शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

शहरात भिकाऱ्यांचा वाढता उपद्रव

By admin | Updated: May 8, 2017 00:08 IST

राजकमल चौकातील सिग्नलवर वाहने थांबताच भिकारी वाहनचालकाजवळ जाऊन भीक मागतात.

वाहनचालक त्रस्त : राजकमल चौकात अस्वच्छतेने गाठला कळसलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राजकमल चौकातील सिग्नलवर वाहने थांबताच भिकारी वाहनचालकाजवळ जाऊन भीक मागतात. पैसे मिळाले नाही की वाहनासमोर येऊन चक्क अंगावर धावतात. त्यामुळे या भिकाऱ्यांच्या नादी न लागता वाहन चालक त्यांना पैसे देऊन मोकळे होतात. असे प्रकार दररोज राजकमल चौकात पाहायला मिळत असून भिकाऱ्यांचा हा वाढत्या उपद्रवामुळे राजकमल चौकात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. शहरात भिकाऱ्यांचा वाढता उपद्रव अमरावतीकरांसाठी डोकेदुखी बनली आहे. राजकमल चौकात भिकाऱ्यांची टोळी पुलाखाली बसली असते. त्यांची दीनचर्या त्याच ठिकाणी पार पडत असल्यामुळे त्यांच्या सर्व क्रिया रस्त्यावरच आहे. दिवसभर भिक मागून पुलाखालीच चुला पेटवून जेवण तयार करणे व त्याच ठिकाणी झोपणे असे प्रकार चालत असल्यामुळे पुलाखालील जागा गलिच्छ केली आहे. त्यामुळे दुर्गंधीचा त्रास ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. त्यापेक्षा भयंकर म्हणजे, भिक मागतात हे भिकारी वाहनासमोर येतात. वाहन चालक सिग्नल सुटायच्या प्रतीक्षेत असतात. अशाप्रसंगी भिकारी वाहनासमोर येऊन वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. पैसे न दिल्यास वाहन समोर जाण्यास मज्जावही करतात. महिला भिकारी तर आपल्या लेकरांना समोर करून भिक मागतात. ईवल्याशा जीवाला रखरखत्या उन्हात फिरवित या वाहनचालकाकडून त्या वाहनचालकांपर्यंत जातात. हा सर्व प्रकार वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या निदर्शनास येतात. अनेकदा पोलीस या भिकाऱ्यांना हाकलून लावण्याचे प्रयत्न करतात. मात्र, हे भिकारी पोलिसांच्या अंगावर धावून जाण्यास पुढेमागे पाहत नाही. भिक मागताना कोणी रोखल्यास त्यांनाच गलिच्छ शिवीगाळ केली जाते. त्यामुळे या भिकाऱ्यांच्या तोंडी न लागता, त्यांना पैसे देऊन सुटका करून घेतली जाते. भिकाऱ्यांची लहान मुले वाहनाच्या अवतीभोवती फिरत भिक मागतात, अशावेळी वाहनाचे चाक या मुलांच्या पायाला स्पर्श करून जातात. अशाच प्रसंगातून एखादी अप्रिय घटना सुध्दा घडू शकते, याची पुसटशी कल्पनाही कोणी करीत नाही. शहरातील सिग्नलवर धोकादायक स्थितीत फिरणाऱ्या या भिकाऱ्यांवर नेमकी कारवाई करणार तरी कोण, याबाबत पोलीस यंत्रणा व अन्य प्रशासकीय विभागाने हातवर केले आहे.हीच स्थिती राहिल्यास राजकमल चौकाप्रमाणे अन्य चौकसुद्धा भीक मागण्याचा अड्डाच बनेल. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भिकाऱ्यांचा उपद्रव वाढत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. दररोज वादविवाद, गोंधळ, आरडाओरडराजकमल चौक भिकाऱ्यांचे रहिवासी स्थान असल्यामुळे त्यांचे आपसात वादविवाद होणे साहजीक आहे. या वादातून दररोज कल्लोळ, गोंधळ व त्यांचा आरडाओरड होत असल्याचे चित्र अमरावतीकरांसाठी काही नवखे राहिले नाही. भिकाऱ्यांचा होणारे वाढते वाद हे पोलीस ठाण्यापर्यंत सुध्दा पोहोचले आहेत. त्याचा हा वाद आम रस्त्यावर होत असल्यामुळे वाहतूक विस्कळीतसोबतच वाहनाचालकांसाठी लक्षवेधी ठरत आहे. अशावेळी वाहतूक नियंत्रणाचा बोजबारा वाजत आहे. पार्किंगमधील वाहने असुरक्षितराजकमल चौकातील उड्डाणपुलाखाली वाहने पार्क केली जात असून या वाहनांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भिकाऱ्यांची उड्डाणपुलाखालील जागेत दिनचर्या असल्यामुळे पार्क केलेल्या वाहनांची हवा सोडणे व वाहनातील साहित्य चोरी करण्याचे प्रकार सुरू आहे. त्यामुळे भिकाऱ्यांच्या या उपद्रवी वृत्तीला आळा बसविण्याची मागणी होत आहे.