शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

अंतरगाववासीयांनी नाकारले मतदान !

By admin | Updated: February 22, 2017 00:18 IST

लोकप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे २५ वर्षांपासून गावचा विकास रखडल्याच्या निषेधार्थ मतदान न करण्याच्या निर्णयावर अंतरगाववासी मतदानाच्या दिवशीही ठाम राहिले.

गावकऱ्यांनी पाळला निर्धार : प्रशासनाची मध्यस्थी अयशस्वी येवदा : लोकप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे २५ वर्षांपासून गावचा विकास रखडल्याच्या निषेधार्थ मतदान न करण्याच्या निर्णयावर अंतरगाववासी मतदानाच्या दिवशीही ठाम राहिले. निवडणुकीत मतदान न करण्याच्या निर्णयामुळे हे गाव प्रकाशझोतात आले होते. दरम्यान गावकऱ्यांनी उमेदवारांच्या प्रचारवाहनांना गावबंदी करून रोष व्यक्त केला. गावकऱ्यांनी मंगळवारी मतदान न करण्याचा निर्धार कायम ठेवला. तीन ते चार शासकीय कर्मचारी वगळता कोणीही गावकरी मतदानासाठी बाहेर पडले नाहीत.दर्यापूर तालुक्यातील अंतरगाव शिवाजी या गावाची लोकसंख्या १ हजाराचे वर असून येथे ५६४ मतदार आहेत. गावाची सद्यस्थिती अत्यंत वाईट असून मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव आहे. वारंवार मागण्या करून कंटाळलेल्या गावकऱ्यांनी यंदाच्या निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्धार केला होता. येथील मतदान केंद्राला सहायक निवडणूक निरीक्षक सुनील पाटील यांनी भेट दिली असता एकही गावकरी मतदानासाठी पोहोचला नसल्याचे चित्र दिसून आले. (वार्ताहर)शासकीय कर्मचाऱ्यांवर मतदानाची सक्ती झोनल अधिकारी अरविंद गुडधे व नायब तहसीलदार एम.डी.चव्हाण यांनी येथील अंगणवाडी सेविका व मदतनिस तसेच गावचे पोलीस पाटील जयंत कथलकर यांना नोकरीवरून कमी करण्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून मतदान करवून घेतल्याचा आरोप या तिघांनी केला आहे. ओळखपत्र आणण्याची सवड न देताच मतदान प्रक्रिया उरकण्यात आली, असे त्यांचे म्हणणे आहे. निवडणूक केंद्रावरील व्यक्तिने आम्हाला बोलावून नेले. बीडीओंनी ‘तु्म्हाला नोकरी करायची नाही का’ असा धाक दाखवून दमदाटी करून मतदान करण्यास बाध्य केले. माझ्या मदतनिसालासुद्धा असाच धाक दाखवला. - सविता कथलकर,अंगणवाडी सेविका, अंतरगाव पोलीस पाटील म्हणून मी मतदान केंद्रावर उपस्थित होतो. निवडणूक केंद्राला भेट देण्याकरिता आलेल्या अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने माझ्याकडून मतदान करवून घेतले. ओळखपत्र आणण्याची सवडही दिली नाही. -जयंत कथलकर,पोलीस पाटील, अंतरगाव