शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

बँकेच्या अधिकारावरून सत्ताधारी-विरोधकांत जुंपली; अध्यक्ष म्हणतात अधिकाराने निर्णय

By जितेंद्र दखने | Updated: August 21, 2023 20:48 IST

विरोधकांचा बहुमताचा सूर, बँकेच्या संचालक मंडळाची सभा ११ ऑगस्टला काेरमअभावी स्थगित केली होती

अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सत्ताबदल झाल्यानंतर पहिल्याच स्थगिती करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अधिकाराच्या विषयावर सत्ताधारी आणि विरोधी संचालकांमध्ये चांगली जुंपली. यात बँकेचे अध्यक्ष म्हणतात पूर्वीच्या निर्णयानुसार अध्यक्षाचा निर्णय अंतिम राहील. मात्र विरोधात असलेले १३ संचालक म्हणतात कुठलाही निर्णय बहुमतानेच व्हावा. या विषयावर जिल्हा बँकेच्या सभेत चांगलाच कलगीतुरा रंगला होता.

 बँकेच्या संचालक मंडळाची सभा ११ ऑगस्टला काेरमअभावी स्थगित केली होती. पुन्हा ही सभा २१ ऑगस्ट रोजी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात आली होती. सभेच्या प्रारंभी निवडणुकीसाठी वकिलांना दिलेल्या दोन लाखांचा हिशेब  यापूर्वीच्या संचालक मंडळाने द्यावा असा प्रश्न संचालक रविंद्र गायगोले यांनी उपस्थित केला. परंतु हा मुद्दा सर्व संचालकांच्या सहमतीने मंजूर केल्याचे बबलू देशमुख यांनी सांगितले. याशिवाय आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याच्या विषयावर सभेत वादंग झाला. तर अध्यक्षांना मागील सभेने दिलेले विशेषाधिकार काढण्यात यावे अशी मागणी  विरोधी संचालकांनी पत्राव्दारे केली. परंतू अधिकार काढण्याचा नियम नसल्याचा मुद्दा उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी उपस्थित केला. मात्र, त्यावेळी संचालक मंडळाने हे अधिकार अध्यक्षांना बहुमताने दिले होते. आता मात्र ते आम्हाला मान्य नाही. असे विरोधक संचालकांना मान्य नसल्याचे सभेत सांगितले.तसे पत्रही सभेपूर्वीच दिले आहे. मात्र पत्र देवून चालणार नाही तर सभेत प्रत्येकांनी आपले मत नोंदवावे ते नमूद केले जाईल. बाकी अधिकार अध्यक्षांचे असल्याचा दावा यावेळी आ. बच्चू कडू यांनी केला. मात्र विरोधकांनी हा दावा फेटाळून लावला.

यावेळी सभेच्या पटलावर २९ विषय होते. यापैकी काही विषयांना विरोधकांनी मंजूरीस विरोध केला. तर काही विषय चर्चेसाठी ठेवले. तर काही मुद्यावर विरोधकांचे मत नोंदविले. सभेला अध्यक्ष आ. बच्चू कडू, उपाध्यक्ष अभिजित ढेपे, सभेला विरोधक गटातील संचालक बबलूृ देशमुख, वीरेंद्र जगताप, आ. बळवंत वानखडे, हरिभाऊ मोहोड, सुरेखा ठाकरे, सुनील वऱ्हाडे, दयाराम काळे, बाळासाहेब अलोणे, मोनिका मार्डीकर, प्रकाश काळबांडे, सुरेश साबळे, श्रीकांत गावंडे, सत्ताधारी गटातील आनंद काळे, चित्रा डाहणे, नरेशचंद्र ठाकरे, रवींद्र गायगोले, अजय मेहकरे, जयप्रकाश पटेल उपस्थित होते.