शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

चांदूर बाजारात रेशन वाटपात निकृष्ट धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:16 IST

अखाद्य धान्याचा पुरवठा; नागरिकांचा आरोप, रेशन साहित्य मोफत बदलून घेण्याची दुकानदारांना सुविधा चांदूर बाजार : रेशन पुरवठा योजनेंतर्गत धान्याचा ...

अखाद्य धान्याचा पुरवठा; नागरिकांचा आरोप, रेशन साहित्य मोफत बदलून घेण्याची दुकानदारांना सुविधा

चांदूर बाजार : रेशन पुरवठा योजनेंतर्गत धान्याचा पुरवठा वाटपासाठी शासनातर्फे रेशन दुकानदारांना पुरवठा केला जातो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून शासनाकडून निकृष्ट धान्य पुरवण्यात येत आहे. हे निकृष्ट धान्य पुरविण्याचा उद्देश काय, अखाद्य दर्जाचे धान्य पुरवून शासन गरिबांच्या जिवावर उठले आहे का, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत असल्याची ओरड नागरिकांतर्फे केली जात आहे. दुसरीकडे रेशन साहित्य मोफत बदलून घेण्याची दुकानदारांना सुविधा असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

कोणताही गरीब व्यक्ती,उपाशी राहणार नाही, याची काळजी घेत सरकारकडून अत्यल्प दरात धान्य तालुक्यातील परवानाधारक दुकानदारांमार्फत प्रत्येक गावातील गरजू लाभार्थींपर्यंत पोहचविले जाते.यासाठी शासनाकडून रेशन दुकानदारांच्या दुकानापर्यंत धान्य विनाखर्चाने पोहचविण्यात येते. या धान्यात प्रत्येक महिन्यात काही प्रमाणात, सडलेल्या अवस्थेतील अतिशय निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवण्यात येत आहे. नागरिकांना हे अखाद्य धान्य नाइलाजाने खावे लागत आहे.

ऑगस्ट महिण्यात मोफत धान्य योजनेंतर्गत तालुक्यात १४१ रेशन दुकानदारांना ९ हजार १४३ क्विंटल गव्हाचा साठा पुरविण्यात आला होता. या धान्यात काही प्रमाणात अतिशय निकृष्ट गहू आहे. मोफत असले तरी लाभार्थी त्याला स्पष्ट नकार देत आहेत. रेशन दुकानदारांच्या म्हनण्यानुसार, दरमहा एकूण धान्यांच्या चार ते पाच टक्के निकृष्ट धान्याचा पुरवठा होत आहे. हे निकृष्ट धान्य सर्वच रेशन दुकानदारांना पोहोचते असे नाही. काहींना एखाद दोन कट्टे जातात, तर काहींना काहीच नाही. हे निकृष्ट धान्य सर्वच राशन दुकानदारांपर्यंत जात नसल्यामुळे त्याचा फारसा बोभाटा होत नाही. ज्याच्या नशिबी निकृष्ट धान्य पोहोचते, त्याला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो, हे वास्तव आहे.

--------------

निकृष्ट धान्य शासन रेशन दुकानदारांकडून स्वत: परत घेते. याचा कोणताही भुर्दंड रेशन दुकानदारांवर लावला जात नाही. याबाबत स्पष्ट सूचना आमच्या कार्यालयाकडून रेशन दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. जर कोणत्याही रेशन दुकानदाराकडे निकृष्ट दर्जाचे धान्य असेल, तर त्यांनी याबाबत पुरवठा विभागाला माहीती द्यावी. तालुका पूरवठा विभागाकडून तेवढेच धान्य त्यांना बदलून देण्यात येईल.

- राहुल केदारे, तालुका पुरवठा निरीक्षक, चांदूर बाजार.