शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

धामणगावात वाढतोय हृदयविकाराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 05:00 IST

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाले. तब्बल तीन महिने सर्वच कुटुंब एका ठिकाणी असल्याने अनेकांनी आपल्या दैनंदिनीत व्यायामाला महत्त्व दिले नाही. अनलॉक घोषित झाल्यानंतर सरकारने पहाटेच्या रपेटीला परवानगी दिली. मात्र, पहाटे ५ वाजता उठून रस्त्यावर फिरणे सोडाच, गच्चीवरील चार पायऱ्यादेखील चढण्याचा कंटाळा हा अनेकांचा स्वभाव झाला आहे.

ठळक मुद्दे१२ जणांना झटका : तिघांचा मृत्यू, व्यायामाचा अभाव प्रमुख समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : कोरोनामुळे बदललेली जीवनशैली, त्यात व्यायामाचा अभाव असल्याने हृदयविकाराचा धोका वाढला आहे. लॉकडाऊनच्या काळात तालुक्यात १२ जणांना हृदयविकाराचा झटका आला, तर तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाले. तब्बल तीन महिने सर्वच कुटुंब एका ठिकाणी असल्याने अनेकांनी आपल्या दैनंदिनीत व्यायामाला महत्त्व दिले नाही. अनलॉक घोषित झाल्यानंतर सरकारने पहाटेच्या रपेटीला परवानगी दिली. मात्र, पहाटे ५ वाजता उठून रस्त्यावर फिरणे सोडाच, गच्चीवरील चार पायऱ्यादेखील चढण्याचा कंटाळा हा अनेकांचा स्वभाव झाला आहे. विशेषत: दररोज घरी तेलकट पदार्थ खाणे व बेडवर विश्रांती करणे एवढेच काम केल्यामुळे हृदयविकाराचा धोका अधिक वाढला आहे. हृदयविकारामुळे तालुक्यात तिघांना आपला जीव गमवावा लागला. यात ५६ ते ६९ वयोगटातील रुग्णांचा समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून अनेक गंभीर आजारांकडे दुर्लक्ष केले जात आहे. एखाद्याला छातीत दुखत जरी असेल तरी जिल्हा रुग्णालयात गेल्यावर सर्वप्रथम कोरोनाची तपासणी केली जाते, अशा अनेकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे हृदयविकाराची लक्षणे दिसत असले तरी अनेकांनी तपासणी करून घेतली नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे तालुक्यात हृदयविकाराचा धोका वाढला आहे. आतापर्यंत चार महिन्यांत १२ जणांना हृदयविकाराचा झटका आला असल्याची माहिती तालुक्यातील वैद्यकीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.अशी घ्या हृदयाची काळजीपहाटे उठून रपेट मारा व योगा करा. घर किंवा कार्यालयाच्या पायºया चढणे हा हृदय निरोगी राखण्याचा सर्वांत सोपा उपाय आहे. पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असतात. या घटकांचा हृदय निरोगी राखण्यामध्ये महत्त्वाचा सहभाग असतो. त्यामुळे जेवणात पालेभाज्यांचा समावेश करा. मात्र, एकाच वेळी जास्त अन्न खाल्ल्याने पचनक्रियेवर आणि हृदयावर विपरीत परिणाम होतो. मिठाचा वापर जास्त केल्याने शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. हे कोलेस्टेरॉल हृदयासाठी अतिशय घातक ठरू शकते. नेहमी ताण राहिल्यास त्याचा प्रभाव हृदयावर पडतो. म्हणून मनमोकळे राहा. व्यसनांपासून दूर राहिल्यास हृदयविकाराचा धोका संभवत नाही.कोलेस्टेरॉलचा थर धोकादायकआपल्या शरीरातील रक्तवाहिनीच्या पोकळीत कोलेस्टेरॉलचा थर साचून रक्तवाहिनीची रुंदी कमी होते. अनेकदा रक्त गोठून प्रवाह पूर्णपणे बंद होतो व पुढील भागास रक्त न मिळाल्याने तो भाग निर्जीव होतो. उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थूलपणा, कोलेस्टेरॉल जास्त असणे व त्यासोबत तंबाखू, धूम्रपान-मद्यपान, अवेळी जेवण, कामाचा ताणतणाव, व्यायामाचा अभाव यामुळे अल्प वयात हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे.कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे हृदयविकारासारख्या गंभीर आजाराकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. हृदयविकारावर त्वरित उपचार झाले, तर रुग्णांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे कोरोनासोबतच हृदयविकाराच्या आजाराला रुग्णांनी अधिक महत्त्व द्यावे.-डॉ. चेतन राठीहृदयरोगतज्ज्ञ, धामणगाव रेल्वे 

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटका