शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

गुलाबी बोंडअळींचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 06:01 IST

कीटकनाशकाची फवारणी शक्यतो सकाळी व संध्याकाळी हवेच्या दिशेने करावी. संरक्षण किटशिवाय फवारणी करु नये, कीटकनाशकांची हाताळणी करताना सदैव जागृत राहावे, शेतकरी किंवा शेतमजुराने उपाशीपोटी फवारणी न करता न्याहारी करावी, सलग दिवस फवारणी करू नये, आजारी किंवा शरीराला जखम असल्यास अश्या व्यक्तीने फवारणी करू नये.

ठळक मुद्देकृषी विभाग : फेरोमेन ट्रॅप, लाईट ट्रॅप, निमअर्काची फवारणी आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कपाशीच्या क्षेत्रात वाढ झालेली आहे. समाधानकारक पावसाने पिकाची वाढ होत आहे. पीक पात्या फुलोरावर असल्याने गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करण्याकरिता प्रति हेक्टरी ५ फेरोमन ट्रॅपचा वापर करणे, लाईट ट्रॅप लावणे, निम अर्काची फवारणी करणे, वेळीच गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन व डोमकळी नष्ट करणे महत्वाचे असल्याची माहिती कृषी विकास अधिकाऱ्यांनी दिली.सद्यस्थितीत कपाशी पीक फुलोरा येण्याच्या अवस्थेत असून यंदा देखील कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच काही भागात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी विभाग, प्रादेशिक संशोधन केंद्र व कृषी विज्ञान केंद्र आदीच्या मार्गदर्शनात उपाययोजना करणे महत्वाचे आहे.मागील वर्षी खरीप हंगामामध्ये जिल्ह्यामध्ये कीटकनाशके फवारणीमुळे शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाल्याचे दिसून आले. यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकरी, शेतमजुरांना फवारणीमुळे विषबाधा होवू नये याकरिता सावध राहून खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्याकरिता कीटकनाशके खरेदी करताना पिकावरील येणाऱ्या किडीकरिता शिफारशीत कीटकनाशकाची खरेदी परवानाधारक कृषी केंद्रातूनच करावी. कीटकनाशके खरेदीचे पक्के बिल घ्यावे, फवारणी करताना विषबाधा झाल्यास प्रथमोपचार करून ताबडतोब प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होवून उपचार करून घ्यावा, कीटकनाशके फवारणी करताना कृषी विभागामार्फत तालुकास्तरीय व गावस्तरीय तसेच शेतीशाळेकडून होत असलेल्या मार्गदर्शनाचा फायदा घ्यावा. सर्व शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन जिल्हाधिकारी व कृषी विभागाद्वारा शेतकरी, शेतमजुरांना करण्यात येत आहे.फवारणी करताना खबरदारी आवश्यककीटकनाशकाची फवारणी शक्यतो सकाळी व संध्याकाळी हवेच्या दिशेने करावी. संरक्षण किटशिवाय फवारणी करु नये, कीटकनाशकांची हाताळणी करताना सदैव जागृत राहावे, शेतकरी किंवा शेतमजुराने उपाशीपोटी फवारणी न करता न्याहारी करावी, सलग दिवस फवारणी करू नये, आजारी किंवा शरीराला जखम असल्यास अश्या व्यक्तीने फवारणी करू नये. तसेच जे मजूर फक्त कीटकनाशके फवारणीचे काम करतात त्यांनी आरोग्य विभागाकडून नियमित तपासणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

टॅग्स :agricultureशेती