शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गाडगे बाबांचे नाव असलेल्या विद्यापीठातच अस्वच्छतेचे साम्राज्य, एनएसयूआयचे आंदोलन

By उज्वल भालेकर | Updated: December 20, 2023 18:30 IST

कुलगुरुंना निवेदन देऊन तातडीने विद्यापीठ परिसराची स्वच्छता करण्याची मागणीही केली. 

अमरावती: वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा यांनी आयुष्यभर स्वच्छतेचा संदेश दिला. परंतु त्याच संत गाडगे बाबांचे नाव असलेल्या विद्यापीठात मात्र अस्वच्छतेचे साम्राज्य पहायला मिळत आहे. याला जबाबदार विद्यापीठ प्रशासन आहे. त्यामुळे गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून बुधवारी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने (एनएसयूआय) विद्यापीठात स्वच्छता मोहीम राबवत आंदोलन केले. तसेच कुलगुरुंना निवेदन देऊन तातडीने विद्यापीठ परिसराची स्वच्छता करण्याची मागणीही केली. 

संत गाडगे बाबा यांनी समाजामध्ये स्वच्छतेचे महत्व पटवून देत आपल्या किर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातील अंधश्रद्धेची घाण देखील साफ करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या याच कार्यामुळे अमरावती विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आले. परंतु त्याच विद्यापीठ प्रशासनाला गाडगे बाबांच्या विचारांचा विसर पडल्याचा आरोप एनएसयूआयने केला आहे. प्रशासन आणि स्वच्छता ठेकेदाराच्या उदासीनतेमुळे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने याची दखल घेत विद्यापीठ परिसराची स्वच्छता करण्याची मागणी केली आहे. 

स्वच्छता न झाल्यास कुलगुरुंच्या दालनामध्ये कचरा टाकण्याचा इशाराही निवेदनातून दिला आहे. यावेळी एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठात स्वच्छता मोहीम राबवून विद्यापीठ प्रशासनाचा निषेधही नोंदविला. यावेळी संकेत साहू, समीर जवंजाळ, योगेश बुदीले, राहूल रायबोले, वैभव देशमुख, अनिकेत ढेंगळे, अक्षय साबळे, आकाश गेडाम, वेदांत केणे, अमित महात्मे, आकाश घुराटकर, धीरज बोबडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Amravatiअमरावती