शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

पुसल्याच्या आरोग्य उपकेंद्राकडे दुर्लक्षच

By admin | Updated: July 29, 2016 00:27 IST

स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येथील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराला नागरीक कंटाळले आहे.

साथरोग : रूग्णांची हेळसांड, नागरिक त्रस्त वरुड /पुसला : स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येथील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराला नागरीक कंटाळले आहे.साथरोगाचा प्रसार होत असून डायरीया, जलजन्य आजार बळावले असताना येथील वैद्यकीय अधिकारऱ्यांनी एकाही आरोग्य उपकेंद्राला भेट दिली नाही. त्यामुळे नागरिकांना उपचार मिळत नाही. दुपारची बाह्यरुग्ण विभागसुध्दा कर्मचारीच सांभाळत असल्याचे सांगण्यात येते. मुख्यालयापासून ३५ ते ४० किमी अंतरावर डोंगराळ भागात हि गांवे असल्याने आरोग्य सेवा मिळत नसल्याची ओरड नागरिकांमध्ये आहे. पुसला हे गाव सातपुड्याच्या कुशीत वरुड पांढूर्णा राज्यमहामार्गावर असून गावाची लोकसंख्या १६ हजारांपेक्षा अधिक असून या पुसला सर्कलअंतर्गत अनेक आदिवासी गावांचा समावेश आहे. दुपारचा बाह्यरुग्ण विभागात कर्मचारी तपासणी करीत असल्याची खमंग चर्चा आहे. यामध्ये पुसला, लिंगा, कारली, पिपलागढ, जामगांव, महेंद्री, वाई, जामठी, उराड, लोहदरा, एकलविहीर, सावंगी, गणेशपूर धनोडी, मालखेड, करवार सह आदी गावाचा समावेश आहे. पुसला हा आदिवासीबहूल परिसर आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रांंतर्गत २३ हजार लोंकसंख्या आहे. असल्याने पुसला येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून पुसला आणि लिंगा उपकेंद्रसुध्दा आहे. दोन डॉक्टरासह आरोंग्य कर्मचाऱ्याच्या नियुक्ती असून निवासी आहे.कर्मचारी निवासी राहतात मात्र वैद्यकीय अधिकारीच मनामनी कारभार करीत असल्याची चर्चार् आहे. वैद्यकीय अधिकारी राहुल भुतडा मुख्यालयी राहत नसल्याने रात्री बेरात्रीअपघात घडल्यास किंवा गंभीर आजारी झाल्यास मिळेल त्या साधनाने रुग्णांना सरळ वरुडच्या ग्रामीण रुग्णालयात धाव घ्यावी लागते. पावसाळा सुरू असल्याने जलजन्य आजार तसेच साथीचे आजाराचा प्रकोप असतांना वैद्यकीय अधिकाऱ्यांचह कामचुकारपणा होत असल्याने रुग्ण त्रस्त आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याचे निवासस्थान भकास पडले असून येथील विद्युत पुरवठासुध्दा खंडित करून घेतल्याचे असल्याचे सांगण्यात येते. दिवसागणिक १५० ते २०० रुग्ण ग्रामीण डोंगराळ भागातून उपचाराकरिता आले असता तपासणीकरीता डॉक्टर उपस्थित राहत नाही. हि शोकांतिका आहे. प्रसुत महिला, सर्पदंश, डायरिया, मलेरिया, तसेच तापाने फणफणत असलेल्या रुग्णांना वरुडला येऊनच उपचार घ्यावे लागते. शासनाच्या पैशाचा दुरुपयोग हासेत असनू नागरिकांना आरोग्य सेवा मिळत नसल्याचीही चर्चा आहे. डॉक्टरांंच्या हेकेखारीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. येथे घाणीचेसुद्धा साम्राज्य पसरले आहे. याबाबत अनेकवेळा तक्रारी करून जिल्हा आरोग्य विभाग सुस्त असल्याने न्याय कुणाला मागावा, हा प्रश्न आहे.