शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

कपाशीवर ‘लाल्या’चा प्रादुर्भाव

By admin | Updated: October 26, 2015 00:42 IST

जमिनीत आर्द्रतेचा अभाव, अन्नद्रव्याची कमतरता, वातावरणातील बदल व रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव यामुळे जिल्ह्यातील काही भागांत कपाशीवर ‘लाल्या’चा प्रादुर्भाव झाला आहे.

अमरावती : जमिनीत आर्द्रतेचा अभाव, अन्नद्रव्याची कमतरता, वातावरणातील बदल व रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव यामुळे जिल्ह्यातील काही भागांत कपाशीवर ‘लाल्या’चा प्रादुर्भाव झाला आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने वेळीच व्यवस्थापन न केल्यास उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीननंतर सर्वाधिक १ लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीचे पीक आहेत. मध्यम स्वरुपाच्या जमिनीतील कपाशीची पाने लाल होण्यास सुरुवात झाली आहे. साधारणपणे बीटीची लागवड सुरू झाल्यापासून लाल्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. सुरुवातीला पक्व झालेले पाने लाल झालेले दिसून येते. नंतर संपूर्ण पाने लाल होतात व पूर्ण कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते. यामुळे उत्पादनात १० ते ६० टक्क्यांपर्यंत घट आल्याची उदाहरणे आहेत. लक्षणे ओळखून उपाययोजना करणे गरजेचे आहे. बी.टी. कपाशी वाण भरपूर उत्पन्न देणारे असल्यामुळे झाडाला सर्वाधिक पात्या, फुले व बोंडे लागतात. त्यांच्या पोषणासाठी जर जमिनीत मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये कमी असल्यास किंवा नत्र स्फुरद व पालाश ही खते समप्रमाणात व शिफारसीत दिलेली नसल्यास पाने लाल होतात. कपाशीमध्ये कायिक वाढीच्या काळात नत्राची कमतरता झाल्यास नत्राच्या कमी वहनामुळे प्रथिनांचे प्रमाण घटून पेशी द्रव्यांचा सामू कमी होऊन ‘टॅनीनची’ मात्रा वाढल्यामुळे पाने लाल होतात. जमीन सतत ओली असल्यास पोटॅशसुध्दा कमी प्रमाणात स्थिर होतो. लाल्यामुळे कॅलशियम, मॅग्नेशियम व पोटॅश या अन्नद्रव्यांच्या शोषण क्षमतेवरही विपरीत परिणाम झाल्याचे व सुदृढ झाडाच्या पानांच्या तुलनेत लाल पानांमध्ये नत्र, स्फुरद व पालाश कमी झाल्याचे आढळून आले आहेत. (प्रतिनिधी)