शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र प्रकल्पनजीकच्या गावामध्ये खबऱ्यांची फौज, वाघ शिकार रोखण्यासाठी 'अलर्ट'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2023 22:25 IST

Amravati News आता वन्यजीव विभागाने व्याघ्र प्रकल्पानजीकच्या गावांमध्ये खबऱ्यांची मोठी फौज उभारली असून, गावात कोणीही अनोळखी व्यक्ती दिसल्यास ‘अलर्ट’ करण्याचा सूचना दिल्या आहेत.

ठळक मुद्देमार्च ते जून या दरम्यान वाघ शिकारीच्या घटनांमध्ये होते वाढगावात अनोळखी दिसल्यास तात्काळ कळविण्याच्या सूचना

 

अमरावती : उन्हाळ्यात तृष्णा भागविण्यासाठी वाघ दरदिवशी १५ ते २० किमी अंतरचा प्रवास करतो. नेमकी हीच बाब हेरून तस्कर नैसर्गिक वा कृत्रिम पाणवठ्यांमध्ये युरिया अथवा विषप्रयोगाद्वारे वाघांची शिकार करतात. त्यामुळे आता वन्यजीव

विभागाने व्याघ्र प्रकल्पानजीकच्या गावांमध्ये खबऱ्यांची मोठी फौज उभारली असून, गावात कोणीही अनोळखी व्यक्ती दिसल्यास

‘अलर्ट’ करण्याचा सूचना दिल्या आहेत.

वाघ अथवा अन्य वन्यजीवांच्या शिकारीसाठी तस्करांकडून वेगवेगळे प्रयोग केले जातात, असा वन्यजीव विभागाचा आतापर्यंतचा निष्कर्ष आहे. दरवर्षी मार्च ते जून या चार महिन्यांत शिकारी व्याघ्र प्रकल्पनजीकच्या गावात स्थानिकांना हाताशी घेऊन वाघांसंदर्भात रेकी करतात. स्थानिक रहिवाशांकडून माहिती मिळविल्यानंतर वाघांची शिकारी केली जाते. मात्र, वन्यजीव विभागाने

यावर्षी व्याघ्र प्रकल्पानजीकच्या गावांना लक्ष्य केले आहे. खबऱ्यांची फौज निर्माण केली असून, गावात कोणी अनोळखी वा

परप्रांतीय व्यक्ती दृष्टीस पडल्यास अशांची माहिती वनविभागाला देण्याबाबत अवगत करण्यात आले आहे. वाघांची रेकी वा शिकार करण्याच्या मनसुब्याने आलेली व्यक्ती वनविभागाने जेरबंद केल्यास या मोबदल्यात संबंधित खबऱ्यांना योग्य बक्षीस देण्याचे वन्यजीव विभागाचे प्रयोजन आहे. यासंदर्भात वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक महिप गुप्ता यांच्याशी संपर्क

साधला असता ते उपलब्ध झाले नाहीत.

पाणवठ्यावर लागणार ट्रॅप कॅमरे

मेळघाट, ताडोबा-अंधारी, पेंच, नवेगाव- नागझिरा, बोर अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील नैसर्गक वा कृत्रिम पाणवठ्यांच्या परिसरात वाघ अथवा अन्य वन्यजीवांच्या हालचाली टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार आहे. पाणवठ्यांवर

विषप्रयोग किवा युरिया मिश्रित करून वाघांच्या शिकारीचा डाव ट्रॅप कॅमेऱ्यातून उघडकीस आणता येणार आहे. त्याअनुषंगाने

पाणवठ्यांवर ट्रॅप कॅमेरे बसविण्याचा हालचालींनी वेग घेतला आहे. यंदा नव्याने २५०० पाणवठे तयार करण्यात आले आहे.

‘त्या’ गावातृून आदिवासींचे रोजगारासाठी स्थलांतर

मेळघाट, ताडोबा-अंधारी, पेंच, नवेगाव-नागझिरा या व्याघ्र प्रकल्पानजीकच्या बहुतांश गावात आदिवासींचे वास्तव्य आहे. मात्र,

उन्हाळा सुरू होताच आदिवासी कुटुंब हे रोजगारासाठी स्थलांतरित होतात. आदिवासी हे जूनपर्यंत स्थलांतरित असतात. नेमक्या याच काळात तस्करांकडून वाघांच्या शिकारीचे प्लॅन तयार केले जातात. वाघांची रेकी, वाघांचे भ्रमणमार्ग, पाणवठ्यांवर ये-जा आदी माहिती स्थानिकांकडून तस्कर मिळवितात. त्यामुळे वन्यजीव विभागाने स्थानिकांना विश्वासात घेतले आहे.

टॅग्स :Tigerवाघ