शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाची तीव्रता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 23:36 IST

तीन दिवसांपासून शासन अंत पाहत आहे. मात्र, आमच्या एकीचा वज्रनिर्धार कायम आहे. सोबत आता कुटुंबीयही रस्त्यावर आल्याने आमची ताकद कैकपटींनी वाढली.

ठळक मुद्देप्रशासनाविरूद्ध रोष : जनआक्रोश आंदोलन राहुटीत रूपांतरित, तिसरी रात्रही रस्त्यावर; विभागीय आयुक्तांचा सचिवांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तीन दिवसांपासून शासन अंत पाहत आहे. मात्र, आमच्या एकीचा वज्रनिर्धार कायम आहे. सोबत आता कुटुंबीयही रस्त्यावर आल्याने आमची ताकद कैकपटींनी वाढली. आम्ही सर्व इथे असल्याने गुराढोरांकडे दुर्लक्ष आहे. त्यांनाही येथे बांधू; मात्र आता आंदोलनातून माघार घेणार नाही. ही आरपारची लढाई आहे. गुरुवारपासून हा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केला.विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाची धग तिसऱ्या दिवशीही कायम आहे.कुटुंबीयही सोबतीलाआंदोलनात आता प्रकल्पग्रस्तांचे कुुटुंबीयदेखील सहभागी झाले आहेत. गुरुवारपासून घरची गुरेही या ठिकाणी आणायची तयारी सुरू केल्याने आंदोलनाची तीव्रता अणखीनही वाढणार आहे. दरम्यान, दुसºया दिवसाची रात्रही प्रकल्पगस्तांनी उघड्यावर काढली. प्रशासनाद्वारा जिल्हास्तरावरच्या मागण्या सोडविण्यातच वेळ घालविला जात आहे.जिल्हाधिकारी शैलेश नवाल बुधवारी सकाळी रूजू झाले. त्यांनी आंदोलकांची भूमिका समजून घेतली अन् दुपारी राज्य निवडणूक आयोगाच्या तीन दिवसांच्या प्रशिक्षणासाठी पुण्याला रवाना झाले. ते आता सोमवारीच जिल्ह्यात दाखल होेणार असल्याने आपसूकच या प्रकरणाची सूत्रे आता भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी व अजय लहाने यांच्याकडे आली आहेत. दरम्यान, विभागीय आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाशी व आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. पालकमंत्र्यांनीदेखील जलसंपदा मंत्र्यांकडे शिष्टार्ई केली. मात्र, तोडगा आंदोलनकर्त्यांना मान्य नाही तसेच आंदोलनाची माघार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. आंदोलन सुरूच असताना आमच्यातील काहीशी शासनाने व्हिसीद्वारे संवाद साधावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. दरम्यान रात्री १०.३० च्या सुमारास आंदोलन स्थळालगत एका कारला आग लागली असता आंदोलनकर्त्यांनी कॅनमधील पिण्याचे पाणी टाकून आग विझविली.गाडगेनगर ठाण्यात ५४ आंदोलकांविरुद्ध गुन्हाविदर्भ बळिराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीच्या एकूण ५४ आंदोलनकर्त्यांविरुध्द गाडगेनगर पोलिसांनी मंगळवारी गुन्हा नोंदविला. प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडून रहदारीस अडथळा निर्माण केला तसेच सामान्य जनतेच्या अधिकाराचे हनन करून तणाव निर्माण केल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविचे कलम १४३, ३४१, १८८, सहकलम १३५, सहकलम ७, क्रिमीनल अमेंटमेंट अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.दात्यांचा ओघ सुरूसोमवारपासून दिवसा उन्ह अन् रात्री थंडी अंगावर झेलत आंदोलनकर्ते जिल्हा कचेरीसमोर ठिय्या देऊन आहेत. त्यांच्या मदतीला आता दातेदेखील समोर येत आहेत. आंदोलकांच्या जेवणासाठी मदतीचे हात समोर आले आहेत. ठिय्याच्या ठिकाणीच आंदोलक महिलांद्वारे भाजीपाला निवडून सामूहिकरीत्या स्वयंपाक केला जात आहे. तिथेच जेवण झाल्यावर पुन्हा ठिय्या आंदोलनात सहभागी होत असल्याचे दिसून आले.अमरावतीकरांनी व्हावे सहभागीअमरावतीकरांना आज जे पाणी मिळत आहे, त्या अप्पर वर्धा प्रकल्पासाठी आमच्या जमिनी अधिग्रहीत झालेल्या आहेत. शासनाच्या दुटप्पी भूमिकेमुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली. १९७६ सालच्या अप्पर वर्धाच्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे अमरावतीकरांनीही या आंदोलनात सहभागी होऊन आमचा उत्साह वाढवावा, असे आवाहन वृद्ध प्रकल्पग्रस्तांनी केले.आंदोलकांशी संवाद साधण्यात येऊन आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. याबाबत जलसंपदा सचिवांशी संवाद झाला. येत्या कॅबिनेट बैठकीच्या दिवशी बैठकीसाठी तारीख निश्चित करण्यात आली. तसे पत्र दिले आहे.- पीयूष सिंहविभागीय आयुक्तशासन बैठकीसंदर्भात अधिकृत पत्र आम्हाला प्राप्त नाही. पालकमंत्र्याच्या पत्रावर बैठकीची तारीख नाही. त्यामुळे आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. आता आंदोलकांचा रोष वाढत आहे. उद्रेक कसा होईल, हे सांगता येत नाही.- मनोज चव्हाणअध्यक्ष, कृती संघर्ष समिती