदर्भात राज्य महामार्गाच्या रस्ते निर्मितीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहे. राज्य महामार्गावर दर अर्धा कि.मी. च्या फरकाने वाहन चालकांना दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरणारे माहितीचे लोखंडी नामफलक लावण्यात आले आहेत. रस्ते निर्मिती करताना निविदा प्रक्रियेतच लोखंडी नामफलक लावण्याचे नमूद असल्यामुळे ठिकठिकाणी कंत्राटदाराकडून हे नामफलक लावून घेण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, शाखा अभियंता यांची आहे. त्यानुसार राज्य महामार्गावर लावण्यात आलेले हे लोखंडी नामफलक अचानक गायब झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंतेही चक्रावून गेले आहेत. चोरट्यांनी बनविले 'टार्गेट'तीन ते चार महिन्यापूर्वी राज्य महामार्गावर लावण्यात आलेले दिशादर्शक, मार्गदर्शक लोखडी नामफलक चोरीस जात असताना या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिसात तक्रार नोंदविली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राज्य महामार्गावरील लोखंडी नामफलक चोरीस जात असल्यामुळे शासनाला लाखो रुपयांचा चुना लागत आहे. लोखंडी नामफलक चोरीवरच हे चोरटे थांबले नाहीत. तर पुलाच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेले लोखंडी पाईपही कटरने कापून नेण्याचा सपाटा चालविला आहे. राज्य महामार्गावरील पूल हे सध्या संरक्षणविना उभे आहेत. एखाद्या प्रसंगी या पुलांवर अपघाताची घटना घडल्यास ती वाहने सरळ पुलाखाली गेल्याशिवाय राहणार नाही, अशी विदारक स्थिती राज्य महामार्गाची आहे. कोट्यवधी रुपये खर्चून रस्ते निर्मिती केली जात असताना या रस्त्यांचे संरक्षण होत नसल्याचे वास्तव आहे. विदर्भात चोरी करणारी ही टोळी विशिष्ट व्यक्तीकडे नामफलकाची विक्री करीत असल्याची माहिती आहे. अमरावती, वाशीम व बुऱ्हानपूर येथे चोरी केलेले नामफलक विक्री होत असल्याची विश्वसनीय आहे.