शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल; पित्याच्या आत्महत्याप्रकरणी चार जणांना अटक
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

गणवेशाविनाच विद्यार्थी साजरा करणार स्वातंत्र्यदिन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:03 IST

स्वातंत्र्यदिनी गणवेश परिधान करून शाळेत जाण्याचे स्वप्न पाहणाºया इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे हे स्वप्न साकार होणार नसल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्वातंत्र्यदिनी गणवेश परिधान करून शाळेत जाण्याचे स्वप्न पाहणाºया इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे हे स्वप्न साकार होणार नसल्याचे चित्र आहे.१५ आॅगस्टला शाळांच्या मैदानात गणवेशात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्याच्या साक्षीने ध्वजारोहण होत असते. दरवर्षीचा हा अनुभव यंदा मात्र विद्यार्थ्यांना घेता येणार नाही. गणवेश पुरविण्याच्या धोरणात शासनाने केलेल्या बदलामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. गणवेश खरेदीसाठी पालकांना प्रत्येकी दोनशे रूपयेप्रमाणे चारशे रूपये अनुदान दिले जाणार आहे. पण, व्यावहारिक त्रुटींमुळे योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र जि.प. शाळांमध्ये दिसून येत आहे.पूर्वी गणवेशाची रक्कम संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांच्या खात्यात जमा केली जात होती. शाळा समितीच्या शिफारसीवरून गणवेशाची खरेदी करण्यात येत होती. मात्र, यात भष्टाचार होत असल्याच्या तक्रारी शासनाला मिळाल्याने योजनेत बदल करण्यात आला. आता पालकांनी गणवेश खरेदी करून देयक शाळेत सादर केल्यास विद्यार्थी-पालकांच्या संयुक्त खात्यात चारशे रूपये जमा केले जातात.खात्यासाठी हजार रुपयांचा खर्चगणवेशासाठी विद्यार्थी व त्याच्या आईच्या नावे संयुक्त खाते उघडावे लागते. त्यासाठी किमान १ हजार रूपये खर्च येतो. कारण काही रक्कम खाते उघडताना बँकेत जमा ठेवावी लागते. दुसरे म्हणजे दोनशे रूपयांत एक गणवेश होतच नाही. म्हणजेच पालकांना त्यांच्या जवळचे पैसे टाकून गणवेश खरेदी करावे लागतात. जिल्ह्यात दीड हजारांवर शाळा असून १ लाख १८ हजार ७४६ विद्यार्थी गणवेशासाठी पात्र ठरले आहेत. गणवेश खरेदीसाठी ४ कोटी ७४ लाख ९८ हजार रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे.अनंत अडचणीग्रामीण भागातील पालकांना गणवेश खरेदीसाठी तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. ही बाब परवडण्यासारखी नाही. ग्रामीण भागात मजूर, शेतकरी व आदिवासींची आर्थिक परिस्थिती जादाची गुंतवणूक करण्याची नाही. त्यामुळे गणवेश खरेदी करण्याच्या भानगडीत पालक पडत नाहीत. काही अपवादात्मक शाळांमध्ये शंभर टक्के गणवेश विद्यार्थ्यांनी घेतल्याचे शिक्षण विभाग सांगत आहे. प्रत्यक्षात अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी गणवेश खरेदी केला नसल्याचे चित्र आहे.गणवेशासाठी विद्यार्थी व आईचे बँक खाते काढताना काही अडचणी होत्या. ग्रामशिक्षण समितीमार्फत गणवेश खरेदीसाठी शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत- जयश्री राऊतप्रभारी शिक्षणाधिकारीप्राथमिक