शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

इच्छुकांमध्ये ‘सायबर वॉर’ व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुपिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2016 00:22 IST

महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागताच इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी दंड थोपटण्यास सुरुवात केली आहे.

महापालिका निवडणूक : ग्रामीण भागातही अँड्रॉईड मोबाईलचा अधिक वापर अमरावती : महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागताच इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी दंड थोपटण्यास सुरुवात केली आहे. त्यातून इच्छुकांच्या समर्थकांमध्ये थेट फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅपवर चकमकी होऊ लागल्या आहेत. फेसबुकवर स्वतंत्र वॉल तर व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुपिंगने स्पर्धेत रंग भरण्यास सुरुवात केली आहे. प्रभागा-प्रभागांतील इच्छुक व्हॉटस् अ‍ॅपचे एडमिन म्हणून नव्या भूमिकेत शिरले आहेत. अमरावती महापालिका निवडणुकीची प्रभागरचना आणि आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय ज्वर चढण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांनी खुबीने केलेला सोशलमीडियाचा उपयोग सर्वश्रृत आहे. तोच कित्ता महापालिका निवडणुकीच्या रिंगणात गिरवला जात आहे. अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईलच्या माध्यमातून शहर तथा ग्रामीण भागातही सोशल मीडियाचा प्रसार होऊ लागला आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरातील सोशल मीडियाची व्याप्ती लक्षात घेता या माध्यमाचा सदुपयोग करण्यास अनेकजण सरसावले आहेत. विद्यमान नगरसेवकांपैकी काहींनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मागील साडेचार वर्षे केलेल्या विकासकामांची टिप्पणी टाकून आगामी निवडणुकीतही आपण रिंगणात राहू, असे संकेत दिले आहेत. मागील लोकसभा निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचे महत्त्व सर्वच राजकीय पक्ष, पुढाऱ्यांना समजले आणि या माध्यमाचा वापर सुरू झाला. सोशल मीडियावरून स्वत:चा प्रचार अथवा ‘पर्सनल रिलेशन’ वाढविण्यासाठी सर्वच इच्छुकांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या सर्जिकल स्ट्राईकपासून अगदी छोट्या-मोठ्या घटनेवर हे इच्छुक आपली प्रतिक्रिया ‘पोस्ट’ करीत होते. आपल्या नेत्याचे अनुकरण करण्यात त्यांचे समर्थकही पाठीमागे राहिले नाहीत. नेतेमंडळी आणि त्यांच्या समर्थकांकडून टाकण्यात येणाऱ्या पोस्टवर प्रतिक्रिया नोंदविण्यात येत आहेत. फेसबुकवर टाकलेल्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना परस्परांची उणीदुणी काढण्याचे प्रकार वाढत असून त्याचा फटका कायदा व सुव्यवस्थेला बसू नये, याची काळजी मात्र पोलिसांना घ्यावी लागत आहे. (प्रतिनिधी)सोशल मिडिया विशेष करुन व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुकवर प्रतिक्रिया देताना, कुठलीही पोस्ट टाकताना नागरिकांनी काळजी घ्यावी, कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्यास गुन्हा तर दाखल होईलच, शिवाय अ‍ॅडमिनलाही कारवाईला सामोरे जावे लागेल. - कांचन पांडे, प्रमुख सायबरसेल, पोलीस आयुक्तालय