शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

गणवेशाविनाच विद्यार्थी साजरा करणार स्वातंत्र्यदिन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:03 IST

स्वातंत्र्यदिनी गणवेश परिधान करून शाळेत जाण्याचे स्वप्न पाहणाºया इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे हे स्वप्न साकार होणार नसल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्वातंत्र्यदिनी गणवेश परिधान करून शाळेत जाण्याचे स्वप्न पाहणाºया इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे हे स्वप्न साकार होणार नसल्याचे चित्र आहे.१५ आॅगस्टला शाळांच्या मैदानात गणवेशात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्याच्या साक्षीने ध्वजारोहण होत असते. दरवर्षीचा हा अनुभव यंदा मात्र विद्यार्थ्यांना घेता येणार नाही. गणवेश पुरविण्याच्या धोरणात शासनाने केलेल्या बदलामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. गणवेश खरेदीसाठी पालकांना प्रत्येकी दोनशे रूपयेप्रमाणे चारशे रूपये अनुदान दिले जाणार आहे. पण, व्यावहारिक त्रुटींमुळे योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र जि.प. शाळांमध्ये दिसून येत आहे.पूर्वी गणवेशाची रक्कम संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांच्या खात्यात जमा केली जात होती. शाळा समितीच्या शिफारसीवरून गणवेशाची खरेदी करण्यात येत होती. मात्र, यात भष्टाचार होत असल्याच्या तक्रारी शासनाला मिळाल्याने योजनेत बदल करण्यात आला. आता पालकांनी गणवेश खरेदी करून देयक शाळेत सादर केल्यास विद्यार्थी-पालकांच्या संयुक्त खात्यात चारशे रूपये जमा केले जातात.खात्यासाठी हजार रुपयांचा खर्चगणवेशासाठी विद्यार्थी व त्याच्या आईच्या नावे संयुक्त खाते उघडावे लागते. त्यासाठी किमान १ हजार रूपये खर्च येतो. कारण काही रक्कम खाते उघडताना बँकेत जमा ठेवावी लागते. दुसरे म्हणजे दोनशे रूपयांत एक गणवेश होतच नाही. म्हणजेच पालकांना त्यांच्या जवळचे पैसे टाकून गणवेश खरेदी करावे लागतात. जिल्ह्यात दीड हजारांवर शाळा असून १ लाख १८ हजार ७४६ विद्यार्थी गणवेशासाठी पात्र ठरले आहेत. गणवेश खरेदीसाठी ४ कोटी ७४ लाख ९८ हजार रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे.अनंत अडचणीग्रामीण भागातील पालकांना गणवेश खरेदीसाठी तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. ही बाब परवडण्यासारखी नाही. ग्रामीण भागात मजूर, शेतकरी व आदिवासींची आर्थिक परिस्थिती जादाची गुंतवणूक करण्याची नाही. त्यामुळे गणवेश खरेदी करण्याच्या भानगडीत पालक पडत नाहीत. काही अपवादात्मक शाळांमध्ये शंभर टक्के गणवेश विद्यार्थ्यांनी घेतल्याचे शिक्षण विभाग सांगत आहे. प्रत्यक्षात अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी गणवेश खरेदी केला नसल्याचे चित्र आहे.गणवेशासाठी विद्यार्थी व आईचे बँक खाते काढताना काही अडचणी होत्या. ग्रामशिक्षण समितीमार्फत गणवेश खरेदीसाठी शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत- जयश्री राऊतप्रभारी शिक्षणाधिकारीप्राथमिक