शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

टंचाई आराखडा सादर करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:39 IST

जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा परिषदेने अद्यापही आराखडा सादर केलेला नाही.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : उपाययोजनांचे प्रस्ताव मागविले

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा परिषदेने अद्यापही आराखडा सादर केलेला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेला ११ डिसेंबर रोजी स्मरणपत्र पाठविले. जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने प्रस्तावित उपाययोजनांसह प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाला दिले आहेत.आॅक्टोबर ते डिसेंबर २०१७, जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून २०१८ या तिन्ही टप्प्यांतील संभाव्य पाणीटंचाई आराखडा अद्यापही जिल्हाधिकारी कार्यालयाला अप्राप्त आहे. याची दखल विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी घेतली आहे. जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, दरवर्षी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून आराखडा तयार केला जातो. मात्र, यंदा आराखडा तयार झाला नाही. त्यामुळे आता पाणीटंचाई आराखडा तयार करताना प्रत्यक्ष टंचाई असेल, त्याच गावांचा समावेश करण्यात यावा. पाणीटंचाई कालावधीतच होऊ शकेल अशा तुलनात्मक कमी खर्चाच्या उपाययोजना प्रस्तावित करण्यात याव्यात. त्याची दक्षता घेत आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांची संख्या अचूकपणे नोंदवावी. अशाप्रकारे वस्तुनिष्ठ आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.आता जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग संभाव्य पाणीटंचाई आराखडा जिल्हाधिकाºयांकडे केव्हा सादर करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.