शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांमध्ये ‘सायबर वॉर’ व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुपिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2016 00:22 IST

महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागताच इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी दंड थोपटण्यास सुरुवात केली आहे.

महापालिका निवडणूक : ग्रामीण भागातही अँड्रॉईड मोबाईलचा अधिक वापर अमरावती : महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागताच इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी दंड थोपटण्यास सुरुवात केली आहे. त्यातून इच्छुकांच्या समर्थकांमध्ये थेट फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅपवर चकमकी होऊ लागल्या आहेत. फेसबुकवर स्वतंत्र वॉल तर व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुपिंगने स्पर्धेत रंग भरण्यास सुरुवात केली आहे. प्रभागा-प्रभागांतील इच्छुक व्हॉटस् अ‍ॅपचे एडमिन म्हणून नव्या भूमिकेत शिरले आहेत. अमरावती महापालिका निवडणुकीची प्रभागरचना आणि आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय ज्वर चढण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल यांनी खुबीने केलेला सोशलमीडियाचा उपयोग सर्वश्रृत आहे. तोच कित्ता महापालिका निवडणुकीच्या रिंगणात गिरवला जात आहे. अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईलच्या माध्यमातून शहर तथा ग्रामीण भागातही सोशल मीडियाचा प्रसार होऊ लागला आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरातील सोशल मीडियाची व्याप्ती लक्षात घेता या माध्यमाचा सदुपयोग करण्यास अनेकजण सरसावले आहेत. विद्यमान नगरसेवकांपैकी काहींनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मागील साडेचार वर्षे केलेल्या विकासकामांची टिप्पणी टाकून आगामी निवडणुकीतही आपण रिंगणात राहू, असे संकेत दिले आहेत. मागील लोकसभा निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचे महत्त्व सर्वच राजकीय पक्ष, पुढाऱ्यांना समजले आणि या माध्यमाचा वापर सुरू झाला. सोशल मीडियावरून स्वत:चा प्रचार अथवा ‘पर्सनल रिलेशन’ वाढविण्यासाठी सर्वच इच्छुकांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या सर्जिकल स्ट्राईकपासून अगदी छोट्या-मोठ्या घटनेवर हे इच्छुक आपली प्रतिक्रिया ‘पोस्ट’ करीत होते. आपल्या नेत्याचे अनुकरण करण्यात त्यांचे समर्थकही पाठीमागे राहिले नाहीत. नेतेमंडळी आणि त्यांच्या समर्थकांकडून टाकण्यात येणाऱ्या पोस्टवर प्रतिक्रिया नोंदविण्यात येत आहेत. फेसबुकवर टाकलेल्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना परस्परांची उणीदुणी काढण्याचे प्रकार वाढत असून त्याचा फटका कायदा व सुव्यवस्थेला बसू नये, याची काळजी मात्र पोलिसांना घ्यावी लागत आहे. (प्रतिनिधी)सोशल मिडिया विशेष करुन व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुकवर प्रतिक्रिया देताना, कुठलीही पोस्ट टाकताना नागरिकांनी काळजी घ्यावी, कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्यास गुन्हा तर दाखल होईलच, शिवाय अ‍ॅडमिनलाही कारवाईला सामोरे जावे लागेल. - कांचन पांडे, प्रमुख सायबरसेल, पोलीस आयुक्तालय