शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

विमा कंपन्यांनी मिळविला ४,२३४ कोटींचा निव्वळ नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:15 IST

अमरावती : यंदा शेतकऱ्यांना केवळ ७४३ कोटी रुपये पीक विम्याचे मिळाले. मात्र, उंबरठा उत्पादन ठरविताना शेतकऱ्यांवर अन्याय झाला. त्यामुळे ...

अमरावती : यंदा शेतकऱ्यांना केवळ ७४३ कोटी रुपये पीक विम्याचे मिळाले. मात्र, उंबरठा उत्पादन ठरविताना शेतकऱ्यांवर अन्याय झाला. त्यामुळे विमा कंपन्यांनी ४२३४ कोटींचा निव्वळ नफा मिळविला असून, महाविकास आघाडी सरकारच्या मेहेरबानीने हा सर्व प्रकार सुरू असल्याचा आरोप माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी सोमवारी पत्रपरिषदेतून केला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात २०१९ मध्ये सरकारने पीक विमा कंपन्यांसोबत करारनाम्यानुसार ८५ लाख शेतकऱ्यांना ५७९५ कोटी रुपयांचा लाभ मिळाला होता. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारने विमा कंपन्यांशी करार करताना निकष बदलविले, असा आरोप करण्यात आला. शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळाली नाही. खरीप २०२० मध्ये १३८ लाख शेतकऱ्यांनी ५,२१७ कोटी रुपये विम्याचा हप्ता भरला. मात्र, केवळ १५ लाख शेतकऱ्यांनाच ९७४ कोटी रुपये नुकसान भरपाई मिळाली. विमा कंपन्यांना ४,२३४ कोटींचा लाभ झाला, असे अनिल बोंडे म्हणाले. पत्रपरिषदेला भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, शहराध्यक्ष किरण पातुरकर, प्रमोद कोरडे, प्रशांत शेगोकार, राजेश पाठक आदी उपस्थित होते.