शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

बोगस बीटीचा शिरकाव

By admin | Updated: June 12, 2014 23:37 IST

खरीप हंगाम आठवड्यावर आला आहे. यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. शेतीसंबंधी सर्व घटकामध्ये बियाणे हा महत्त्वपूर्ण घटक आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत कपाशीच्या ३० हजार हेक्टर पेरणीक्षेत्रात वाढ झाली आहे.

शेतकऱ्यांनी सजग राहण्याची गरज : आठवड्यावर आला खरीप हंगामगजानन मोहोड - अमरावतीखरीप हंगाम आठवड्यावर आला आहे. यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. शेतीसंबंधी सर्व घटकामध्ये बियाणे हा महत्त्वपूर्ण घटक आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत कपाशीच्या ३० हजार हेक्टर पेरणीक्षेत्रात वाढ झाली आहे. बाजारातील उपलब्धतेनुसार शेतकरी वाणाची निवड करतात. मात्र यामध्ये फसगतीची शक्यता असते. यावर्षी १.८८ लाख क्विंटल संकरीत बियाण्यांची आवश्यकता आहे. बियाणे उपलब्ध आहेत. मात्र, यापूर्वीच बी.टी. या कपाशीच्या वाणाचे बोगस बियाणे बाजारात आले आहेत. खरीप हंगामात कपाशीच्या तुलनेत सोयाबीनचे पेरणीक्षेत्र कित्येक पटींनी वाढले. मात्र, पेरणीपासून सततचा पाऊस व सोंगणीच्या काळात झालेला पाऊस यामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या तुलनेत कपाशीचे सरासरी उत्पन्न झाले. त्यामुळेच यंदा कपाशीच्या पेरणीक्षेत्रात वाढ होणार, हे हेरुन बियाणे बाजारात आरआर, राऊंडअप, विडगार्ड, बेगम यांसह अन्य नावाने बोगस कंपन्यांचा शिरकाव झाला आहे. बनावट बियाण्यांमुळे कपाशी पिकाला भीतीहे बियाणे अधिकृत नाही. या बियाण्यांच्या विक्रीसाठी शासनाची परवानगी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊन कपाशीचे पीकदेखील धोक्यात येण्याची शक्यता आहे. नागपूर व यवतमाळ येथील खासगी गोदामात कृषी विभागाने धाडी घालून १० लाखांवर किमतीची बियाणे जप्त करण्यात आली. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात बोगस बी. टी. बियाण्यांची शक्यता स्पष्ट झाले आहे. अमरावती विभागात केवळ धाड वगळता अन्य कुठेही व जिल्ह्यात कृषी विभागाची कारवाई खरीप हंगामपूर्व झालेली नाही. सुस्तावलेल्या कृषी विभागाला वेळीच जाग येऊन बियाण्यांचा काळाबाजार व बोगस बियाण्यांची विक्रीस पायबंद न घातल्यास शेतकऱ्यांची लूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोर्शी, वरुड, धामणगाव तालुक्यातदेखील विक्रीयवतमाळ येथील बोगस बी. टी. बियाण्यांचे धागेदोरे अमरावती जिल्ह्यातदेखील जुळलेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कपाशीचे सर्वाधिक पेरणी क्षेत्र असणाऱ्या मोर्शी, वरूड, अचलपूर, चांदूरबाजार व धामणगाव रेल्वे तालुक्यातदेखील बोगस बी. टी. बियाण्यांची विक्री होत असल्याची माहिती आहे. मात्र कृषी विभागाद्वारे कुठलीही कारवाई नाही. अमरावती जिल्ह्यात कपाशीचे संभाव्य सर्वाधिक क्षेत्र वरूड तालुका २५ हजार ५०० हेक्टर, दर्यापूर तालुका २२ हजार ५०० हेक्टर, अचलपूर तालुका १७ हजार २०० हेक्टर, धामणगाव रेल्वे १५ हजार ९०० हेक्टर, मोर्शी तालुका १५ हजार ६०० हेक्टर, चांदूरबाजार तालुका १५ हजार २५० हेक्टर, तिवसा तालुका ९ हजार ९५० हेक्टर यासह जिल्ह्यात १ लाख ५९ हजार क्षेत्रात यावर्षी खरीप हंगामाची पेरणी होणार आहे.