शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

किल्ल्यांचे संवर्धन करणार नसाल तर संभाजी छत्रपतींशी गाठ

By admin | Updated: April 24, 2016 00:01 IST

छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचे संवर्धन करणार नसाल तर संभाजी छत्रपतींशी गाठ आहे, हे याद राखा, असा सणसणीत इशारा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज

छत्रपती संभाजी राजेंचा शासनाला इशारा : श्री शिवशाही महोत्सवाचे थाटात उद्घाटन अमरावती : छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचे संवर्धन करणार नसाल तर संभाजी छत्रपतींशी गाठ आहे, हे याद राखा, असा सणसणीत इशारा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी राजे भोसले यांनी येथे शासनाला उद्देशून दिला. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शनिवारी सायंकाळी शिवसह्यांद्री प्रतिष्ठानाच्यावतीने आयोजित केलेल्या श्री शिवशाही महोत्सवाचे संभाजी राजेंच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आ. श्रीकांत देशपांडे, आ. यशोमती ठाकूर, माजी आमदार संजय बंड, कोल्हापूरचे गिरीश जाधव, स्मिता देशमुख, शिवराय कुळकर्णी, वैभव वानखडे, बाजार समितीचे उपसभापती किशोर चांगोले यांची उपस्थिती होती. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८६ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने यंदा अमरावतीत प्रथमच शिवशाही महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल संभाजी राजांनी आयोजकांचे भरभरुन कौतुक केले. पक्षभेद विसरुन शिवविचारांच्या या सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी आमदार ठाकूर आणि आमदार देशपांडे यांचेही कौतुक केले.शिक्षणामध्ये शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाची पोपटपंची नको, त्यांच्या गडकिल्ल्यांमधून खरा इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहचू शकतो. मात्र शिक्षणप्रणालीमध्ये ते संकुचितरित्या लिहिले जाते. शिक्षणप्रणालीसह सरकारही यासाठी दोषी आहे. महाराजांच्या नावाचा राजकीय वापर करुन येथे प्रत्येक जण आपापली पोळी शेकतो. स्वराज्य हे सुराज्य व्हावे, हा महाराजांचा मूलमंत्र आपण विसरलोय. आमदारांना सुशिक्षित कराअमरावती : मी त्यांच्या विचारांचा वारस आहे. खरे शिवभक्त हुडकून काढण्यासाठी बाहेर पडलोय. गोवा आणि सिंधुदुर्गचे बिच पाहण्याऐवजी शिवकालिन किल्ल्यांना भेट द्या, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्रातील ६०० किल्ल्यांचे संवर्धन शक्य नसेल तर केवळ पाच मॉडेल फोर्ट निवडून त्याचे संवर्धन करण्याची सूचना आपण राज्य शासनाला केली असल्याचे राजे म्हणाले. पैसे कुठून उभारायचा, असा सवाल शासनाने केला. ज्यांनी लढायाच लढल्या नाहीत, अशा राजस्थानातील अनेक किल्ल्यांच्या संवर्धनासाठी तेथील सरकार पैसे उभारते ना? तेच महाराष्ट्राला का जमू शकत नाही? तुम्हाला जमत नसेल तर स्पष्ट सांगा. आम्ही शिवभक्त कमी नाही. आम्ही करु गडांचे संवर्धन, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी आमदार यशोमती ठाकूर आणि आमदार श्रीकांत देशपांडे यांनी छत्रपती संभाजी राजांच्या उपस्थितीने आम्हीच नव्हे तर सभागृह शहारल्याची प्रतिक्रिया दिली. शिवराय कुळकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले. शिवकालिन शस्त्रांचे अभ्यासक आणि संकलन गिरीश जाधव यांचा छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आमदारांना सुशिक्षित केले पाहिजे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला त्यांनी पायदळ उपस्थिती लावली पाहीजे. कॅबिनेटची एक बैठक राज्याच्या राजधानीत रायगडावर व्हायला हवी, असे मत संभाजी राजांनी व्यक्त केले.व्यासपिठावर यावेळी पंचायत समितीचे सभापती आशीष धर्माळे, बाजार समितीचे संचालक शाम देशमुख, उमेश घुरडे, नगरसेवक दिनेश बूब तथा आयोजक भूषण फरतोडे यांची उपस्थिती होती. शिवशाही महोत्सवाचा हा पहिला-वहिल्या कार्यक्रमाला अमरावतीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. संचालन क्षिप्रा मानकर, प्रास्ताविक भूषण फरतोडे आणि परिचय गजानन देशमुख यांनी करून दिला. राहुल पाटील ढोक यांनी व्यासपीठावरून छत्रपती शिवरायांचा जयघोष केला.