शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

जिल्ह्यातील तूर खरेदी केंद्र तातडीने सुरू करा

By admin | Updated: March 1, 2017 00:07 IST

शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या तुरीला हमीभाव मिळण्यासाठी खरेदी केंद्रावर स्वतंत्र केंद्र उभारावे.

पत्रपरिषद : प्रवीण पोटे यांचे आदेशअमरावती : शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या तुरीला हमीभाव मिळण्यासाठी खरेदी केंद्रावर स्वतंत्र केंद्र उभारावे. अधिक मनुष्यबळाचा उपयोग करून प्रत्येक दिवसाला हजार क्विंटल तूर खरेदी करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले.जिल्ह्यात तीन लाख हेक्टर क्षेत्रांवर तुरीचा पेरा झाला आहे. त्यामुळे सुमारे ३० लाख क्विंटल तुरीचे उत्पादन होणार आहे. ही बाब लक्षात घेता नाफेड व बाजार समितीच्या केंद्राने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी तूर खरेदीसाठी स्वतंत्र खरेदी केंद्रे उभारावीत. दररोज एक हजार क्विंटल तूर खरेदी होईल या बेताने व्यवस्था करण्यात यावी. तूर डाळ भरण्यासाठी बारदान्याची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासकीय यंत्रणेला दिल्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे म्हणाले.तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून व्यापारी लोक कमी दरात तूर खरेदी करून जास्त दराने तूर विकत आहे. अशामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होऊन व्यापाऱ्यांना अधिक लाभ होत आहे. कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला तुरीचा हमीभाव मिळावा म्हणून शासनाने प्रयत्न केले. शेतकऱ्यांना शेतमाल मोजण्यासाठी १० ते २० दिवस थांबावे लागत आहे. यासाठी खरेदी केंद्राने अधिक प्रमाणात वजन काटे उपलब्ध करावीत. खरेदी केंद्रात अडचण अथवा साधनसामग्रीची गरज भासल्यास जिल्हा प्रशासनाला कळवावे, असेही पोटे यांनी सांगितले. यावर्षीच्या जलयुक्त शिवार योजनेत २५० गावांची निवड केली जाणार आहे. पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्यास ही तातडीने सोडविण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी स्पष्ट केले. यावेळी पत्रपरिषदेला आमदार अनिल बोंडे, जिल्हाधिकारी किरण गित्ते, महसूल व जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते.पाणीटंचाई निवारणार्थ खबरदारीराज्य शासनाने जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारणार्थ सुमारे २० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.यासाठी जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाक डून केवळ ८ कोटी ७८ लाख रूपयांची मागणी आली असल्याचे पालकमंत्री पोटे यांनी केली आहे. सध्या जिल्हाभरात कुठेही पाणीटंचाई नाही. मात्र चिखलदरा तालुक्यात काही गावांमध्ये टँकरद्वारा पाणीपुरवठा करावी लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणेला खबरदारी बाळण्याची सुचना दिल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. मेळघाटात काही ठिकाणी विजेची समस्या होती. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या पुढाकराने मध्यप्रदेशातून वीजपुरवठा उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे २२० केव्ही वीज केंद्राच्या माध्यमातून विजेची समस्या बऱ्यापैकी निवळली आहे. ज्याठिकाणी पाणीपुरवठा योजनेची देयके थकीत आहेत, ती देयके भरण्यासाठी निधी नाही. यासाठी सोलरपंपच्या माध्यमातून आवश्यक त्या ठिकाणी उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)-हा तर बाबासाहेबांचा अपमानलोकशाहीत मतदानाचा अधिकार भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिला आहे.परंतु महापालिका निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये गडबड असल्याचा आरोप करणाऱ्यांकडून बाबासाहेबांचा अपमान केला जात आहे. मतदान यंत्रात गडबड करता आली असती तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीतही 'कमळ' उगवले असते, असे ना. पोटे म्हणाले. याप्रकाराची चौकशी केल्यास ती जिल्हा परिषदेतूनच सुरू करावी लागेल, असे पालकमंत्री पोटे यांनी निक्षून सांगितले.