शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
3
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
4
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
5
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
6
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
7
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
8
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
9
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
10
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
11
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
12
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
13
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
14
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
15
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
16
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
17
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
18
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
19
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
20
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?

दुबारच्या अहवालास कर्मचारी संपाची बाधा

By admin | Updated: July 13, 2017 00:11 IST

यंदाच्या खरीपात जिल्ह्यात झालेल्या साडेचार लाख हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी दीड लाख हेक्टरवर दुबार पेरणीची शक्यता असल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला.

अहवाल केव्हा? : दीड लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीला मोड येण्याची शक्यतालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीपात जिल्ह्यात झालेल्या साडेचार लाख हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी दीड लाख हेक्टरवर दुबार पेरणीची शक्यता असल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला. शासनाने या विषयीचा अहवाल मागितला असताना क्षेत्रिय कर्मचारी संपावर असल्याने कृषी विभाग तोंडघसी पडला आहे. अद्याप जिल्ह्याचे नजरअंदाज बाधीत क्षेत्र अहवालच तयार नसल्याचे वास्तव आहे.कृषी विभागाचा सुधारीत आकृतीबंध तयार करण्यासोबतच इतरही प्रलंबीत मागण्यासाठी राज्य कृषी सहाय्यक संघटनेव्दारा १० जुलै पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जिल्ह्यात एक जून ते १२ जुलै दरम्यान अपेक्षित सरासरीच्या केवळ ५० टक्के प्रमाणात पाऊस पडला. परिणामी जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. अश्या परिस्थितीत गावागावातील कृषी सहाय्यक संपावर गेल्याने शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनात बाधा निर्माण झाली आहे. या आपातस्थितीचा आढावा घेण्यासाठी शासनव्दारा दुबार पेरणीचे संभाव्य क्षेत्राचा अहवाल मागविला असता क्षेत्रिय कर्मचारी संपावर असल्याने हा अहवालच तयार झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील केवळ पाच तालुक्यांचे अहवाल पाठविण्यात आले आहे तर उर्वरीत नऊ तालुक्यातून हे अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयास अद्याप अप्राप्त आहेत. याबाबत तालुक्यांचा अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला असता कृषी सहाय्यक संपावर असल्याने माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. पावसाअभावी बिकट परिस्थिती उद्भवल्याने शासनाची यंत्रणाच बेपर्वा असल्याने शेतकऱ्यांना आता अस्मानी सोबत सुल्तानी संकटाचा सामना करावा लागत असल्याचे वास्तव आहे.सद्यस्थितीत ६५ टक्क्यावर क्षेत्रात पेरणीजिल्ह्यात यंदाच्या खरीपासाठी सात लाख २८ हजार हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी साडे चार लाख हेक्टर क्षेत्रात सद्यस्थितीत पेरणी झाली आहे. यामध्ये चांदुररेल्वे तालुक्यात ३६,२३८ हेक्टर, तिवसा ३५ हजार ११३, मोर्शी ४३,१२०, वरूड ३५ हजार ९६७, दर्यापूर १६, ५३१, धारणी ३८,५६२, चिखलदरा १०,०७५, अमरावती ५१,४७०, भातकुली ३६,४८१, नांदगाव खं.५२,७७०, अंजनगाव सुर्जी ३,९००, अचलपूर १५,६९४, चांदुरबाजार ४४,९५०, धामणगाव रेल्वे ३१,८५३ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली.असे आहे संभाव्य दुबार पेरणी क्षेत्रजिल्ह्यात दीड ते दोन लाख हेक्टर क्षेत्रात दुबार पेरणीचे सावट आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात १५ ते १८ हजार हेक्टर, मोर्शी तालुक्यात १७ ते २० हजार हेक्टर, भातकुली तालुक्यात ११ ते १३ हजार हेक्टर, चांदुरबाजार तालुक्यात ३३ ते ३५ हजार हेक्टर, धारणी तालुक्यात चार ते सहा हजार हेक्टर क्षेत्रात दुबार पेरणीची शक्यता आहे. उर्वरीत तालुक्यातील माहिती उपलब्ध नसली तरी पेरणीपैकी ५० ते ६० टक्के क्षेत्रात दुबार पेरणीचे संकट कायम आहे. पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा असला तरी हुलकावणीशिवाय काही नाही हे खरे आहे.पावसाचा ताण असल्यामुळे जिल्ह्यात किमान ६० ते ७० हजार हेक्टर संभाव्य दुबार पेरणीचे क्षेत्र असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. क्षेत्रीय कर्मचारी संपावर असल्याने काही प्रमाणात अडचण आहे. - अनिल खर्चान उपसंचालक, कृषी