शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

बांधकाम विभागाकडे वाढला सदस्यांचा कल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:13 IST

अमरावती : कोरोना प्रादुर्भावाने यंदाही ग्रामीण जनतेची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. अशा स्थितीत त्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ...

अमरावती : कोरोना प्रादुर्भावाने यंदाही ग्रामीण जनतेची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. अशा स्थितीत त्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा फायदा मिळावा, अशी अपेक्षा आहे. मात्र, निधीअभावी या योजना रखडल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सदस्यांचीही आता प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी बांधकाम विभागाकडे लगबग वाढली आहे.

जिल्हा परिषद सदस्याला बांधकाम, जनसुविधा आदी योजनांतर्गत वर्षाकाठी जवळपास ५० ते ६० लाख रुपयांचा निधी ग्रामीण भागातील विकासकामांकरिता उपलब्ध होतो. याशिवाय वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये सदस्यांना सर्कलनिहाय लाभार्थिसंख्येनुसार या योजनांचा लाभ दिला जातो. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाकडून अनेक योजनांसाठीचा निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे या योजना बारगळल्या. सद्यस्थितीत केवळ बांधकाम विभागाकडे पुरेसा निधी शिल्लक आहे. राज्य शासन, खनिज, डीपीसी, पंधरावा वित्त आयोग व इतर खात्यांचा अतिरिक्त निधी रस्ते, शाळा इमारतीसाठी खर्च होताना दिसत आहे.

बॉक्स

बजेट वाढूनही शेतकरी उपेक्षित !

जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी विभागासाठी प्रथमच समाधानकारक तरतूद करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना या विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ मिळेल, अशी सर्वांनाच आशा होती. या विभागाच्या माध्यमातून सेस फंडाच्या निधीतून शेतकऱ्यांना ताडपत्री, एचडीपी, पाईप, मोटार पंप, तारांचे कुंपण आदीसाठी अनुदान वितरित केले जाते. मात्र, गतवर्षी सोबतच यंदाही योजनांची गती मंदावल्याचे दिसून येत आहे.