शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील हवेच्या गुणवत्तेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:11 IST

अमरावती : कोरोनाकाळातील लॉकडाऊन, दिवसाची संचारबंदी याशिवाय पर्यावरणासंदर्भात प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे शहरतील हवेच्या गुणवत्तेत गतवर्षीच्या तुलनेत सुधारणा झालेली आहे. ...

अमरावती : कोरोनाकाळातील लॉकडाऊन, दिवसाची संचारबंदी याशिवाय पर्यावरणासंदर्भात प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे शहरतील हवेच्या गुणवत्तेत गतवर्षीच्या तुलनेत सुधारणा झालेली आहे. महापालिकेच्या पर्यावरण संवर्धन अधिकाऱ्यांनी हा अहवाल मंगळवारी सादर केला.

महापालिकेचा येथील शिवाजी सायन्स कॉलेजसोबत सामंजस्य करार झालेला आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण मंडळाद्वारा तपासणी अहवालातही हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, ध्वनी प्रदूषणात सुधार नसल्याने सभागृहाने चिंतादेखील व्यक्त केलेली आहे. हवेच्या गुणवत्तेबाबत प्राप्त माहितीनुसार, रहिवासी क्षेत्रात एनओएक्स व एसओटूचे प्रमाण अनुक्रमे १२.४५ व १०.९८ आहे. हे प्रदूषण पातळी ८० पेक्षा कमी आहे. याशिवाय आरएसपीएमचे प्रमाण सरासरी ४८.६१ म्हणजेच अनुज्ञेय पातळीपेक्षा कमी आहे. सन २०१९ - २९०मध्ये हे प्रमाण ६९.६४ एवढे होते.

औद्योगिक एनओएक्स व एसओटूचे प्रमाण अनुक्रमे १३.६९ व १२.२८ एवढे आहे. आरएसपीएमचे प्रमाण ५३.४९पेक्षा कमी आढळले आहे. गतवर्षी हे प्रमाण ८५.८३ होते. त्यामुळे यंदा घट झाल्याचे दिसून येते. शिवाय व्यापारी क्षेत्रात एनओएक्स व एसओटूचे प्रमाण अनुक्रमे १५.३ व १३.८० आढळले. हे अनुज्ञेय पातळीपेक्षा कमी आहे. आरएसपीएमचे प्रमाणही अनुज्ञेय पातळीपेक्षा कमी ५६.८१ आढळून आले आहे. गतवर्षी हे प्रमाण ८३.३० एवढे आढळून आले होते.

बॉक्स

पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे आरएसपीएम वाढणार

गतवर्षीच्या तुलनेत रहिवासी, औद्योगिक व व्यापारी क्षेत्रातील एनओएक्स, एसओटूच्या प्रमाणात घट आलेली आहे. मात्र, यात अधिक प्रयत्नांची गरज आहे. याशिवाय शहरात पायाभूत सुविधांच्या कामामुळे आरएसपीएमच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. पाच वर्षांचा विचार करता या प्रमाणात सातत्याने कमी येत आहे.

बॉक्स

वाढते ध्वनीप्रदूषण चिंतेचा विषय

दिवसेंदिवस वाढते नागरीकरण, वाहनांची संख्यावाढ, डीजे संस्कृतीचे वाढते प्रमाण यामुळे शहरातील ध्वनीप्रदूषणात झालेली वाढ चिंताजनक आहे. यामुळे मानवी आरोग्यावर शारीरिक व मानसिक दुष्परिणाम होतात. यासाठी शैक्षणिक संस्था, दवाखाने, न्यायालये या सभोवतीच्या १०० मीटरच्या परिसरात शांतता क्षेत्र घोषित करणे आवश्यक आहे.