शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

चांदूर बाजारात रेशन वाटपात निकृष्ट धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:16 IST

अखाद्य धान्याचा पुरवठा; नागरिकांचा आरोप, रेशन साहित्य मोफत बदलून घेण्याची दुकानदारांना सुविधा चांदूर बाजार : रेशन पुरवठा योजनेंतर्गत धान्याचा ...

अखाद्य धान्याचा पुरवठा; नागरिकांचा आरोप, रेशन साहित्य मोफत बदलून घेण्याची दुकानदारांना सुविधा

चांदूर बाजार : रेशन पुरवठा योजनेंतर्गत धान्याचा पुरवठा वाटपासाठी शासनातर्फे रेशन दुकानदारांना पुरवठा केला जातो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून शासनाकडून निकृष्ट धान्य पुरवण्यात येत आहे. हे निकृष्ट धान्य पुरविण्याचा उद्देश काय, अखाद्य दर्जाचे धान्य पुरवून शासन गरिबांच्या जिवावर उठले आहे का, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत असल्याची ओरड नागरिकांतर्फे केली जात आहे. दुसरीकडे रेशन साहित्य मोफत बदलून घेण्याची दुकानदारांना सुविधा असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

कोणताही गरीब व्यक्ती,उपाशी राहणार नाही, याची काळजी घेत सरकारकडून अत्यल्प दरात धान्य तालुक्यातील परवानाधारक दुकानदारांमार्फत प्रत्येक गावातील गरजू लाभार्थींपर्यंत पोहचविले जाते.यासाठी शासनाकडून रेशन दुकानदारांच्या दुकानापर्यंत धान्य विनाखर्चाने पोहचविण्यात येते. या धान्यात प्रत्येक महिन्यात काही प्रमाणात, सडलेल्या अवस्थेतील अतिशय निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवण्यात येत आहे. नागरिकांना हे अखाद्य धान्य नाइलाजाने खावे लागत आहे.

ऑगस्ट महिण्यात मोफत धान्य योजनेंतर्गत तालुक्यात १४१ रेशन दुकानदारांना ९ हजार १४३ क्विंटल गव्हाचा साठा पुरविण्यात आला होता. या धान्यात काही प्रमाणात अतिशय निकृष्ट गहू आहे. मोफत असले तरी लाभार्थी त्याला स्पष्ट नकार देत आहेत. रेशन दुकानदारांच्या म्हनण्यानुसार, दरमहा एकूण धान्यांच्या चार ते पाच टक्के निकृष्ट धान्याचा पुरवठा होत आहे. हे निकृष्ट धान्य सर्वच रेशन दुकानदारांना पोहोचते असे नाही. काहींना एखाद दोन कट्टे जातात, तर काहींना काहीच नाही. हे निकृष्ट धान्य सर्वच राशन दुकानदारांपर्यंत जात नसल्यामुळे त्याचा फारसा बोभाटा होत नाही. ज्याच्या नशिबी निकृष्ट धान्य पोहोचते, त्याला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो, हे वास्तव आहे.

--------------

निकृष्ट धान्य शासन रेशन दुकानदारांकडून स्वत: परत घेते. याचा कोणताही भुर्दंड रेशन दुकानदारांवर लावला जात नाही. याबाबत स्पष्ट सूचना आमच्या कार्यालयाकडून रेशन दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. जर कोणत्याही रेशन दुकानदाराकडे निकृष्ट दर्जाचे धान्य असेल, तर त्यांनी याबाबत पुरवठा विभागाला माहीती द्यावी. तालुका पूरवठा विभागाकडून तेवढेच धान्य त्यांना बदलून देण्यात येईल.

- राहुल केदारे, तालुका पुरवठा निरीक्षक, चांदूर बाजार.