शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

निर्जीव रस्ते जिवंत झाले; रिक्षा, टांगा धावू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:10 IST

मेळघाटातील आदिवासी खरेदीसाठी परतवाड्यात : संचारबंदीत थोडा दिलासा परतवाडा : मागील २० दिवसांपेक्षा अधिक काळापासून कुलूपबंद असलेली दुकाने, ...

मेळघाटातील आदिवासी खरेदीसाठी परतवाड्यात : संचारबंदीत थोडा दिलासा

परतवाडा : मागील २० दिवसांपेक्षा अधिक काळापासून कुलूपबंद असलेली दुकाने, घरात पडलेली माणसे, त्यामुळे निर्जीव झालेले रस्ते मागील २० दिवसानंतर गुरुवारी परतवाडा-अचलपूर शहरात जिवंत दिसून आले मालवाहू प्रवासी वाहनांसह गावखेड्यात धावणारा टांगा तीन चाकी ऑटोसह रिक्षाही धावला.

परतवाड्यात गुरुवारचा आठवडी बाजार असतो. अमरावती जिल्ह्यात हा सर्वात मोठा बाजार आहे. अचलपूर तालुक्याला लागून असलेला आदिवासीबहुल मेळघाटचा भाग तर सीमारेषेवरील मध्यप्रदेश बैतुल जिल्हा, चांदूरबाजार, अंजनगाव, भातकुली, दर्यापूर तालुके वजा त्यातील गाव खेडे लागून आहेत मुख्य बाजारपेठ असलेल्या परतवाडा शहरात मोठ्या प्रमाणात ठोक विक्रेते आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील लहान दुकानदार व नागरिक खरेदीसाठी येथे धाव घेतात; परंतु मागील २० दिवसांपेक्षा अधिक काळापासून वरुणाचा धसका आणि लागलेले लॉकडाऊन पाहता सर्व व्यवहार थांबले होते. गुरुवारी परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहराला जोडणाऱ्या तालुका व ग्रामीण भागातील रस्ते धावताना दिसून आले. मेळघाटातील आदिवासी कपडे, भाजीपाला, किराणा व इतर जीवनावश्यक साहित्य सोबतच पावसाळ्याचे दिवस पाहता प्लास्टिक पन्नी खरेदी करताना दिसले.

बॉक्स

रोजगार हिरावला, व्यवहार थांबला

कोरोनाचा कहर दुसरी लाट भयंकर आल्यामुळे अनेकांच्या जीवावर बेतणारी ठरली मागील चार दिवसांपासून रुग्णास संख्येत काहीशी घट येत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने लादलेले कडक निर्बंध शिथिल केले, त्यामुळे व्यावसायिक प्रतिष्ठाने सकाळी ७ ते ११ उघडू लागली आहे. कमी वेळेत लांबचे अंतर आणि सर्व कामे आठवण्यासाठी पहाटेपासूनच ग्रामीण भागातील नागरिक व्यापारी शहरात दाखल होत असून लावलेला रोजगार व थांबलेला व्यवसाय पुन्हा नव्याने सुरू करण्याच्या प्रयत्नात धावपळ करीत असल्याचे चित्र दिसून आले.

बॉक्स

रिक्षा, टांग्यासह, ऑटोची सवारी

परतवाडा- अचलपूर शहरात आजही नजीकच्या ग्रामीण भागातील नागरिक टांगा, रिक्षा, सोबत ऑटोरिक्षा आदींनी प्रवास करतात, महामंडळाच्या बस गाड्या ग्रामीण भागात अजूनही बंदच आहेत त्यामुळे गुरुवारी शहरात याच वाहनाने नागरिक ये-जा करताना दिसून आले.