शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

अल्पवयीन मुला-मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण वाढले

By admin | Updated: July 11, 2015 00:34 IST

अल्पवयीन मुले-मुली प्रेमप्रकरणातून पळून जाण्याचे प्रमाण वाढले असून अद्यापपर्यंत शहरातील १६ जण बेपत्ता आहेत.

अद्याप १६ जण बेपत्ता : आॅपरेशन मुस्कान मोहिमेतून शोध सुरुवैभव बाबरेकर अमरावतीअल्पवयीन मुले-मुली प्रेमप्रकरणातून पळून जाण्याचे प्रमाण वाढले असून अद्यापपर्यंत शहरातील १६ जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध आॅपरेशन मुस्कान मोहिमेतून पोलीस विभाग घेत आहेत. शहरातील १८ वर्षांखालील मुलांमध्ये प्रेमाचे वारे वाहू लागल्याने त्यांचे पळून जाण्याचे प्रमाण वाढल्याचे गुन्ह्यासंदर्भात तक्रारीवरून लक्षात येत आहे. कमी वयात मुले-मुली आधुनिक तत्रंज्ञानाच्या माध्यमातून लैंगिक विषयाची माहिती घेत आहेत. त्या अनुभवातून अल्पवयीन प्रेमाच्या आहारी जात असल्याचे मनोरुग्ण तज्ज्ञ अमोल गुल्हाने यांचे मत आहे. शहरात अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनासोबत पालकवर्गही हतबल झाले आहेत. मागील दोन वर्षांत ८० अल्पवयीन पळून गेल्याच्या तक्रारी पोलीस विभागाला प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीवरून पोलीस विभागाने अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी ६४ अल्पवयीनांचा शोध पोलीस विभागाने घेतला असून १६ जणांचा शोध सुरू आहे. यातील बहुतांश अल्पवयीन प्रेमप्रकणातून पळून गेल्याचे पोलीस विभागाच्या निदर्शनास आले आहे. बेपत्ता १६ अल्पवयीनांमध्ये १२ मुली व ४ मुलांचा सहभाग आहे. साधारणत: १८ वर्षांवरील मुलां-मुलीमध्ये प्रेमप्रकरणे कायद्यानुसार ग्राह्य धरले जाते. मात्र, अल्पवयीनांतही प्रेम प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर आवर घालण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबवीत आहे.अत्याधुनिक तंत्रज्ञानातून अनुभवपूर्वीच्या काळात अल्पवयीनांना लैंगिक व्यवहाराची माहिती उशिरा कळत होती. मात्र, आताच्या नवीन तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल, टीव्ही, इंटरनेटच्या माध्यमातून लवकरच लैंगिक व्यवहाराबाबत अल्पवयीन मुले-मुली ज्ञात होत आहेत. त्यामुळे आताच्या पिढीतील मुलांं-मुलींचे हार्मोन्सचा विकास लवकरच होत आहे. परिणामी अल्पवयीनांमध्ये म्यॅचुरिटी येत असल्याचे मनोरुग्ण तज्ज्ञांचे मत आहे.पाल्यांना भविष्याची जाणीव करुन देणे योग्यपालकांनी आपल्या मुलांना भविष्यातील जबाबदारीची जाणीव करुन देणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. मुलांना भविष्यात काय करायचे आहे. पुढे त्यांना कशा प्रकारे कुटुंबीयांंची जबाबदारी सांभाळायची आहे. आपण कुठे चुकत आहेत आदींची मुला-मुलींना जाणीव करून देणे आजच्या काळाची गरज आहे. आताच्या चुकीमुळे आपल्याला पुढील जीवनात पश्चातापाची वेळ येऊ नये याकरिता पालकांनी पाल्याना वारंवार जबाबदारीची आठवण करून देणे गरजेच्े असल्याचे मत मनोरुग्ण तज्ज्ञ अमोल गुल्हाने यांनी सांगितले.अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अल्पवयीनांना मोबाईल, टीव्ही व इंटरनेट सारख्या माध्यमातून लैंगिक व्यवहाराची सर्व माहिती मिळते. त्यामुळे मुलांमध्ये म्यॅच्युरिटी लवकरच येत आहे. अल्पवयीनांना पुढील जीवनातील जबाबदारीची जाणीव नसते. पालकांनी मुलांना वारंवार याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. त्यांना चांगले संस्कार देणे गरजेचे आहे. - अमोल गुल्हाने, मनोरुग्ण तज्ज्ञ.आॅपरेशन मुस्कान मोहिमेतून मुलां-मुलींची शोध मोहीम सुरु आहे. यामध्ये अधिकाधिक मुल-मुली प्रेमप्रकरणातून पळून गेल्याचे निदर्शनास आले आहे. त्यापैकी बहुतांश मुलांचा शोध घेण्यात आला असून त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. - रियाजुद्दीन देशमुख, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा.