शहरं
Join us  
Trending Stories
1
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
2
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
3
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
4
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
5
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
6
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
7
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
8
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
9
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
10
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
11
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
12
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
13
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
14
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
15
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
16
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
17
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
18
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
19
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
20
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  

स्टीम सप्ताहाची घरोघर अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:13 IST

अमरावती : कोरोना साथीचे संक्रमण रोखण्यासाठी कोविड सुसंगत जीवनशैली प्रत्येकाने आत्मसात करणे गरजेचे झाले आहे. यासोबतच नियमितपणे वाफ ...

अमरावती : कोरोना साथीचे संक्रमण रोखण्यासाठी कोविड सुसंगत जीवनशैली प्रत्येकाने आत्मसात करणे गरजेचे झाले आहे. यासोबतच नियमितपणे वाफ घेतल्यास कोरोनाचा विषाणू शरीरातून दूर होऊ शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांच्या तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे स्टीम सप्ताहाची घरोघर अंमलबजावणी व्हावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.

कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येकाने मास्क लावणे, सामाजिक अंतर ठेवणे, नेहमी हात स्वच्छ धुणे या कोरोना प्रतिबंधक त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करतानाच, चांगला सकस आहार, कोविड सुसंगत जीवनशैली, नियमित वाफ घेणे आदींचाही अवलंब प्रत्येकाने केला पाहिजे. त्याबाबत जनजागृतीसाठी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून स्टीम सप्ताह २६ एप्रिल ते २ मे दरम्यान राबविण्यात येत आहे. या कालावधीत व त्यानंतरही सर्वांनी वाफ घेऊन स्टीम सप्ताह यशस्वी करावा. प्रत्येक घरातून साथीचा कायमचा समूळ नायनाट करण्याचा प्रयत्न ‘स्टीम सप्ताह’ राबवून करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सर्व तालुका प्रशासनांकडूनही विविध गावांमध्ये सप्ताहानिमित्त उपक्रम राबविण्यात येत आहेत. ऑनलाईन व्यासपीठांचा वापर करूनही सप्ताहाबाबत जनजागृतीचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.