शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

डिझेल इंजिन लावून शेतातून पाण्याचा उपसा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:14 IST

तिवसा : सततच्या पावसामुळे रस्त्याच्या कडांवरून ओघळणारे पाणी ठाणाठुणी, वरखेड शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतात आले आहे. त्यामुळे शेतीला जलाशयाचे स्वरूप ...

तिवसा : सततच्या पावसामुळे रस्त्याच्या कडांवरून ओघळणारे पाणी ठाणाठुणी, वरखेड शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतात आले आहे. त्यामुळे शेतीला जलाशयाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे डिझेल इंजिन लावून शेतातून पाण्याचा उपसा करावा, अशी मागणी वरखेड येथील शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार अजिनाथ गांजरे यांच्याकडे केली.

अतिरिक्त पाण्याचा फटका तूर, सोयाबीन या पिकांना बसला. पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले. त्यामुळे शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणीदेखील निवेदनात शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांनी शेतातील पाणी बाहेर काढण्यासाठी रात्रंदिवस डिझेल इंजिन लावले. मात्र, याचा काही फायदा झाला नाही. या भागातील शेकडो हेक्टरमधील सोयाबीन व तूर पीक अतिपावसामुळे करपल्याचे दिसून येत आहे. पिके पाण्यात बुडाली आहेत. काढणीस आलेले सोयाबीन गेले, कपाशीलाही फटका बसला आहे. वरखेड येथील विठ्ठल बोके, संदीप गोरडे, छाया खैरकर, प्रदीप गोरडे, धीरज नाकाडे, नितीन चौधरी, श्रीमती सुनंदाबाई बोके, माधवी बोके, कुंदा जगताप भूषण बोके, राजू देशमुख तसेच आडकुजी महाराज संस्थानची शेती या ठिकाणी पाणी शिरल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी निवेदन दिले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अभिजित बोके, राजू देशमुख, संदीप गोरडे, सागर सौंदरकर, नीलेश बोके, धीरज नाकाडे, रोशन तरसे उपस्थित होते.