शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
5
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
6
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
7
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
8
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
9
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
10
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
11
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
12
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
13
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
14
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
15
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
16
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
17
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
18
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
19
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
20
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर

माफीच्या निर्णयानंतरही व्याजकपात सुरुच

By admin | Updated: June 30, 2015 00:34 IST

गतवर्षीच्या खरीप हंगामात विदर्भाची आणेवारी ५० पैशांच्या आत आल्याने शासनाने ११ डिसेंबर २०१४ रोजी नागपूरच्या ...

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला बँकांचा खो : खरिपाच्या पीककर्जातून कापले जाताहेत गतवर्षीचे व्याज, गजानन मोहोड अमरावतीगतवर्षीच्या खरीप हंगामात विदर्भाची आणेवारी ५० पैशांच्या आत आल्याने शासनाने ११ डिसेंबर २०१४ रोजी नागपूरच्या विधीमंडळ अधिवेशनात ७ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. यामध्ये खरीप २०१४ मधील पीककर्जावरील व्याजाचा भरणा करण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात घोषणेची अंमलबजावणीच नसल्याने बँकांनीदेखील शासनाला न जुमानता यंदाच्या पीककर्जातून गतवर्षीचे व्याज कपात करण्याचा सपाटा सुरु केला आहे. ऐन पेरणीच्या कालावधीत या नव्या संकटाने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. विदर्भातील दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी शासनाने ७ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. यामुळे जिल्ह्यातील ४ लाख ५३ हजार ५६४ शेतकऱ्यांना आंशिक दिलासा मिळाला. यामध्ये १ लाख २० हजार ५६४ शेतकऱ्यांना खरीप २०१४ मधील ११२० कोटी ३८ लाख ८७ हजार रुपयांच्या पीककर्जावरील व्याजाचा भरणा शासन करेल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. प्रत्यक्षात शासनाव्दारा व्याजाचा भरणाच करण्यात आला नसल्याने बँकांनी खरीप २०१५ करिता शेतकऱ्यांना पीककर्ज देताना कर्जामधून थेट गतवर्षीच्या पीककर्जाचे व्याज कपात सुरू केली आहे. गतवर्षीचे व्याज माफ झाले या भावनेत असणाऱ्या शेतकऱ्यांना बँकांनी व्याजकपात करुन धक्का दिला आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या २९ जूनच्या अहवालानुसार जिल्ह्यात बँकांना खरीप २०१५ करिता १६९५ कोटी ४४ लाख रुपयांचे टार्गेट असताना केवळ ८५३ कोटी ३५ लाख २२ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. ही टक्केवारी एकूण उद्दिष्टांच्या केवळ ५० टक्केच आहे.या कर्जावरील अद्याप व्याजमाफी नाहीखरीप २०१४ करीता जिल्ह्यात, सहकारी बँकेने ५८ हजार ४८५ शेतकऱ्यांचे ४३४ कोटी ९३ लाख ८७ हजार, राष्ट्रीयीकृत बँकांनी ६१ हजार २७८, शेतकऱ्यांना ६७८ कोटी ३३ लाख व ग्रामीण बँकांच्या ८०० शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या ७१२ कोटी रुपयांचे असे एकूण ११२० कोटी ३८ लक्ष ८७ हजारांच्या खरीप कर्जावरील व्याजमाफीची रक्कम अद्याप आली नसल्याचे बँकांनी स्पष्ट केले आहे. गतवर्षीच्या खरीप पीककर्जाची व्याज माफी करण्याची घोषणा शासनाने केली असली तरी बँकांना रक्कम मिळाली नाही. त्यामुळे व्याजकपात करण्यात येत आहे. शासनाची रक्कम मिळताच संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येईल. - अनंत खोरगडे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक,सेंट्रल बँक आॅफ इंडिया.शेतकऱ्यांच्या पीककर्जावरील व्याजमाफी हा शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. सध्या महसूलमंत्री ना. एकनाथ खडसे परदेशात आहे. ते आल्यानंतर त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करुन प्रसंगी शासनावर दडपण आणू. - सुनील देशमुख, आमदार, अमरावती.