शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चार प्रकल्पांच्या सिंचन क्षमतेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 06:00 IST

सिंचनादरम्यानचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी पाटचऱ्यांऐवजी पाइप लाइनद्वारे सिंचन करण्याचा राज्यातील पहिला प्रयोग आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नांतून चंद्रभागा प्रकल्पावर राबविला गेला. हा प्रयोग यशस्वी ठरल्याने जलसंपदा विभागाने तो अन्य ठिकाणीदेखील राबविला. यात शेतातील पाटचºयांची देखभाल व दुरुस्ती टळली. त्या फोडण्याचा, बुजवून टाकण्याचा प्रकार थांबला.

ठळक मुद्देबच्चू कडू : अचलपूर मतदारसंघात शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाईप लाइन

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर मतदारसंघात कोट्यवधीचे सिंचन प्रकल्प कार्यान्वित झाले असून, यातील अनेक सिंचन प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत. सिंचनाकरिता आवश्यक कालव्यांची अपूर्ण कामे अस्तरीकरणासह बºयाच प्रमाणात केल्याचा दावा आमदार बच्चू कडू यांनी केला.३०२.१४ कोटींचा करजगाव प्रकल्प, ५१५ कोटींचा बोर्डी प्रकल्प, ११०.३६ कोटींचा भगाडी प्रकल्प, ७५१.६७ कोटींचा वासनी प्रकल्प, ५० कोटींचा बेलोरा-गणोजा प्रकल्प आणि १९३.८१ कोटींच्या राजुरा प्रकल्पाकरिता विशेष प्रयत्न केल्याचे आ. कडू म्हणाले. चंद्रभागा, पूर्णा, चारघड, सपन प्रकल्पांच्या सिंचनक्षेत्रात वाढ झाली. चंद्रभागा प्रकल्पांतर्गंत ६१४७ हेक्टर, पूर्णा प्रकल्पांतर्गत ५४१७ हेक्टर, तर चारघड प्रकल्पांतर्गत १४५५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. जलयुक्त शिवार योजनेतून मतदारसंघात नाला जोड प्रकल्प, नाला-नदी खोलीकरण, कालवा दुरुस्ती, नदी पुनरुज्जीवन, ई-क्लास जमिनीवर गावतलाव, शेततळे, खोदतळे, गॅबीयन बंधारे, सिमेंट बंधारे, डोहाच्या खोलीकरणासह अन्य कामे पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली.पाइप लाइनद्वारे सिंचनसिंचनादरम्यानचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी पाटचऱ्यांऐवजी पाइप लाइनद्वारे सिंचन करण्याचा राज्यातील पहिला प्रयोग आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नांतून चंद्रभागा प्रकल्पावर राबविला गेला. हा प्रयोग यशस्वी ठरल्याने जलसंपदा विभागाने तो अन्य ठिकाणीदेखील राबविला. यात शेतातील पाटचºयांची देखभाल व दुरुस्ती टळली. त्या फोडण्याचा, बुजवून टाकण्याचा प्रकार थांबला. शेवटच्या शेतकºयांपर्यंत पाणी पोहोचले. संत्रा बागायतदारांना संत्रा झाडाला ताण देणे शक्य झाले. पाटचारी फुटून पाण्यामुळे खराब होण्यापासून शेती वाचली. पाण्याची काटकसर आणि पिकाला लागणारे नेमके पाणी वापरता आले. पाण्याचा नाश टळला असून, प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रात वाढ झाली आहे. पाणी चोरीला जाण्याचा प्रकारही थांबला आहे. पाइप लाइनद्वारे सिंचन करणे अनेक प्रकल्पांवर प्रस्तावित असून, चंद्रभागा प्रकल्पानंतर सर्वच प्रकल्पांवर त्याला मान्यता मिळाल्याचा दावा आ. बच्चू कडू यांनी केला. 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प