शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

अवैध दारू विक्रीचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2017 00:12 IST

महामार्गावरील दारूबंदीच्या निर्णयानंतर मद्यपींनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला आहे.

पोलिसांचे दुर्लक्ष : दारूबंदीनंतरची परिस्थिती, नागरिकांचे जीवन विस्कळीत लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : महामार्गावरील दारूबंदीच्या निर्णयानंतर मद्यपींनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात दारूचा महापूर आला असून यामुळे नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. मोर्शी शहरातील हायवेपासून ५०० मीटरच्या आत असलेले दारू व वाईनशॉपच्या दुकानांना सील करून बंद करण्यात आले. या ठिकाणी केवळ पेठपुरा परिसरातील एकच देशी दारूचे दुकान सुरू असल्याने या ठिकाणी दारू पिणाऱ्यांची दररोज तोबागर्दी दिसत आहे. मोर्शीलगतच असलेल्या पार्डी गावात अवैध दारू विकणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. या ठिकाणी अवैध देशी दारूचा साठा मोठ्या प्रमाणात छुप्या मार्गाने जात असून गावात खुलेआम दारूची विक्री होत आहे. दारू पिणाऱ्यांच्या भीतीमुळे घरातील महिलांना व शाळकरी मुलींना रस्त्यावरून ये-जा करणे कठीण झाले आहे. मात्र, पोलीस प्रशासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. मोर्शी व आजूबाजूच्या खेड्यांतील दारू शौकिनांचे जत्थेच्या जत्थे पार्डी गावात दाखल होऊन येथेच दारू ढोसून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून तमाशे करीत असल्याने सामान्य नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पार्डी गावात अवैध देशी दारू साठा कोठून उपलब्ध होत आहे, याचा शोध पोलीस प्रशासनाने घेऊन अवैध देशी दारू विक्रीला त्वरित आळा घालावा, अन्यथा या ठिकाणी मोठा उद्रेक होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. ५५ रुपयांची पावटी १५० रुपयांतटाकरखेडा संभू : महामार्गावरील दारूबंदीमुळे ग्रामीण भागात दारूचा महापूर आला आहे. शहरी भागातील पाऊले ग्रामीणकडे वळत असून या संधीचा फायदा घेत ५५ रुपयांची पावटी थेट शंभर ते १५० रुपयांत विक्री केली जात आहे. गावात लग्न समारंभ असल्यास यापेक्षाही जास्त दराने दारूविक्री होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, दारूबंदी असलेल्या टाकरखेडा संभू, रामा, जळका, हिरापूर, साऊर, आष्टी, पुसदा, वलगाव व कामनापूरमध्ये सर्वाधिक दारू विक्री केली जात आहे. टाकरखेडा संभू परिसरातील पुसदा, साऊर, आष्टी, वलगाव व शिराळा येथील दारूची दुकाने बंद झाल्याने गावात नागरिकांसह महिलांनी आनंदोत्सव साजरा केला. परंतु, दारू बंदीनंतर येथे आधीपेक्षाही अधिक अवैध दारू विक्री सुरू झाली. यामुळे गावकरी आणि महिलांमध्ये निराशा व्यक्त होत आहे.