शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

वरूडमध्ये संत्र्यावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव

By admin | Updated: August 11, 2016 00:07 IST

बदलत्या वातावरणाने अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने विदर्भाच्या कॅलिफोर्नियातील संत्रा आंबिया बहाराला गळती लागल्याने...

आंबिया बहराला गळती : कृषी विभागाद्वारे व्हावे सर्वेक्षण वरुड : बदलत्या वातावरणाने अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने विदर्भाच्या कॅलिफोर्नियातील संत्रा आंबिया बहाराला गळती लागल्याने संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाले आहेत. संत्रा गळतीचे प्रमाण ५० टक्के असल्याने या संकटातून कसे सावरायचे? असा प्रश्न संत्रा उत्पादकांपुढे उभा ठाकला आहे. या नुकसानीचे सर्वेक्षण करून कृषी विभागाने तातडीच्या उपाययोजना सुचविण्याची मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. तालुक्यात २१ हजार ५०० हेक्टर जमिनीत संत्रा झाडे आहेत. यापैकी २१ हजार ५०० हेक्टर जमिनीवर फळे देणारी संत्रा झाडे आहेत. संत्र्याचे दोन बहार संत्रा उत्पादक घेतात. यामध्यो आंबिया बहार जानेवारीमध्ये येतो तर दुसरा मृग बहार मृग नक्षत्रामध्ये निसर्गावर अवलंबून असतो. यावर्षी सुरुवातीपासून पावसाने दडी मारल्याने मृग बहाराचे संत्रा पीक आले नाही. मात्र, डिसेंबरपासून तापमानात वाढ झाल्याने तडी दिलेल्या संत्रा झाडावर आंबिया बहार चांगला फुलला होता. उन्हाळयात अतिउष्णतापमान असताना सुद्धा संत्रा उत्पादकांनी पाण्यासारखा पैसा खर्च करुन आंबिया बहार टिकविला. मात्र, अल्पशा पावसामुळे बुरशी, फायटोपथोरा तसेच देठतुटीसह अज्ञात रोगांनी थैमान घातल्याने संत्रा आंबिया बहाराला मोठ्या प्रमाणात गळती सुरु आहे. ओल्या दुष्काळामुळे संत्रा उत्पादकांच्या हातचे नगदी पीक जाण्याची शक्यता बळावली आहे. गळलेला संत्रा दिवसागणिक शेतकऱ्यांची चिंता वाढवित असल्याने यावर उपाययोजना सुचविण्याकरीता कृषी विभागाने सर्वेक्षण करावे, अशी मागणी संत्रा उत्पादकांनी केली आहे. संत्रा उत्पादन घेणाऱ्या पंढरी,सावंगी,गणेशपूर,जामठी,वरुड, सुरळी, आमनेर, एकदरा, झटामझिरी, पिंपळशेंडा, आंतरखोप, बहादा, वाई, राजुराबाजार, हातुर्णा, उदापूर, बेनोडा,बारगांव, जामगांव, बेनोडा, लोणी, जरुड, टेंभुरखेडा, गव्हाणकुंड, तिवसाघाट, शेंदूरजनाघाट, पुसला, लोहदरा, देऊतवाडा परिसरातील संत्रा बागांमधील आंबिया बहाराची मोठया प्रमाणात गळती सुरु असल्याने संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिपावसामुळे अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने ५० टक्के आंबिया बहार गळाला आहे. शासनाने कृषी विभागाची पथके पाठवून रोगाचे कारण शोधून उपाय सुचविणे तसेच संकटात सापडलेल्या संत्रा उत्पादकांना मदत करणे गरजेचे आहे. अन्यथा मेटाकुटीस आलेला संत्रा उत्पादक पुन्हा कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांना सावरण्यासाठी तातडीने नुकसानभरपाई देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)