शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

शेतीची उत्पादकता वाढविण्यावर द्यावा भर

By admin | Updated: June 16, 2017 00:09 IST

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी, या उद्देशाने राज्य शासन अनेक कल्याणकारी योजना राबवीत आहेत.

पालकमंत्री : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना कृषी साहित्याचे वाटपलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी, या उद्देशाने राज्य शासन अनेक कल्याणकारी योजना राबवीत आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतकरी हितार्थ योजना राबवून उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने कामे करावीत, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना ना.पोटे यांच्याद्वारे स्वनिधीतून सोयाबीन बियाणे व रासायनिक खतांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, कृषी विकास अधिकारी उदय काथोडे, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, तहसीलदार, कृषी विभागाचे अधिकारी,कर्मचारी आदी उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळाला असून आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार आहे. सर्व शेतकऱ्यांना फायदा व्हावा, यासाठी कर्जमाफीच्या निर्णयातून पाच एकर जमिनीचा निकष वगळण्यात आला आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सुलभ पीककर्ज वितरणासह प्रभावी सिंचन सुविधाही शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आरोग्य, सिंचन, रोजगारासाठी शासनाव्दारे नवीन संकल्पना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. गोरगरीब विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी, याकरिता सुमारे १२ हजार विद्यार्थी दत्तक घेण्यात आले असून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी प्रशासनाने घेतली आहे. शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचा पुस्तकांचा खर्च भागविता यावा यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने दरदिवशी पाच रुपयांप्रमाणे वर्षाला १,८०० रुपये जमा करावे, असे भावनिक आवाहन पालकमंत्र्यांनी केले.