शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

'मिनरल वॉटर'च्या नावावर अशुद्ध पाणीपुरवठा

By admin | Updated: May 13, 2015 00:32 IST

विदर्भात सर्वत्र लग्नसमारंभांची धामधूम सुरू आहे. रखरखत्या उन्हातून आलेल्या पाहुण्यांना गार पाणी पुरविण्याकडे यजमानांचा अधिक कल असतो.

सचिन सुंदरकर अमरावतीविदर्भात सर्वत्र लग्नसमारंभांची धामधूम सुरू आहे. रखरखत्या उन्हातून आलेल्या पाहुण्यांना गार पाणी पुरविण्याकडे यजमानांचा अधिक कल असतो. हेच भावनिक औचित्य साधून मिनरल वॉटरच्या नावावर अशुध्द पाणी पुरविण्याचा गोरखधंदा जोरात आहे. कोट्यवधींची उलाढाल असलेल्या या व्यवसायावर कुणाचाच अंकुश नाही, हे बोचरे वास्तव आहे. लग्न अथवा इतर प्रसंगात थंड पाण्याच्या कॅन दिसतात. थंड पाणी पाहून पाहुण्यांनाही समाधान वाटते. थंड केलेले शुध्द पाणी देणे आज एक प्रतिष्ठेचाही भाग झाला आहे. बाजारात असणारी भयंकर स्पर्धा व जास्त नफा मिळविण्याची वृत्ती यामुळे मिनरल वॉटरच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. साधारणे ३० रुपयांत २० लिटर अशुध्द, दूषित पाण्याची कॅन मिळत आहे. या कॅनमध्ये रिव्हर्स आॅसमॉसिस (आरओ) ही शुद्धीकरणाची प्रक्रिया केलेले शुध्द पाणी असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात अल्ट्राव्हायोलेट किरणांनी (युव्ही) हे पाणी अगदी कमी खर्चात फिल्टर केले जाते. पाणी निर्जंतूक व्हायचे असेल तर ते रिव्हर्स आॅसमॉसिस व अल्ट्राव्हॉयलेट प्रक्रियेतून जाययलाच हवे. पिण्यायोग्य पाण्यात क्षाराचे अर्थात टीडीएसचे प्रमाण ७० ते ८० पेक्षा जास्त नको. त्यापेक्षा जास्त टीडीएस असल्यास आरोग्याच्या गंभीर तक्रारी उद्भवू शकतात. विक्री होणाऱ्या पाण्यात टीडीएसदेखील जादा असते. व्यावसायिक स्पर्धेत टिकण्यासाठी आरओ प्रक्रिया न करताच थंड पाणी विकले जाते. पाणी थंड असल्यास ग्राहकाला त्यातील टीडीएसची फारशी कल्पना येत नाही. थंड पाण्यामुळे पाण्याच्या चवीकडे दुर्लक्ष होते. लग्नसमारंंभात मिळणारे बहुतांश ठिकाणचे पाणी अशुद्ध असते. शुल्क मात्र शुद्ध पाण्याचे आकारले जाते. सार्वजनिक कार्यक्रमांत पुरविले जाणारे पाणी स्वच्छ, शुद्ध आहे की की की कसे हे तपासण्याची जबाबदारी कुणाची हा अडचणीचा मुद्दा उपस्तिि होतो. सबंधित स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अन्न व औषधी प्रशासन विभागाची ही जबाबदारी आहे.