शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

राज्य दुष्काळमुक्त अभियानात तीन हजार गावांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 01:19 IST

संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी पानी फाऊंडेशन व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने २०१६ पासून या कामांची सुरुवात करण्यात आली असून, यंदा तीन हजार गावे दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशाने काम सुरू असल्याची माहिती रविवारी पार पडलेल्या पत्रपरिषदेमध्ये भारतीय जैैन संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदर्शन जैन यांनी दिली.

ठळक मुद्दे२०१६ पासून सुरुवात : पाणी फाऊंडेशन व जैन संघटनेचा उपक्रम

अमरावती : संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी पानी फाऊंडेशन व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने २०१६ पासून या कामांची सुरुवात करण्यात आली असून, यंदा तीन हजार गावे दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशाने काम सुरू असल्याची माहिती रविवारी पार पडलेल्या पत्रपरिषदेमध्ये भारतीय जैैन संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदर्शन जैन यांनी दिली.महाराष्ट्र दुष्काळमुक्त अभियान २०१८ चे जिल्हा समन्वयक प्रदीप जैन, ऋषभ बरडिया, विलास उदापूरकर, सुनील जैन, धर्मेंद्र जैन आदी पत्रपरिषदेला प्रामुख्याने उपस्थित होते. अभियानाच लोकांचाही चांगला सहभाग मिळत असून, ज्या गावात पाण्याची टंचाई आहे, तेथे भविष्यात पाणी अडवून जिरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जेसीबी व पोकलॅन उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली आहे.आतापर्यंत संघटनेच्या माध्यमातून ४०० गावांमध्ये कामे करण्यात आली असून, यंदा तीन हजार गावांत कामे करण्यात येणार असल्याचे नियोजन करण्यात आले आहे. तिसऱ्या टप्प्यात राज्याच्या २४ जिल्ह्यांतील ७५ तालुक्यांत पाच हजार ग्रामपंचायतींमधून आलेल्या प्रत्येकी यामध्ये दोन महिला व तीन पुरुषांनी पानी फाऊंडेशनद्वारा स्थापित प्रशिक्षण केंद्रात सतत चार दिवसांचे जलसंवर्धन प्रशिक्षण प्राप्त केले आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांत अभियान सुरू आहे.