शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

शेतीची उत्पादकता वाढविण्यावर द्यावा भर

By admin | Updated: June 16, 2017 00:09 IST

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी, या उद्देशाने राज्य शासन अनेक कल्याणकारी योजना राबवीत आहेत.

पालकमंत्री : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना कृषी साहित्याचे वाटपलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी, या उद्देशाने राज्य शासन अनेक कल्याणकारी योजना राबवीत आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतकरी हितार्थ योजना राबवून उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने कामे करावीत, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना ना.पोटे यांच्याद्वारे स्वनिधीतून सोयाबीन बियाणे व रासायनिक खतांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, कृषी विकास अधिकारी उदय काथोडे, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, तहसीलदार, कृषी विभागाचे अधिकारी,कर्मचारी आदी उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळाला असून आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार आहे. सर्व शेतकऱ्यांना फायदा व्हावा, यासाठी कर्जमाफीच्या निर्णयातून पाच एकर जमिनीचा निकष वगळण्यात आला आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सुलभ पीककर्ज वितरणासह प्रभावी सिंचन सुविधाही शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आरोग्य, सिंचन, रोजगारासाठी शासनाव्दारे नवीन संकल्पना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. गोरगरीब विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी, याकरिता सुमारे १२ हजार विद्यार्थी दत्तक घेण्यात आले असून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी प्रशासनाने घेतली आहे. शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचा पुस्तकांचा खर्च भागविता यावा यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने दरदिवशी पाच रुपयांप्रमाणे वर्षाला १,८०० रुपये जमा करावे, असे भावनिक आवाहन पालकमंत्र्यांनी केले.