शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

सुरुवातीला केंद्रांवर शुकशुकाट, आता गर्दी आवरेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:10 IST

(असाइनमेंट) अमरावती : लसीकरणाच्या सुरुवातीच्या काळात सर्वच केंद्रांवर गर्दी कमी होती. मात्र, दुसऱ्या लाटेने सर्वांचे गैरसमज दूर झाले व ...

(असाइनमेंट)

अमरावती : लसीकरणाच्या सुरुवातीच्या काळात सर्वच केंद्रांवर गर्दी कमी होती. मात्र, दुसऱ्या लाटेने सर्वांचे गैरसमज दूर झाले व आता लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी आवरेनासी झाली आहे. जिल्ह्यात लसींचा तुटवडा असल्याने चार-चार दिवस केंद्र बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर ओढावली आहे. शहरात पहाटे चार वाजेपासून केंद्रांवर रांगा लागत आहेत, दिवसभर रांगेत राहून टोकन भेटत नसल्याने शहरातले नागरिक लस घ्यायला ग्रामीण भागात धाव घेत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या सहा केंद्रांवर लसीकरण झाले व आता १३६ केंद्रे आहेत. सुरुवातीला पहिल्या दोन टप्प्यांतीलही लसीकरण कमी व्हायचे. लसीकरणाची एक सुप्त भीती वाटत असल्याने एका केंद्रांवर दिवसभरात १०० डोज होत नव्हते, टार्गेटदेखील पूर्ण होत नसल्याने आरोग्य विभागाद्वारे जनजागृती करण्यात आली व लसीकरणासाठी पाच टप्पे निश्चित करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठी मोठी गर्दी केंद्रांवर व्हायला लागली. त्यानंतर १८ ते ४४ वयोगटासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली व प्रत्येक केंद्रावर पहाटे चार ते पाच वाजेपासून रांगा सुरू झाल्या, त्या अजूनही रोज लागताहेत.

जिल्ह्यातील लसीकरणात खरा खोडा हा पुरवठ्याचा आहे. चार लाख डोजची मागणी असताना १०, २० हजार डोज प्राप्त होत असल्याने जिल्ह्यातील अर्धेअधिक केंद्रे बंद करण्याची वेळ आरोग्य विभागावर ओढवली आहे.

बॉक्स

लसीकरणाविषयी असे होते गैरसमज

लसीकरणाच्या सुरुवातीच्या काळात महिलांचे गैरसमज होते. मासिक काळात लस घेता येत नाही. मात्र, याविषयी तज्ज्ञांनी सातत्याने स्पष्ट केल्यामुळे आता सर्व महिला लसीकरणाचा टक्का वाढला आहे. जिल्ह्यात आदिवासीबहुल मेळघाटात सर्वाधिक गैरसमज होते. याविषयी तेथील अधिकारी, पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत मेळघाटातील चित्र आता बदलविले आहे. याशिवाय लसीकरणामुळे वंध्यत्व, नपुंसकता आदी गैरसमज होते. याविषयी जिल्हा व आरोग्य प्रशासनाद्वारा त्या-त्या भागातील मान्यवरांशी संवाद साधला व त्यानंतर आता कुठे या भागातील लसीकरणाचा टक्का वाढला आहे.

कोट

गावकऱ्यांचा समज, संभ्रम दूर

कोट

लसीकरणाविषयी मनात भीती होती, लस घेतल्यानंतर ताप येतो, आजारी पडतो, असे ऐकले होते. मात्र, परिवारातील काहींनी लस घेतल्यानंतर हे गैरसमज आता दूर झाले आहेत. लस घेतल्याने कुठलाच त्रास झालेला नाही. त्यामुळे कुटुंबातील सर्वांनी लस घ्यावी, असा आग्रह धरला व लसीकरण केले आहे.

रामदासराव बोंडे, अमरावती

कोट

कोरोना लस घेतल्यावर काही दिवस काम करता येणार नाही असे वाटत होते. काहींना तापदेखील आला होता. मात्र, कोरोनामुळे गावात अनेकांचा मृत्यू झाला आहे. काहींची प्रकृती गंभीर झाली आहे. त्यामुळे सर्व विचार डोक्यातून काढून पहिल्यांदा लस घेतली. कुठलाही त्रास झाला नाही. लस घेतल्याने कुठलाही त्रास नाही.

भूषण देशमुख, चांदूर बाजार

कोट

सुरुवातीला कमी प्रतिसाद होता. आरोग्य विभागाद्वारा सातत्याने जनजागृती करण्यात आल्यानंतर प्रतिसाद वाढला आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने मोहीम मंदावते.

डॉ. दिलीप रणमले

जिल्हा आरोग्य अधिकारी

पाइंटर

जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण

प्रकार पहिला डोस दुसरा डोस

आरोग्य कर्मचारी १९,१७५ १२,९११

फ्रंटलाइन वर्कर २९,२७९ १२,०६७

१८ ते ४४ वयोगट १८,३५३ ०७

४५ ते ५९ वयोगट १,३१,५५५ २७५४१

६० वर्षांवरील १,४६,३५७ ५३,७९६