शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

डिझेल इंजिन लावून शेतातून पाण्याचा उपसा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:14 IST

तिवसा : सततच्या पावसामुळे रस्त्याच्या कडांवरून ओघळणारे पाणी ठाणाठुणी, वरखेड शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतात आले आहे. त्यामुळे शेतीला जलाशयाचे स्वरूप ...

तिवसा : सततच्या पावसामुळे रस्त्याच्या कडांवरून ओघळणारे पाणी ठाणाठुणी, वरखेड शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतात आले आहे. त्यामुळे शेतीला जलाशयाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे डिझेल इंजिन लावून शेतातून पाण्याचा उपसा करावा, अशी मागणी वरखेड येथील शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार अजिनाथ गांजरे यांच्याकडे केली.

अतिरिक्त पाण्याचा फटका तूर, सोयाबीन या पिकांना बसला. पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले. त्यामुळे शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणीदेखील निवेदनात शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांनी शेतातील पाणी बाहेर काढण्यासाठी रात्रंदिवस डिझेल इंजिन लावले. मात्र, याचा काही फायदा झाला नाही. या भागातील शेकडो हेक्टरमधील सोयाबीन व तूर पीक अतिपावसामुळे करपल्याचे दिसून येत आहे. पिके पाण्यात बुडाली आहेत. काढणीस आलेले सोयाबीन गेले, कपाशीलाही फटका बसला आहे. वरखेड येथील विठ्ठल बोके, संदीप गोरडे, छाया खैरकर, प्रदीप गोरडे, धीरज नाकाडे, नितीन चौधरी, श्रीमती सुनंदाबाई बोके, माधवी बोके, कुंदा जगताप भूषण बोके, राजू देशमुख तसेच आडकुजी महाराज संस्थानची शेती या ठिकाणी पाणी शिरल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी निवेदन दिले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अभिजित बोके, राजू देशमुख, संदीप गोरडे, सागर सौंदरकर, नीलेश बोके, धीरज नाकाडे, रोशन तरसे उपस्थित होते.