शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

योग्य पाणी तपासणीसाठी जलसेवकांना निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 23:02 IST

आॅनलाईन लोकमतअमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात आढळलेल्या दूषित पाण्यामुळे अमरावतीकरांचे आरोग्य धोक्यात आल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित करताच कार्यकारी अभियंता एस.एस. कोपुलवार यांनी गांभीर्याने दखल घेतली. योग्य पद्धतीने पाणी तपासणी करून तो अहवाल सादर करण्याच्या सूचना जलसेवकांना दिल्या. दूषित पाणी तपासणीवेळी संबंधित ग्राहकांच्या स्वाक्षºया घेण्याचेही निर्देश त्यांनी दिले.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ...

ठळक मुद्देअहवाल मागविला : पाणी तपासणीवेळी ग्राहकांची सही अनिवार्य

आॅनलाईन लोकमतअमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात आढळलेल्या दूषित पाण्यामुळे अमरावतीकरांचे आरोग्य धोक्यात आल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित करताच कार्यकारी अभियंता एस.एस. कोपुलवार यांनी गांभीर्याने दखल घेतली. योग्य पद्धतीने पाणी तपासणी करून तो अहवाल सादर करण्याच्या सूचना जलसेवकांना दिल्या. दूषित पाणी तपासणीवेळी संबंधित ग्राहकांच्या स्वाक्षºया घेण्याचेही निर्देश त्यांनी दिले.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तब्बल ९० हजार कुटुंबीयांना शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. जलशुद्धीकरण केंद्रापासून शहरातील विविध टाक्यापर्यंत पाइपलाइनद्वारे या शुद्ध पाणीपुरवठा केला जातो. शहरातील नाल्यांतून ही पाइपलाइन गेलेली असून गळतीमुळे नळाद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा ग्राहकांना होत असल्याचे आकडेवारीवरून निदर्शनास आले आहे. मजीप्राच्या पाइप लाइनमधून ३० टक्के गळतीचे प्रमाण असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका संभवतो.प्राधिकरण वर्तुळात खळबळ'अमरावतीत शुद्ध पाण्याची नो गॅरन्टी' या मथ्यळ्याखाली 'लोकमत'ने लोकदरबारी वृत्त प्रकाशित करताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. वृत्ताची दखल घेत कार्यकारी अभियंता कोपुलवार यांनी पाणी तपासणीची गंभीरता लक्षात घेता जलसेवकांना सूचना देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. सोबतच पाणी तपासणीचे नमुने घेताना संबंधित ग्राहकांची स्वाक्षरी घेऊन त्यांच्यासमोरच पाणी नमुने घेण्याचे निर्देश दिले. पाणी तपासणीबाबतचा अहवालसुद्धा त्यांनी मागविला आहे.पाणी गळती बंद करण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्नशहरात ३० टक्के पाणी गळतीचे प्रमाण आहे. कुठेही पाणी गळती आढळल्यास मजीप्रा विभागाशी संपर्क साधावा. पाणी गळती थांबविण्यासाठी मजीप्रा अधिकारी युद्धस्तरावर काम करीत आहे. मात्र, काही ठिकाणी सिमेंटचे रस्ते तयार झाल्यामुळे पाणी गळतीचे ठिकाण ट्रेस करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. मात्र, त्यावरही उपाययोजना मजीप्रा करीत आहे. रहाटगाव ते वडगाव दरम्यानची पाणी गळती बंद करण्यासाठी मजीप्रा यंत्रणा कामाला लागली आहे.पाणी तपासणी योग्य पद्धतीने करणे जलसेवकांना बंधनकारक आहे. दरम्यान संबंधित ग्राहकांची स्वाक्षरी घेण्याच्या सूचना देऊ. त्यासंबंधाने अहवाल मागविण्यात येईल.- एस.एस.कोपुलवार,कार्यकारी अभियंता