शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाची तीव्रता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 23:36 IST

तीन दिवसांपासून शासन अंत पाहत आहे. मात्र, आमच्या एकीचा वज्रनिर्धार कायम आहे. सोबत आता कुटुंबीयही रस्त्यावर आल्याने आमची ताकद कैकपटींनी वाढली.

ठळक मुद्देप्रशासनाविरूद्ध रोष : जनआक्रोश आंदोलन राहुटीत रूपांतरित, तिसरी रात्रही रस्त्यावर; विभागीय आयुक्तांचा सचिवांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तीन दिवसांपासून शासन अंत पाहत आहे. मात्र, आमच्या एकीचा वज्रनिर्धार कायम आहे. सोबत आता कुटुंबीयही रस्त्यावर आल्याने आमची ताकद कैकपटींनी वाढली. आम्ही सर्व इथे असल्याने गुराढोरांकडे दुर्लक्ष आहे. त्यांनाही येथे बांधू; मात्र आता आंदोलनातून माघार घेणार नाही. ही आरपारची लढाई आहे. गुरुवारपासून हा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केला.विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाची धग तिसऱ्या दिवशीही कायम आहे.कुटुंबीयही सोबतीलाआंदोलनात आता प्रकल्पग्रस्तांचे कुुटुंबीयदेखील सहभागी झाले आहेत. गुरुवारपासून घरची गुरेही या ठिकाणी आणायची तयारी सुरू केल्याने आंदोलनाची तीव्रता अणखीनही वाढणार आहे. दरम्यान, दुसºया दिवसाची रात्रही प्रकल्पगस्तांनी उघड्यावर काढली. प्रशासनाद्वारा जिल्हास्तरावरच्या मागण्या सोडविण्यातच वेळ घालविला जात आहे.जिल्हाधिकारी शैलेश नवाल बुधवारी सकाळी रूजू झाले. त्यांनी आंदोलकांची भूमिका समजून घेतली अन् दुपारी राज्य निवडणूक आयोगाच्या तीन दिवसांच्या प्रशिक्षणासाठी पुण्याला रवाना झाले. ते आता सोमवारीच जिल्ह्यात दाखल होेणार असल्याने आपसूकच या प्रकरणाची सूत्रे आता भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी व अजय लहाने यांच्याकडे आली आहेत. दरम्यान, विभागीय आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाशी व आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. पालकमंत्र्यांनीदेखील जलसंपदा मंत्र्यांकडे शिष्टार्ई केली. मात्र, तोडगा आंदोलनकर्त्यांना मान्य नाही तसेच आंदोलनाची माघार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. आंदोलन सुरूच असताना आमच्यातील काहीशी शासनाने व्हिसीद्वारे संवाद साधावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. दरम्यान रात्री १०.३० च्या सुमारास आंदोलन स्थळालगत एका कारला आग लागली असता आंदोलनकर्त्यांनी कॅनमधील पिण्याचे पाणी टाकून आग विझविली.गाडगेनगर ठाण्यात ५४ आंदोलकांविरुद्ध गुन्हाविदर्भ बळिराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीच्या एकूण ५४ आंदोलनकर्त्यांविरुध्द गाडगेनगर पोलिसांनी मंगळवारी गुन्हा नोंदविला. प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडून रहदारीस अडथळा निर्माण केला तसेच सामान्य जनतेच्या अधिकाराचे हनन करून तणाव निर्माण केल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविचे कलम १४३, ३४१, १८८, सहकलम १३५, सहकलम ७, क्रिमीनल अमेंटमेंट अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.दात्यांचा ओघ सुरूसोमवारपासून दिवसा उन्ह अन् रात्री थंडी अंगावर झेलत आंदोलनकर्ते जिल्हा कचेरीसमोर ठिय्या देऊन आहेत. त्यांच्या मदतीला आता दातेदेखील समोर येत आहेत. आंदोलकांच्या जेवणासाठी मदतीचे हात समोर आले आहेत. ठिय्याच्या ठिकाणीच आंदोलक महिलांद्वारे भाजीपाला निवडून सामूहिकरीत्या स्वयंपाक केला जात आहे. तिथेच जेवण झाल्यावर पुन्हा ठिय्या आंदोलनात सहभागी होत असल्याचे दिसून आले.अमरावतीकरांनी व्हावे सहभागीअमरावतीकरांना आज जे पाणी मिळत आहे, त्या अप्पर वर्धा प्रकल्पासाठी आमच्या जमिनी अधिग्रहीत झालेल्या आहेत. शासनाच्या दुटप्पी भूमिकेमुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली. १९७६ सालच्या अप्पर वर्धाच्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे अमरावतीकरांनीही या आंदोलनात सहभागी होऊन आमचा उत्साह वाढवावा, असे आवाहन वृद्ध प्रकल्पग्रस्तांनी केले.आंदोलकांशी संवाद साधण्यात येऊन आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. याबाबत जलसंपदा सचिवांशी संवाद झाला. येत्या कॅबिनेट बैठकीच्या दिवशी बैठकीसाठी तारीख निश्चित करण्यात आली. तसे पत्र दिले आहे.- पीयूष सिंहविभागीय आयुक्तशासन बैठकीसंदर्भात अधिकृत पत्र आम्हाला प्राप्त नाही. पालकमंत्र्याच्या पत्रावर बैठकीची तारीख नाही. त्यामुळे आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. आता आंदोलकांचा रोष वाढत आहे. उद्रेक कसा होईल, हे सांगता येत नाही.- मनोज चव्हाणअध्यक्ष, कृती संघर्ष समिती