शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

नरखेड रेल्वे मार्गावरील मालगाडी अपघाताची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:17 IST

अमरावती : अमरावती ते नरखेड रेल्वे मार्गावर वलगावनजीकच्या शिराळा येथे स्वांतत्र्यदिनाच्या मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास कोळसा घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे ...

अमरावती : अमरावती ते नरखेड रेल्वे मार्गावर वलगावनजीकच्या शिराळा येथे स्वांतत्र्यदिनाच्या मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास कोळसा घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे २२ डबे घसरले. या अपघाताची चौकशी करण्याचा निर्णय भुसावळ मध्य रेल्वे विभागाचे प्रबंधकांनी घेतला आहे. त्याअनुषंगाने अमरावती रेल्वे स्थानकाचे प्रंबधक, रेल्वे सुरक्षा बलाच्या निरीक्षकांना पाचारण करण्यात आले आहे.

डीआरएम एस.एस. केडिया यांनी नरखेड मार्गावर २२ मालगाडीचे डबे घसल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका ठेवला आहे. मात्र, अपघातस्थळी अनेक ठिकाणाहून फिशप्लेट गायब झाल्याचे त्यांच्या पाहणी दौऱ्यात लक्षात आले आहे. त्यामुळे हा अपघात नसून, घातपात असल्याचा संशय रेल्वेच्या वरिष्ठांना आला आहे. आता या अपघातप्रकरणी चौकशी नेमली जाणार आहे. या मार्गावर पहिल्यांदाच अशा मोठ्या अपघाताची नोंद झालेली आहे. प्रवासी गाडीचा अपघात झाला असता तर मोठी मनुष्यहानी झाली असती, अशी नाेंदही पाहणी दौऱ्यात करण्यात आली आहे. तब्बल ४८ तासांपर्यंत अपघातग्रस्त मालगाडीचे डबे उचलण्याचे कार्य युद्धस्तरावर सुरू असल्याची माहिती आहे. अमरावती, बडनेरा, अकोला व भुसावळ येथील अभियंते, अधिकारी यांची फौज निरंतरपणे कार्यरत होती, हे विशेष.

------------------

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दुर्लक्ष

नरखेड रेल्वे मार्गावरून ठराविक प्रवासी गाड्यांची वाहतूक असते. तसेच हा मार्ग मालवाहतुकीसाठी वापरला जातो. या मार्गावरुन गाड्यांची संख्या कमी असल्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाच्या नोंदी हा मार्ग दुर्लक्षित आहे. नेमकी हीच बाब हेरून चोरट्यांनी रूळाच्या फिश प्लेट गायब केल्याचे दिसून येते.

---------------------------

वरिष्ठ सुरक्षा अधिकारी करणार चौकशी

नरखेड रेल्वे मार्गावर मालगाडीचे २२ डबे घसरल्याप्रकरणी भुसावळ विद्युत विभागाचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी हे चौकशी

करणार आहेत. संबंधित अधिकाऱ्यांचे बयाण नोंदविले जाणार असून, रेल्वे रूळाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्यांवर कार्यवाही निश्चित होणार आहे. त्यानुसार भुसावळ येथे जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.