शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

दुबारच्या अहवालास कर्मचारी संपाची बाधा

By admin | Updated: July 13, 2017 00:11 IST

यंदाच्या खरीपात जिल्ह्यात झालेल्या साडेचार लाख हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी दीड लाख हेक्टरवर दुबार पेरणीची शक्यता असल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला.

अहवाल केव्हा? : दीड लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीला मोड येण्याची शक्यतालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीपात जिल्ह्यात झालेल्या साडेचार लाख हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी दीड लाख हेक्टरवर दुबार पेरणीची शक्यता असल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला. शासनाने या विषयीचा अहवाल मागितला असताना क्षेत्रिय कर्मचारी संपावर असल्याने कृषी विभाग तोंडघसी पडला आहे. अद्याप जिल्ह्याचे नजरअंदाज बाधीत क्षेत्र अहवालच तयार नसल्याचे वास्तव आहे.कृषी विभागाचा सुधारीत आकृतीबंध तयार करण्यासोबतच इतरही प्रलंबीत मागण्यासाठी राज्य कृषी सहाय्यक संघटनेव्दारा १० जुलै पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जिल्ह्यात एक जून ते १२ जुलै दरम्यान अपेक्षित सरासरीच्या केवळ ५० टक्के प्रमाणात पाऊस पडला. परिणामी जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. अश्या परिस्थितीत गावागावातील कृषी सहाय्यक संपावर गेल्याने शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनात बाधा निर्माण झाली आहे. या आपातस्थितीचा आढावा घेण्यासाठी शासनव्दारा दुबार पेरणीचे संभाव्य क्षेत्राचा अहवाल मागविला असता क्षेत्रिय कर्मचारी संपावर असल्याने हा अहवालच तयार झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील केवळ पाच तालुक्यांचे अहवाल पाठविण्यात आले आहे तर उर्वरीत नऊ तालुक्यातून हे अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयास अद्याप अप्राप्त आहेत. याबाबत तालुक्यांचा अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला असता कृषी सहाय्यक संपावर असल्याने माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. पावसाअभावी बिकट परिस्थिती उद्भवल्याने शासनाची यंत्रणाच बेपर्वा असल्याने शेतकऱ्यांना आता अस्मानी सोबत सुल्तानी संकटाचा सामना करावा लागत असल्याचे वास्तव आहे.सद्यस्थितीत ६५ टक्क्यावर क्षेत्रात पेरणीजिल्ह्यात यंदाच्या खरीपासाठी सात लाख २८ हजार हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी साडे चार लाख हेक्टर क्षेत्रात सद्यस्थितीत पेरणी झाली आहे. यामध्ये चांदुररेल्वे तालुक्यात ३६,२३८ हेक्टर, तिवसा ३५ हजार ११३, मोर्शी ४३,१२०, वरूड ३५ हजार ९६७, दर्यापूर १६, ५३१, धारणी ३८,५६२, चिखलदरा १०,०७५, अमरावती ५१,४७०, भातकुली ३६,४८१, नांदगाव खं.५२,७७०, अंजनगाव सुर्जी ३,९००, अचलपूर १५,६९४, चांदुरबाजार ४४,९५०, धामणगाव रेल्वे ३१,८५३ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली.असे आहे संभाव्य दुबार पेरणी क्षेत्रजिल्ह्यात दीड ते दोन लाख हेक्टर क्षेत्रात दुबार पेरणीचे सावट आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात १५ ते १८ हजार हेक्टर, मोर्शी तालुक्यात १७ ते २० हजार हेक्टर, भातकुली तालुक्यात ११ ते १३ हजार हेक्टर, चांदुरबाजार तालुक्यात ३३ ते ३५ हजार हेक्टर, धारणी तालुक्यात चार ते सहा हजार हेक्टर क्षेत्रात दुबार पेरणीची शक्यता आहे. उर्वरीत तालुक्यातील माहिती उपलब्ध नसली तरी पेरणीपैकी ५० ते ६० टक्के क्षेत्रात दुबार पेरणीचे संकट कायम आहे. पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा असला तरी हुलकावणीशिवाय काही नाही हे खरे आहे.पावसाचा ताण असल्यामुळे जिल्ह्यात किमान ६० ते ७० हजार हेक्टर संभाव्य दुबार पेरणीचे क्षेत्र असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. क्षेत्रीय कर्मचारी संपावर असल्याने काही प्रमाणात अडचण आहे. - अनिल खर्चान उपसंचालक, कृषी