शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

शेतकऱ्यांच्या विरोधात बोलाल तर तोंड फोडू!

By admin | Updated: July 20, 2016 00:11 IST

पीक विम्याचे पैसे बँकेचे अधिकारी परस्पर शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जात जमा करतात, ...

शिवसैनिक आक्रमक : तलाठ्याला धरले धारेवरदर्यापूर : पीक विम्याचे पैसे बँकेचे अधिकारी परस्पर शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जात जमा करतात, या मुद्यावर चर्चा सुरू असताना एका तलाठ्याने शिवसैनिकांशी वाद घातला. या कारणावरून शिवसैनिक संतप्त झाले. शेतकऱ्यांच्या विरोधात बोलाल तर तोंड फोडू असे म्हणताच तहसील कार्यालयात काहीवेळ वातावरण तापले होते. दर्यापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे हजारो हेक्टरचे नुकसान झाले आहे. पंतप्रधान विमा योजनेची मंगळवारी तहसील कार्यालयात बैठक होती. यासाठी सर्व राष्ट्रीयीकृत बँकेच्या अधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले होते. बैठक संपल्यानंतर शिवसेनेचे दर्यापूर तालुका प्रमुख सुनील डिसे, बाजार समितीचे संचालक गोपाल अरबट, सतीश साखरे, दिलीप राहाटे, प्रवीण बायस्कार व इतर शिवसैनिकांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शिवसैनिकांनी २०१५-१६ चे पीक विम्याचे शेतकऱ्यांच्या खात्यात आलेले पैसे बँकांनी शेतकऱ्यांकडे असलेल्या कर्ज भरण्यात परस्पर जमा करू नये, ही चर्चा सुरू असताना वडनेर गंगाईचे तलाठी शरद दयालकर यांनी चर्चेत भाग घेऊन आपण शेतकऱ्यांना जनजागृती का केली नाही, असा उलट प्रश्न केला. यावर सर्व शिवसैनिक संतप्त होऊन आपण शेतकऱ्यांची थट्टा करता तर शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात बोलाल तर तोंड फोडू असे सुनील डिके यांना म्हणताच येथील वातावरण अचानक तापले. तहसीलदार राहूल तायडे व तालुका कृषी अधिकारी विनोद लंगोटे यांनी मध्यस्थी करून शिवसैनिकांना शांत केले. बँकेच्या अधिकाऱ्यांनाही यावेळी त्यांच्या कामकाजावरुन धारेवर धरण्यात आले. या प्रकरणाची तहसील कार्यालयात उशिरापर्यत चर्चा सुरु होती. (प्रतिनिधी)