शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सुरुवातीला केंद्रांवर शुकशुकाट, आता गर्दी आवरेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:10 IST

(असाइनमेंट) अमरावती : लसीकरणाच्या सुरुवातीच्या काळात सर्वच केंद्रांवर गर्दी कमी होती. मात्र, दुसऱ्या लाटेने सर्वांचे गैरसमज दूर झाले व ...

(असाइनमेंट)

अमरावती : लसीकरणाच्या सुरुवातीच्या काळात सर्वच केंद्रांवर गर्दी कमी होती. मात्र, दुसऱ्या लाटेने सर्वांचे गैरसमज दूर झाले व आता लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी आवरेनासी झाली आहे. जिल्ह्यात लसींचा तुटवडा असल्याने चार-चार दिवस केंद्र बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर ओढावली आहे. शहरात पहाटे चार वाजेपासून केंद्रांवर रांगा लागत आहेत, दिवसभर रांगेत राहून टोकन भेटत नसल्याने शहरातले नागरिक लस घ्यायला ग्रामीण भागात धाव घेत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या सहा केंद्रांवर लसीकरण झाले व आता १३६ केंद्रे आहेत. सुरुवातीला पहिल्या दोन टप्प्यांतीलही लसीकरण कमी व्हायचे. लसीकरणाची एक सुप्त भीती वाटत असल्याने एका केंद्रांवर दिवसभरात १०० डोज होत नव्हते, टार्गेटदेखील पूर्ण होत नसल्याने आरोग्य विभागाद्वारे जनजागृती करण्यात आली व लसीकरणासाठी पाच टप्पे निश्चित करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठी मोठी गर्दी केंद्रांवर व्हायला लागली. त्यानंतर १८ ते ४४ वयोगटासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली व प्रत्येक केंद्रावर पहाटे चार ते पाच वाजेपासून रांगा सुरू झाल्या, त्या अजूनही रोज लागताहेत.

जिल्ह्यातील लसीकरणात खरा खोडा हा पुरवठ्याचा आहे. चार लाख डोजची मागणी असताना १०, २० हजार डोज प्राप्त होत असल्याने जिल्ह्यातील अर्धेअधिक केंद्रे बंद करण्याची वेळ आरोग्य विभागावर ओढवली आहे.

बॉक्स

लसीकरणाविषयी असे होते गैरसमज

लसीकरणाच्या सुरुवातीच्या काळात महिलांचे गैरसमज होते. मासिक काळात लस घेता येत नाही. मात्र, याविषयी तज्ज्ञांनी सातत्याने स्पष्ट केल्यामुळे आता सर्व महिला लसीकरणाचा टक्का वाढला आहे. जिल्ह्यात आदिवासीबहुल मेळघाटात सर्वाधिक गैरसमज होते. याविषयी तेथील अधिकारी, पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत मेळघाटातील चित्र आता बदलविले आहे. याशिवाय लसीकरणामुळे वंध्यत्व, नपुंसकता आदी गैरसमज होते. याविषयी जिल्हा व आरोग्य प्रशासनाद्वारा त्या-त्या भागातील मान्यवरांशी संवाद साधला व त्यानंतर आता कुठे या भागातील लसीकरणाचा टक्का वाढला आहे.

कोट

गावकऱ्यांचा समज, संभ्रम दूर

कोट

लसीकरणाविषयी मनात भीती होती, लस घेतल्यानंतर ताप येतो, आजारी पडतो, असे ऐकले होते. मात्र, परिवारातील काहींनी लस घेतल्यानंतर हे गैरसमज आता दूर झाले आहेत. लस घेतल्याने कुठलाच त्रास झालेला नाही. त्यामुळे कुटुंबातील सर्वांनी लस घ्यावी, असा आग्रह धरला व लसीकरण केले आहे.

रामदासराव बोंडे, अमरावती

कोट

कोरोना लस घेतल्यावर काही दिवस काम करता येणार नाही असे वाटत होते. काहींना तापदेखील आला होता. मात्र, कोरोनामुळे गावात अनेकांचा मृत्यू झाला आहे. काहींची प्रकृती गंभीर झाली आहे. त्यामुळे सर्व विचार डोक्यातून काढून पहिल्यांदा लस घेतली. कुठलाही त्रास झाला नाही. लस घेतल्याने कुठलाही त्रास नाही.

भूषण देशमुख, चांदूर बाजार

कोट

सुरुवातीला कमी प्रतिसाद होता. आरोग्य विभागाद्वारा सातत्याने जनजागृती करण्यात आल्यानंतर प्रतिसाद वाढला आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने मोहीम मंदावते.

डॉ. दिलीप रणमले

जिल्हा आरोग्य अधिकारी

पाइंटर

जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण

प्रकार पहिला डोस दुसरा डोस

आरोग्य कर्मचारी १९,१७५ १२,९११

फ्रंटलाइन वर्कर २९,२७९ १२,०६७

१८ ते ४४ वयोगट १८,३५३ ०७

४५ ते ५९ वयोगट १,३१,५५५ २७५४१

६० वर्षांवरील १,४६,३५७ ५३,७९६