शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

चार प्रकल्पांच्या सिंचन क्षमतेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 06:00 IST

सिंचनादरम्यानचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी पाटचऱ्यांऐवजी पाइप लाइनद्वारे सिंचन करण्याचा राज्यातील पहिला प्रयोग आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नांतून चंद्रभागा प्रकल्पावर राबविला गेला. हा प्रयोग यशस्वी ठरल्याने जलसंपदा विभागाने तो अन्य ठिकाणीदेखील राबविला. यात शेतातील पाटचºयांची देखभाल व दुरुस्ती टळली. त्या फोडण्याचा, बुजवून टाकण्याचा प्रकार थांबला.

ठळक मुद्देबच्चू कडू : अचलपूर मतदारसंघात शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाईप लाइन

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर मतदारसंघात कोट्यवधीचे सिंचन प्रकल्प कार्यान्वित झाले असून, यातील अनेक सिंचन प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत. सिंचनाकरिता आवश्यक कालव्यांची अपूर्ण कामे अस्तरीकरणासह बºयाच प्रमाणात केल्याचा दावा आमदार बच्चू कडू यांनी केला.३०२.१४ कोटींचा करजगाव प्रकल्प, ५१५ कोटींचा बोर्डी प्रकल्प, ११०.३६ कोटींचा भगाडी प्रकल्प, ७५१.६७ कोटींचा वासनी प्रकल्प, ५० कोटींचा बेलोरा-गणोजा प्रकल्प आणि १९३.८१ कोटींच्या राजुरा प्रकल्पाकरिता विशेष प्रयत्न केल्याचे आ. कडू म्हणाले. चंद्रभागा, पूर्णा, चारघड, सपन प्रकल्पांच्या सिंचनक्षेत्रात वाढ झाली. चंद्रभागा प्रकल्पांतर्गंत ६१४७ हेक्टर, पूर्णा प्रकल्पांतर्गत ५४१७ हेक्टर, तर चारघड प्रकल्पांतर्गत १४५५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. जलयुक्त शिवार योजनेतून मतदारसंघात नाला जोड प्रकल्प, नाला-नदी खोलीकरण, कालवा दुरुस्ती, नदी पुनरुज्जीवन, ई-क्लास जमिनीवर गावतलाव, शेततळे, खोदतळे, गॅबीयन बंधारे, सिमेंट बंधारे, डोहाच्या खोलीकरणासह अन्य कामे पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली.पाइप लाइनद्वारे सिंचनसिंचनादरम्यानचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी पाटचऱ्यांऐवजी पाइप लाइनद्वारे सिंचन करण्याचा राज्यातील पहिला प्रयोग आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नांतून चंद्रभागा प्रकल्पावर राबविला गेला. हा प्रयोग यशस्वी ठरल्याने जलसंपदा विभागाने तो अन्य ठिकाणीदेखील राबविला. यात शेतातील पाटचºयांची देखभाल व दुरुस्ती टळली. त्या फोडण्याचा, बुजवून टाकण्याचा प्रकार थांबला. शेवटच्या शेतकºयांपर्यंत पाणी पोहोचले. संत्रा बागायतदारांना संत्रा झाडाला ताण देणे शक्य झाले. पाटचारी फुटून पाण्यामुळे खराब होण्यापासून शेती वाचली. पाण्याची काटकसर आणि पिकाला लागणारे नेमके पाणी वापरता आले. पाण्याचा नाश टळला असून, प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रात वाढ झाली आहे. पाणी चोरीला जाण्याचा प्रकारही थांबला आहे. पाइप लाइनद्वारे सिंचन करणे अनेक प्रकल्पांवर प्रस्तावित असून, चंद्रभागा प्रकल्पानंतर सर्वच प्रकल्पांवर त्याला मान्यता मिळाल्याचा दावा आ. बच्चू कडू यांनी केला. 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प