शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

चांदूर बाजारात रेशन वाटपात निकृष्ट धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:16 IST

अखाद्य धान्याचा पुरवठा; नागरिकांचा आरोप, रेशन साहित्य मोफत बदलून घेण्याची दुकानदारांना सुविधा चांदूर बाजार : रेशन पुरवठा योजनेंतर्गत धान्याचा ...

अखाद्य धान्याचा पुरवठा; नागरिकांचा आरोप, रेशन साहित्य मोफत बदलून घेण्याची दुकानदारांना सुविधा

चांदूर बाजार : रेशन पुरवठा योजनेंतर्गत धान्याचा पुरवठा वाटपासाठी शासनातर्फे रेशन दुकानदारांना पुरवठा केला जातो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून शासनाकडून निकृष्ट धान्य पुरवण्यात येत आहे. हे निकृष्ट धान्य पुरविण्याचा उद्देश काय, अखाद्य दर्जाचे धान्य पुरवून शासन गरिबांच्या जिवावर उठले आहे का, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत असल्याची ओरड नागरिकांतर्फे केली जात आहे. दुसरीकडे रेशन साहित्य मोफत बदलून घेण्याची दुकानदारांना सुविधा असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

कोणताही गरीब व्यक्ती,उपाशी राहणार नाही, याची काळजी घेत सरकारकडून अत्यल्प दरात धान्य तालुक्यातील परवानाधारक दुकानदारांमार्फत प्रत्येक गावातील गरजू लाभार्थींपर्यंत पोहचविले जाते.यासाठी शासनाकडून रेशन दुकानदारांच्या दुकानापर्यंत धान्य विनाखर्चाने पोहचविण्यात येते. या धान्यात प्रत्येक महिन्यात काही प्रमाणात, सडलेल्या अवस्थेतील अतिशय निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवण्यात येत आहे. नागरिकांना हे अखाद्य धान्य नाइलाजाने खावे लागत आहे.

ऑगस्ट महिण्यात मोफत धान्य योजनेंतर्गत तालुक्यात १४१ रेशन दुकानदारांना ९ हजार १४३ क्विंटल गव्हाचा साठा पुरविण्यात आला होता. या धान्यात काही प्रमाणात अतिशय निकृष्ट गहू आहे. मोफत असले तरी लाभार्थी त्याला स्पष्ट नकार देत आहेत. रेशन दुकानदारांच्या म्हनण्यानुसार, दरमहा एकूण धान्यांच्या चार ते पाच टक्के निकृष्ट धान्याचा पुरवठा होत आहे. हे निकृष्ट धान्य सर्वच रेशन दुकानदारांना पोहोचते असे नाही. काहींना एखाद दोन कट्टे जातात, तर काहींना काहीच नाही. हे निकृष्ट धान्य सर्वच राशन दुकानदारांपर्यंत जात नसल्यामुळे त्याचा फारसा बोभाटा होत नाही. ज्याच्या नशिबी निकृष्ट धान्य पोहोचते, त्याला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो, हे वास्तव आहे.

--------------

निकृष्ट धान्य शासन रेशन दुकानदारांकडून स्वत: परत घेते. याचा कोणताही भुर्दंड रेशन दुकानदारांवर लावला जात नाही. याबाबत स्पष्ट सूचना आमच्या कार्यालयाकडून रेशन दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. जर कोणत्याही रेशन दुकानदाराकडे निकृष्ट दर्जाचे धान्य असेल, तर त्यांनी याबाबत पुरवठा विभागाला माहीती द्यावी. तालुका पूरवठा विभागाकडून तेवढेच धान्य त्यांना बदलून देण्यात येईल.

- राहुल केदारे, तालुका पुरवठा निरीक्षक, चांदूर बाजार.