शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

शहरात भिकाऱ्यांचा वाढता उपद्रव

By admin | Updated: May 8, 2017 00:08 IST

राजकमल चौकातील सिग्नलवर वाहने थांबताच भिकारी वाहनचालकाजवळ जाऊन भीक मागतात.

वाहनचालक त्रस्त : राजकमल चौकात अस्वच्छतेने गाठला कळसलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राजकमल चौकातील सिग्नलवर वाहने थांबताच भिकारी वाहनचालकाजवळ जाऊन भीक मागतात. पैसे मिळाले नाही की वाहनासमोर येऊन चक्क अंगावर धावतात. त्यामुळे या भिकाऱ्यांच्या नादी न लागता वाहन चालक त्यांना पैसे देऊन मोकळे होतात. असे प्रकार दररोज राजकमल चौकात पाहायला मिळत असून भिकाऱ्यांचा हा वाढत्या उपद्रवामुळे राजकमल चौकात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. शहरात भिकाऱ्यांचा वाढता उपद्रव अमरावतीकरांसाठी डोकेदुखी बनली आहे. राजकमल चौकात भिकाऱ्यांची टोळी पुलाखाली बसली असते. त्यांची दीनचर्या त्याच ठिकाणी पार पडत असल्यामुळे त्यांच्या सर्व क्रिया रस्त्यावरच आहे. दिवसभर भिक मागून पुलाखालीच चुला पेटवून जेवण तयार करणे व त्याच ठिकाणी झोपणे असे प्रकार चालत असल्यामुळे पुलाखालील जागा गलिच्छ केली आहे. त्यामुळे दुर्गंधीचा त्रास ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. त्यापेक्षा भयंकर म्हणजे, भिक मागतात हे भिकारी वाहनासमोर येतात. वाहन चालक सिग्नल सुटायच्या प्रतीक्षेत असतात. अशाप्रसंगी भिकारी वाहनासमोर येऊन वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. पैसे न दिल्यास वाहन समोर जाण्यास मज्जावही करतात. महिला भिकारी तर आपल्या लेकरांना समोर करून भिक मागतात. ईवल्याशा जीवाला रखरखत्या उन्हात फिरवित या वाहनचालकाकडून त्या वाहनचालकांपर्यंत जातात. हा सर्व प्रकार वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या निदर्शनास येतात. अनेकदा पोलीस या भिकाऱ्यांना हाकलून लावण्याचे प्रयत्न करतात. मात्र, हे भिकारी पोलिसांच्या अंगावर धावून जाण्यास पुढेमागे पाहत नाही. भिक मागताना कोणी रोखल्यास त्यांनाच गलिच्छ शिवीगाळ केली जाते. त्यामुळे या भिकाऱ्यांच्या तोंडी न लागता, त्यांना पैसे देऊन सुटका करून घेतली जाते. भिकाऱ्यांची लहान मुले वाहनाच्या अवतीभोवती फिरत भिक मागतात, अशावेळी वाहनाचे चाक या मुलांच्या पायाला स्पर्श करून जातात. अशाच प्रसंगातून एखादी अप्रिय घटना सुध्दा घडू शकते, याची पुसटशी कल्पनाही कोणी करीत नाही. शहरातील सिग्नलवर धोकादायक स्थितीत फिरणाऱ्या या भिकाऱ्यांवर नेमकी कारवाई करणार तरी कोण, याबाबत पोलीस यंत्रणा व अन्य प्रशासकीय विभागाने हातवर केले आहे.हीच स्थिती राहिल्यास राजकमल चौकाप्रमाणे अन्य चौकसुद्धा भीक मागण्याचा अड्डाच बनेल. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भिकाऱ्यांचा उपद्रव वाढत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. दररोज वादविवाद, गोंधळ, आरडाओरडराजकमल चौक भिकाऱ्यांचे रहिवासी स्थान असल्यामुळे त्यांचे आपसात वादविवाद होणे साहजीक आहे. या वादातून दररोज कल्लोळ, गोंधळ व त्यांचा आरडाओरड होत असल्याचे चित्र अमरावतीकरांसाठी काही नवखे राहिले नाही. भिकाऱ्यांचा होणारे वाढते वाद हे पोलीस ठाण्यापर्यंत सुध्दा पोहोचले आहेत. त्याचा हा वाद आम रस्त्यावर होत असल्यामुळे वाहतूक विस्कळीतसोबतच वाहनाचालकांसाठी लक्षवेधी ठरत आहे. अशावेळी वाहतूक नियंत्रणाचा बोजबारा वाजत आहे. पार्किंगमधील वाहने असुरक्षितराजकमल चौकातील उड्डाणपुलाखाली वाहने पार्क केली जात असून या वाहनांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भिकाऱ्यांची उड्डाणपुलाखालील जागेत दिनचर्या असल्यामुळे पार्क केलेल्या वाहनांची हवा सोडणे व वाहनातील साहित्य चोरी करण्याचे प्रकार सुरू आहे. त्यामुळे भिकाऱ्यांच्या या उपद्रवी वृत्तीला आळा बसविण्याची मागणी होत आहे.