शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुक्त गावांसाठी ग्रामपंचायतीची वाढली जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:11 IST

अमरावती : कोरोनाच्या पहिल्या लाटेत गटांगळ्या खाऊन शहाणेन झालेली जनता दुसऱ्या लाटेच्या तडाख्याचा पडून घायाळ झाली आहे. आता ...

अमरावती : कोरोनाच्या पहिल्या लाटेत गटांगळ्या खाऊन शहाणेन झालेली जनता दुसऱ्या लाटेच्या तडाख्याचा पडून घायाळ झाली आहे. आता तिसरी लाट येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक निर्बंध आणि नियम लागले तरी कोरोना शंभर टक्के आटोक्यात आलेला नाही. सुरुवातीला शहरी भागात असलेला कोरोनाचा वाढता संसर्ग आता ग्रामीण भागात वाढतो आहे. यामुळे आता ग्रामविकास विभागाने कोरोनामुक्त गाव या स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेमुळे ग्रामीण भागात कोरोना संसर्ग रोखण्याची जबाबदारी गावपातळीवर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर येऊन ठेपली आहे.

जिल्ह्यात कोरोनाची पहिली लाट आणि दुसरी लाट या दोन्ही लाटेमध्ये नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने यशस्वी प्रयत्न केले आहेत .आतापर्यंत जिल्ह्यात ५ लाख ८४ हजार ९५८ नागरिकांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यात २ जूनपर्यंत जिल्हाभरात ९२ हजार ८४९ नागरिकांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात ९७,०९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत जिल्ह्यात १,४६८ रुग्ण दगावले. शहरी भागातून ग्रामीण भागात कोरोनाचे लोन पसरताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वेगाने रुग्ण संख्या वाढली. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनावर ताण वाढला होता. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यामुळे काही दिवसांत रुग्ण संख्या आटोक्यात आली आहे. एक जूनपासून काही निर्बंध शिथिल केले आहे. कोरोना रूग्णसंख्येचा वाढता आलेखही बराच कमी झाला आहे. त्यामुळे कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी कोरोनामुक्त गाव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत बाजी मारण्यासाठी ग्रामपंचायत आणि ग्रामदक्षता समितीची जबाबदारी वाढली आहे.

बॉक्स

कोरोना मुक्त गावांना मिळणार विकास कामे

कोरणा मुक्त गाव स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये,२५ लाख व १५ लाख रुपयाच्या निधीची विकासकामे मंजूर केली जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी गावांची विविध २२ निकषावर गुणांकन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सर्व गावांनी सहभागी होता येणार आहे.कोरोनामुक्त गाव स्पर्धे चांगली कामगिती करणाऱ्या विभागातील पहिल्या तीन गावांना रोख स्वरूपात पारितोषिक शासनाकडे दिले जाणार आहे.