शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

रेती वाहतुकीसाठी इन्व्हॉईस क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:21 IST

अमरावती जिल्ह्यातील १२१ रेतीघाटांच्या ई-निविदा अटी शर्तीमध्ये रेतीघाट लिलावधारकांना जखडून ठेवले आहे.

ठळक मुद्देनवे धोरण : जिल्ह्यातील १२१ रेतीघाटांची ई-निविदा प्रक्रिया

आॅनलाईन लोकमततिवसा : अमरावती जिल्ह्यातील १२१ रेतीघाटांच्या ई-निविदा अटी शर्तीमध्ये रेतीघाट लिलावधारकांना जखडून ठेवले आहे. यात रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांकडे वैध इन्व्हॉईस नंबर महत्त्वाचा आहे. हा नंबर नसल्यास किंवा त्याची मुदत संपल्याचे महसूल अधिकाऱ्यांना आढळल्यास रेती उपसा अवैध समजून वाहनचालकाविरूद्ध कारवाई केली जाणार आहे.रेतीघाटातील वाळू उपसा करून त्याचे वाहनातील परिमाण, वाळू गटाचे नाव, वाहन क्रमांक, कुठून कुठे जाणार, या दोन ठिकाणामधील अंतर आदीचा तपशील असलेला एसएमएस संबंधित क्रमांकावर प्राप्त झाल्याशिवाय लिलावधारकाच, त्या वाहनास वाळूची वाहतूक करता येणार नाही, याशिवाय वाहतूक केल्यास, तसेच मुदत संपल्यावर वाहतूक केल्यास, ती अवैध ठरवून कायद्यान्वये कारवाई केली जाणार आहे. रेती घाट धारकाने नोंदनीकृत मोबाईलद्वारे एसएमएसद्वारे प्रणालीस कळविलेल्या परिमाणापेक्षा अधिक वाळूचे वहन होत असल्यास वाळूसाठी नियमानुसार दंडात्मक व मोटर वाहतूक कायद्यान्वये वाहनावर कारवाई केली जाणार आहे.सक्शन पंपाद्वारे वाळूचा उपसा करता येणार नाही. यासाठी न्यायालयाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. ज्या नदीवर पूल आहेत त्या पुलाच्या स्तंभाचे १०० मीटरपर्यंत उपसा करता येणार नाही. अस्तित्वातील सार्वजनिक पाणीपुरवठा उद्भवाचे ५०० मीटर अंतरात रेतीचा उपसा करता येणार नाही. जेथे वाळू उपसा सुरू आहे त्याठिकाणी फलक लावून उत्खनन क्षेत्राची सीमा निश्चित करावी लागणार आहे. या फलकावर लिावधारकाचे नाव, रेती घाटाचे क्षेत्रफळ, उपलब्ध रेतीसाठा व घाटाचा नकाशा, लावणे बंधनकारक आहे. उपसा करताना खासगी मालमत्तेस हानी पोहोचल्यास त्याचे दायित्व लिलावधारकावर राहील. काढलेल्या वाळुची फेरविक्रीसाठी साठवणूक करता येणार नाही. लिलावाची मुदत संपेपर्यंत साठा न हलविल्यास तो शासनाच्या मालकीचा होईल. याबाबत कोणताही दावा करता येणार नाही. नैसर्गिक संपत्तीस व पर्यावरणास कोणताही धोका होणार नाही, याची काळजी लिलावधारकाने घ्यायची आहे. जीएसडीएच्या सर्वेक्षणानंतर निश्चित केलेल्या खोलीपेक्षा अधिक उत्खनन करता येणार नाही, असे अटी-शर्तीमध्ये नमूद आहे.३० सप्टेंबरला येणार मुदत संपुष्टातई-निविदा घेण्याची तारीख कोणतीही असली तरी या घाटांचा कालावधी ३० सप्टेंबर २०१८ या तारखेपर्यंतच राहणार आहे. करारात नमूद साधनांनीच रेतीचा उपसा करण्याचे बंधन लिलावधारकांना राहणार आहे. कुठल्याही परिस्थितीत हा कालावधी वाढवून मिळणार नाही. वाहतुकीसाठी अस्तित्वात असलेल्या रस्त्यांचाच वापर वाहतुकीसाठी करावा लागणार आहे. नवीन रस्ता मिळविण्याची जबाबदारी लिलावधारकांची राहणार आहे. उत्खननाच्या जागेवर मजुरांसाठी सर्व सुविधा पुरवाव्या लागणार आहेत.२० टक्के क्षेत्रात वृक्षलागवड अनिवार्यवाहतूक करताना वाहनातील वाळू प्लास्टिक पेपरने किंवा ताडपत्रीने झाकणे अनिवार्य आहे. अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. दर महिन्याचे दुसºया व चौथ्या रविवारी रेती उपसा करता येणार नाही. पर्यावरणाचे संतुलन राहण्यासाठी वाहनाने वाळू उपशाचे खड्डे बुजवावे लागणार आहे. सकाळी ६ ते सायंकाळी ६ या कालावधीतच रेती उपसा करण्यास परवानगी आहे. मंजूर क्षेत्रापैकी किमान २० टक्के क्षेत्रात तसेच नदी तिरावर व गावातील रस्त्याच्या काठाला वृक्ष लागवड करावी लागणार आहे.