शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

चार्जिंग स्टेशन अंतिम टप्प्यात, ई-बसचा पत्ता नाही; विद्युत, सिव्हिल शाखेकडून चारही ठिकाणी कामे अंतिम टप्प्यात

By जितेंद्र दखने | Updated: June 15, 2024 22:50 IST

एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास समजला जातो. त्यामुळे प्रवाशांची प्रवासासाठी पहिली पसंती ही एसटी बसला दिली जाते.

अमरावती : राज्य परिवहन महामंडळाकडून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील चार ठिकाणी चार्जिंग स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यासाठी ६८ ई-बसची मागणी वरिष्ठ स्तरावर नोंदविली आहे. यात पहिल्या टप्प्यात १० ते १५ बस मेअखेरपर्यंत एसटीच्या ताफ्यात दाखल होणार होत्या. मात्र, जून महिना अर्धा संपत येत असताना एसटी महामंडळाच्या ताफ्यात अद्यापही ई-बस दाखल झाल्या नाहीत.

एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास समजला जातो. त्यामुळे प्रवाशांची प्रवासासाठी पहिली पसंती ही एसटी बसला दिली जाते. ‘वाट पाहीन; पण एसटीने जाईन’ या मानसिकतेत असलेल्या प्रवाशांसाठी ई-बसमुळे बसचा प्रवास हा ध्वनि-वायू प्रदूषणमुक्त होणार आहे. वृद्धांपासून विद्यार्थ्यांपर्यंत, तसेच महिलांपासून शाळकरी मुलींपर्यंत सर्वांनाच एसटी प्रवासात सवलत मिळत असल्याने एसटीची लालपरी सर्वांमध्ये लोकप्रिय आहे.

जिल्ह्यातील अमरावती, परतवाडा, मोर्शी आणि वरूड चार आगारांत चार्जिंग स्टेशननिर्मितीची निविदा प्रक्रिया होऊन आतापर्यंत या चार्जिंग स्टेशनचे विद्युत शाखा व सिव्हिल शाखेकडून अंतिम टप्प्यात आली आहे. ९० टक्के कामे आटोपली आहेत. दुसऱ्या टप्प्यात दर्यापूर, चांदूर रेल्वे आणि बडनेरा येथील चार्जिंग स्टेशनची कामे होणार आहेत. आता किती दिवस ई-बसची प्रतीक्षा करावी लागणार, हेही अद्याप अस्पष्ट आहे.