शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बीटीचा शिरकाव

By admin | Updated: June 12, 2014 23:37 IST

खरीप हंगाम आठवड्यावर आला आहे. यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. शेतीसंबंधी सर्व घटकामध्ये बियाणे हा महत्त्वपूर्ण घटक आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत कपाशीच्या ३० हजार हेक्टर पेरणीक्षेत्रात वाढ झाली आहे.

शेतकऱ्यांनी सजग राहण्याची गरज : आठवड्यावर आला खरीप हंगामगजानन मोहोड - अमरावतीखरीप हंगाम आठवड्यावर आला आहे. यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. शेतीसंबंधी सर्व घटकामध्ये बियाणे हा महत्त्वपूर्ण घटक आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत कपाशीच्या ३० हजार हेक्टर पेरणीक्षेत्रात वाढ झाली आहे. बाजारातील उपलब्धतेनुसार शेतकरी वाणाची निवड करतात. मात्र यामध्ये फसगतीची शक्यता असते. यावर्षी १.८८ लाख क्विंटल संकरीत बियाण्यांची आवश्यकता आहे. बियाणे उपलब्ध आहेत. मात्र, यापूर्वीच बी.टी. या कपाशीच्या वाणाचे बोगस बियाणे बाजारात आले आहेत. खरीप हंगामात कपाशीच्या तुलनेत सोयाबीनचे पेरणीक्षेत्र कित्येक पटींनी वाढले. मात्र, पेरणीपासून सततचा पाऊस व सोंगणीच्या काळात झालेला पाऊस यामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या तुलनेत कपाशीचे सरासरी उत्पन्न झाले. त्यामुळेच यंदा कपाशीच्या पेरणीक्षेत्रात वाढ होणार, हे हेरुन बियाणे बाजारात आरआर, राऊंडअप, विडगार्ड, बेगम यांसह अन्य नावाने बोगस कंपन्यांचा शिरकाव झाला आहे. बनावट बियाण्यांमुळे कपाशी पिकाला भीतीहे बियाणे अधिकृत नाही. या बियाण्यांच्या विक्रीसाठी शासनाची परवानगी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊन कपाशीचे पीकदेखील धोक्यात येण्याची शक्यता आहे. नागपूर व यवतमाळ येथील खासगी गोदामात कृषी विभागाने धाडी घालून १० लाखांवर किमतीची बियाणे जप्त करण्यात आली. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात बोगस बी. टी. बियाण्यांची शक्यता स्पष्ट झाले आहे. अमरावती विभागात केवळ धाड वगळता अन्य कुठेही व जिल्ह्यात कृषी विभागाची कारवाई खरीप हंगामपूर्व झालेली नाही. सुस्तावलेल्या कृषी विभागाला वेळीच जाग येऊन बियाण्यांचा काळाबाजार व बोगस बियाण्यांची विक्रीस पायबंद न घातल्यास शेतकऱ्यांची लूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोर्शी, वरुड, धामणगाव तालुक्यातदेखील विक्रीयवतमाळ येथील बोगस बी. टी. बियाण्यांचे धागेदोरे अमरावती जिल्ह्यातदेखील जुळलेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कपाशीचे सर्वाधिक पेरणी क्षेत्र असणाऱ्या मोर्शी, वरूड, अचलपूर, चांदूरबाजार व धामणगाव रेल्वे तालुक्यातदेखील बोगस बी. टी. बियाण्यांची विक्री होत असल्याची माहिती आहे. मात्र कृषी विभागाद्वारे कुठलीही कारवाई नाही. अमरावती जिल्ह्यात कपाशीचे संभाव्य सर्वाधिक क्षेत्र वरूड तालुका २५ हजार ५०० हेक्टर, दर्यापूर तालुका २२ हजार ५०० हेक्टर, अचलपूर तालुका १७ हजार २०० हेक्टर, धामणगाव रेल्वे १५ हजार ९०० हेक्टर, मोर्शी तालुका १५ हजार ६०० हेक्टर, चांदूरबाजार तालुका १५ हजार २५० हेक्टर, तिवसा तालुका ९ हजार ९५० हेक्टर यासह जिल्ह्यात १ लाख ५९ हजार क्षेत्रात यावर्षी खरीप हंगामाची पेरणी होणार आहे.