शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
3
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
4
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
5
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
6
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
7
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
8
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
9
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
10
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
11
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
12
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
13
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
14
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
15
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
16
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
17
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
18
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
19
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
20
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 

बोगस बीटीचा शिरकाव

By admin | Updated: June 12, 2014 23:37 IST

खरीप हंगाम आठवड्यावर आला आहे. यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. शेतीसंबंधी सर्व घटकामध्ये बियाणे हा महत्त्वपूर्ण घटक आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत कपाशीच्या ३० हजार हेक्टर पेरणीक्षेत्रात वाढ झाली आहे.

शेतकऱ्यांनी सजग राहण्याची गरज : आठवड्यावर आला खरीप हंगामगजानन मोहोड - अमरावतीखरीप हंगाम आठवड्यावर आला आहे. यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. शेतीसंबंधी सर्व घटकामध्ये बियाणे हा महत्त्वपूर्ण घटक आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत कपाशीच्या ३० हजार हेक्टर पेरणीक्षेत्रात वाढ झाली आहे. बाजारातील उपलब्धतेनुसार शेतकरी वाणाची निवड करतात. मात्र यामध्ये फसगतीची शक्यता असते. यावर्षी १.८८ लाख क्विंटल संकरीत बियाण्यांची आवश्यकता आहे. बियाणे उपलब्ध आहेत. मात्र, यापूर्वीच बी.टी. या कपाशीच्या वाणाचे बोगस बियाणे बाजारात आले आहेत. खरीप हंगामात कपाशीच्या तुलनेत सोयाबीनचे पेरणीक्षेत्र कित्येक पटींनी वाढले. मात्र, पेरणीपासून सततचा पाऊस व सोंगणीच्या काळात झालेला पाऊस यामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या तुलनेत कपाशीचे सरासरी उत्पन्न झाले. त्यामुळेच यंदा कपाशीच्या पेरणीक्षेत्रात वाढ होणार, हे हेरुन बियाणे बाजारात आरआर, राऊंडअप, विडगार्ड, बेगम यांसह अन्य नावाने बोगस कंपन्यांचा शिरकाव झाला आहे. बनावट बियाण्यांमुळे कपाशी पिकाला भीतीहे बियाणे अधिकृत नाही. या बियाण्यांच्या विक्रीसाठी शासनाची परवानगी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊन कपाशीचे पीकदेखील धोक्यात येण्याची शक्यता आहे. नागपूर व यवतमाळ येथील खासगी गोदामात कृषी विभागाने धाडी घालून १० लाखांवर किमतीची बियाणे जप्त करण्यात आली. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात बोगस बी. टी. बियाण्यांची शक्यता स्पष्ट झाले आहे. अमरावती विभागात केवळ धाड वगळता अन्य कुठेही व जिल्ह्यात कृषी विभागाची कारवाई खरीप हंगामपूर्व झालेली नाही. सुस्तावलेल्या कृषी विभागाला वेळीच जाग येऊन बियाण्यांचा काळाबाजार व बोगस बियाण्यांची विक्रीस पायबंद न घातल्यास शेतकऱ्यांची लूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोर्शी, वरुड, धामणगाव तालुक्यातदेखील विक्रीयवतमाळ येथील बोगस बी. टी. बियाण्यांचे धागेदोरे अमरावती जिल्ह्यातदेखील जुळलेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कपाशीचे सर्वाधिक पेरणी क्षेत्र असणाऱ्या मोर्शी, वरूड, अचलपूर, चांदूरबाजार व धामणगाव रेल्वे तालुक्यातदेखील बोगस बी. टी. बियाण्यांची विक्री होत असल्याची माहिती आहे. मात्र कृषी विभागाद्वारे कुठलीही कारवाई नाही. अमरावती जिल्ह्यात कपाशीचे संभाव्य सर्वाधिक क्षेत्र वरूड तालुका २५ हजार ५०० हेक्टर, दर्यापूर तालुका २२ हजार ५०० हेक्टर, अचलपूर तालुका १७ हजार २०० हेक्टर, धामणगाव रेल्वे १५ हजार ९०० हेक्टर, मोर्शी तालुका १५ हजार ६०० हेक्टर, चांदूरबाजार तालुका १५ हजार २५० हेक्टर, तिवसा तालुका ९ हजार ९५० हेक्टर यासह जिल्ह्यात १ लाख ५९ हजार क्षेत्रात यावर्षी खरीप हंगामाची पेरणी होणार आहे.