शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

वनक्षेत्रातील पाणवठ्यांची लिटमस पेपरने तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:00 IST

नैसर्गिक जलस्रोत कमी झाल्याने कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून नियमित पाणवठे स्वच्छ केल्यानंतर त्यामध्ये टॅँकरद्वारे पाणी भरले जाते. यानंतर पाणवठ्यातील पाण्याची लिटमस पेपरने दरदिवसा तपासणी केली जाते. विष किंवा युरियासारखे रासायनिक पदार्थ पाण्यात टाकल्यास वन्यप्राण्यांच्या जिवाला धोका होऊ शकतो.

ठळक मुद्देविषप्रयोग टाळण्याची दक्षता : वडाळी आणि चांदूर रेल्वे वनविभागाची उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कपोहरा बंदी : उन्हाळ््यात पाणीपातळी खालावत असल्यामुळे नैसर्गिक जलस्रोत आटतात. अशाप्रसंगी वन्यप्राण्यांना काहीच न आटणारे नैसर्गिक जलस्रोत आणि बहुतांश कृत्रिम पाणठ्यांवर अवलंबून राहावे लागते. या पाणवठ्यांवर विषप्रयोग होऊ शकतो, या शक्यता लक्षात घेऊन दररोज लिटमस पेपरने वनकर्मचाऱ्यांकडून तपासणी केली जात आहे.नैसर्गिक जलस्रोत कमी झाल्याने कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून नियमित पाणवठे स्वच्छ केल्यानंतर त्यामध्ये टॅँकरद्वारे पाणी भरले जाते. यानंतर पाणवठ्यातील पाण्याची लिटमस पेपरने दरदिवसा तपासणी केली जाते. विष किंवा युरियासारखे रासायनिक पदार्थ पाण्यात टाकल्यास वन्यप्राण्यांच्या जिवाला धोका होऊ शकतो. हा धोका टाळण्याकरिता वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर आणि चांदुर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांनी आपआपल्या वर्तुळातील वनकर्मचाऱ्यांना पाणवठ्यांची नियमित, काटेकोर तपासणी करण्याच्या सूचना वनकर्मचाºयांना दिल्या आहेत.वडाळी, चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रात वनविभागाची सावधागिरीगुलाबी रंगाचा असलेला लिटमस पेपर पाण्यात टाकल्यास, विषाक्त पाण्यात पेपर निळ््या रंगाचा होतो. परंतु, जर पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विषप्रयोग केलेला नसल्यास गुलाबी रंगाचा लिटमस पेपर तपासणीदरम्यान गुलाबीच राहतो. यावरू न युरिया किंवा कुठलाही विषप्रयोग केला असल्यास वनकर्मचाऱ्यांना माहिती होते. वन्यप्रण्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लिटमस पेपरने आता दरदिवसा पाणवठ्यांची तपासणी केली जात आहे.वडाळी वर्तुळात चार कृत्रिम पाणवठे, पोहरा वर्तुळात दोन कृत्रिम पाणवठे, चिरोडी वर्तुळात दोन कृत्रिम पाणवठे, तर बडनेरा, माळेगाव, चांदूर रेल्वे वर्तुळात नैसर्गिक पाणवठ्यांची संख्या बरीच आहे. नैसर्गिक पाणवठ्यांमध्ये भर उन्हाळ््यात मुबलक पाणी उपलब्ध आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग