शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
3
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
4
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
5
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
6
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
7
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
8
जातगणना : मॅजिक की मंडल?
9
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
10
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
11
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
12
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
13
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
14
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
15
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
16
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
17
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
18
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
19
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
20
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा

कर्जमाफीच्या चर्चेत तूर केंद्रांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: June 17, 2017 00:02 IST

जिल्ह्यासह राज्यात रविवारपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी श्रेयवादाची चर्चा रंगली असताना तूर खरेदी केंद्रांकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे.

सहा दिवसांपासून केंद्र बंद : पेरणीच्या तोंडावर शेतकरी अडचणीतलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यासह राज्यात रविवारपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी श्रेयवादाची चर्चा रंगली असताना तूर खरेदी केंद्रांकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. १० जूनपासून जिल्ह्यातील बाराही केंद्रांवर तूर खरेदी बंद आहे. केवळ बाजार समितीमध्ये नोंद केलेली तूर खरेदी करण्यात आली. अद्याप टोकन दिलेली परंतु १८,६४५ शेतकऱ्यांच्या घरात असलेली चार लाख १६ हजार ७९ क्विंटल तूर खरेदी बाकी आहे. सलग सहाव्या दिवशीही खरेदी केंद्र बंदच असल्याने मुदतवाढ केव्हा, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.केंद्र शासनाने जिल्ह्यासह राज्यातील तूर खरेदी केंद्रांना १० जूनपर्यंत १५ हजार मेट्रिक टन तूर खरेदी करण्याची परवानगी दिली. या मुदतीत प्रथम बाजार समितीतील उघड्यावरील तूर खरेदी करण्याची अट घातली. त्यामुळे खरेदी यंत्रणा असलेल्या डीएमओव्दारा ही तूर खरेदी करण्यात आली. सद्यस्थितीत जिल्ह्यातील सर्वच केंद्रावर तुरीची मोजणी संपली. मात्र, टोकन दिलेल्या तुरीची खरेदी करण्यात आली नाही.सध्या मृगाच्या पावसाला सुरूवात झाली आहे. शेतशिवारात पेरणीपूर्व कामांची लगबग वाढली आहे.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी करावी, की तूर मोजणीसाठी केंद्रावर जावे, हा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच नांदगाव खंडेश्वर व धारणी केंद्रावर टीन शेडची सुविधा नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडणार आहे. शासनाने केंद्राला त्वरीत मुदतवाढ देऊन शेतकऱ्यांकडील नोंद झालेल्या तुरीची खरेदी करावी, अशी मागणी होत आहे.तालुकानिहाय बाकी असलेली तूर खरेदी सद्यस्थितीत अचलपूर केंद्रावर १,७९५ शेतकऱ्यांची ३७,१५२ क्विंटल, अमरावती ३,६५० शेतकऱ्यांची १,०२,४६९, अंजनगाव सुर्जीला २,१४० शेतकऱ्यांची ३५,६०७, चांदूरबाजारला १,२३३ शेतकऱ्यांची २३,५११, चांदूररेल्वेला १,७६९ शेतकऱ्यांची ३३,९७२, दर्यापूरला २,७३८ शेतकऱ्यांची ७४,०५६, धामणगावला ३३३ शेतकऱ्यांची ११,५७३, धारणीला ८४ शेतकऱ्यांची १,१६४, मोर्शीला १,९१५ शेतकऱ्यांची ३४,३४५, नांदगाव खंडेश्वरला १,७९२ शेतकऱ्यांची ९२३ शेतकऱ्यांची २१,१५३ व वरूड केंद्रावर २६४ शेतकऱ्यांची २,१४४ टोकन दिलेल्या तुरीची खरेदी व मोजणी बाकी आहे.सर्वच केंद्रांवर ३१ मेपर्यंत नोंद झालेली व टोकन दिलेली तूर खरेदी करण्यात आली आहे. अद्याप मुदतवाढीचा आदेश नाही. पावसाळ्यामुळे टप्प्याटप्प्यात तुरीची खरेदी होण्याची शक्यता आहे.- गौतम वालदेजिल्हा उपनिबंधक