शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

व्याघ्र प्रकल्पनजीकच्या गावामध्ये खबऱ्यांची फौज, वाघ शिकार रोखण्यासाठी 'अलर्ट'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2023 22:25 IST

Amravati News आता वन्यजीव विभागाने व्याघ्र प्रकल्पानजीकच्या गावांमध्ये खबऱ्यांची मोठी फौज उभारली असून, गावात कोणीही अनोळखी व्यक्ती दिसल्यास ‘अलर्ट’ करण्याचा सूचना दिल्या आहेत.

ठळक मुद्देमार्च ते जून या दरम्यान वाघ शिकारीच्या घटनांमध्ये होते वाढगावात अनोळखी दिसल्यास तात्काळ कळविण्याच्या सूचना

 

अमरावती : उन्हाळ्यात तृष्णा भागविण्यासाठी वाघ दरदिवशी १५ ते २० किमी अंतरचा प्रवास करतो. नेमकी हीच बाब हेरून तस्कर नैसर्गिक वा कृत्रिम पाणवठ्यांमध्ये युरिया अथवा विषप्रयोगाद्वारे वाघांची शिकार करतात. त्यामुळे आता वन्यजीव

विभागाने व्याघ्र प्रकल्पानजीकच्या गावांमध्ये खबऱ्यांची मोठी फौज उभारली असून, गावात कोणीही अनोळखी व्यक्ती दिसल्यास

‘अलर्ट’ करण्याचा सूचना दिल्या आहेत.

वाघ अथवा अन्य वन्यजीवांच्या शिकारीसाठी तस्करांकडून वेगवेगळे प्रयोग केले जातात, असा वन्यजीव विभागाचा आतापर्यंतचा निष्कर्ष आहे. दरवर्षी मार्च ते जून या चार महिन्यांत शिकारी व्याघ्र प्रकल्पनजीकच्या गावात स्थानिकांना हाताशी घेऊन वाघांसंदर्भात रेकी करतात. स्थानिक रहिवाशांकडून माहिती मिळविल्यानंतर वाघांची शिकारी केली जाते. मात्र, वन्यजीव विभागाने

यावर्षी व्याघ्र प्रकल्पानजीकच्या गावांना लक्ष्य केले आहे. खबऱ्यांची फौज निर्माण केली असून, गावात कोणी अनोळखी वा

परप्रांतीय व्यक्ती दृष्टीस पडल्यास अशांची माहिती वनविभागाला देण्याबाबत अवगत करण्यात आले आहे. वाघांची रेकी वा शिकार करण्याच्या मनसुब्याने आलेली व्यक्ती वनविभागाने जेरबंद केल्यास या मोबदल्यात संबंधित खबऱ्यांना योग्य बक्षीस देण्याचे वन्यजीव विभागाचे प्रयोजन आहे. यासंदर्भात वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक महिप गुप्ता यांच्याशी संपर्क

साधला असता ते उपलब्ध झाले नाहीत.

पाणवठ्यावर लागणार ट्रॅप कॅमरे

मेळघाट, ताडोबा-अंधारी, पेंच, नवेगाव- नागझिरा, बोर अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील नैसर्गक वा कृत्रिम पाणवठ्यांच्या परिसरात वाघ अथवा अन्य वन्यजीवांच्या हालचाली टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार आहे. पाणवठ्यांवर

विषप्रयोग किवा युरिया मिश्रित करून वाघांच्या शिकारीचा डाव ट्रॅप कॅमेऱ्यातून उघडकीस आणता येणार आहे. त्याअनुषंगाने

पाणवठ्यांवर ट्रॅप कॅमेरे बसविण्याचा हालचालींनी वेग घेतला आहे. यंदा नव्याने २५०० पाणवठे तयार करण्यात आले आहे.

‘त्या’ गावातृून आदिवासींचे रोजगारासाठी स्थलांतर

मेळघाट, ताडोबा-अंधारी, पेंच, नवेगाव-नागझिरा या व्याघ्र प्रकल्पानजीकच्या बहुतांश गावात आदिवासींचे वास्तव्य आहे. मात्र,

उन्हाळा सुरू होताच आदिवासी कुटुंब हे रोजगारासाठी स्थलांतरित होतात. आदिवासी हे जूनपर्यंत स्थलांतरित असतात. नेमक्या याच काळात तस्करांकडून वाघांच्या शिकारीचे प्लॅन तयार केले जातात. वाघांची रेकी, वाघांचे भ्रमणमार्ग, पाणवठ्यांवर ये-जा आदी माहिती स्थानिकांकडून तस्कर मिळवितात. त्यामुळे वन्यजीव विभागाने स्थानिकांना विश्वासात घेतले आहे.

टॅग्स :Tigerवाघ