शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

तर बँक अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

By admin | Updated: June 13, 2016 23:58 IST

दुष्काळामुळे विदर्भातील शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. शेतकऱ्यांना पीककर्जासहित पुनर्गठनाचा लाभ देण्यात येत आहे.

आढावा बैठक : प्रवीण पोटे यांचा इशारांअमरावती : दुष्काळामुळे विदर्भातील शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. शेतकऱ्यांना पीककर्जासहित पुनर्गठनाचा लाभ देण्यात येत आहे. मात्र, बँकांच्या पिळवणुकीमुळे एखाद्या शेतकऱ्यांने आत्महत्या केल्यास बँक अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करु, असा इशारा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिला.नागपूर येथे जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात सोमवारी पार पडलेल्या विदर्भातील महसूल आणि सहकार विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. विदर्भातील एकही शेतकरी पीककर्ज, व पुनर्गठनाच्या लाभापासून वंचित राहू नये, याकरिता सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश ना. पोटे यांनी दिले. नागपूर, अमरावती विभागातील पीककर्ज, सन २०१६-१७ वर्षातील खरीप हंगामातील पीककर्जाचे पुनर्गठन, पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ करण्याचे ठरविण्यात आले आहे. ना. पोटे यांनी बँक अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर पालकमंत्र्यांनी बोट ठेवले. बँक अधिकारी शेतकऱ्यांना चांगली वागणूक देत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. वेळीच सुधारणा न झाल्यास अशा बँकांवर शासन कारवाई करेल, असे ते म्हणाले. सततच्या नापिकीने शेतकरी हवालदिल झाला असून तो बँकेत पीककर्जासाठी आल्यास आवश्यक कागदपत्रांची यादी बँकेच्या दर्शनी भागात लावण्यात यावी, शेतकऱ्यांचा भावना समजून घेऊन त्यांना दिलासा द्यावा. बँक अधिकाऱ्यांनी पीककर्ज, कर्ज पुर्नगठनास पात्र शेतकऱ्यांना हेलपाटे मारावयास लावले आणि त्रस्त होऊन शेतकऱ्याने आत्महत्या केल्यास थेट बँकेच्या व्यवस्थापकाविरुद्ध शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले जातील, असा खणखणीत इशारा ना. पोटे यांनी दिला. अमरावती विभागात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीककर्जाचे मोठ्या प्रमाणात वितरण करण्यात आले आहे. सहकारी बँका अतिशय उत्तम काम करीत असताना राष्ट्रीयीकृत बँकांची कामगिरी समाधानकारक नसल्याचे शल्य पालकमंत्र्यांनी बोलून दाखविले. राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून शेतकऱ्यांंनी मोठ्या प्रमाणात पीककर्जाचा लाभ घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. त्याचप्रमाणे सहकार विभागाने पीककर्ज पुर्नगठनाचा वेग वाढविण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. बैठकीला सहकार राज्यमंत्री दादासाहेब भुसे, नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, विभागीय सहनिबंधक प्रवीण वानखडे, अमरावतीचे उपनिबंधक गौतम वाल्दे, नागपूर व अमरावतीचे जिल्हा उपनिबंधक, जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक उपस्थित होते. (प्रतिनिधी)अमरावती विभागात १ हजार ७६८ कोटींचा लक्ष्यांकअमरावती विभागात तीन हजार शेतकऱ्यांनी पीककर्ज, कर्ज पुर्नगठनासाठी अर्ज सादर केले आहेत. मात्र, अशा शेतकऱ्यांना बँकांनी अजुनही पीककर्ज मंजूर केले नाही, असे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सांगितले. अमरावती विभागाचा १ हजार ७६८ कोटींचा लक्ष्यांक असून आतापर्यंत ८१९ कोटी रुपयांंचे कर्जवाटप करण्यात आल्याचे ते म्हणाले. राज्यात कलम ४४ ची अंमलबजावणी करा- दादासाहेब भुसेराज्यात कलम ४४ ची अंलमबजावणी व्यवस्थितरीत्या होते किंवा नाही, याची खात्री पटविण्यासाठी नागपूर विभागातील १९८२ सहकारी संस्थांची बी- कलम ८९ (अ) अंतर्गत तपासणी करण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतल्याचे सहकार राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांनी सांगितले. एखाद्या शेतकऱ्याने एक लाख रुपये कर्ज घेऊन त्यापोटी जर त्याने तीन लाख रुपयांची परतफेड करूनही त्याच्या खात्यावर कर्जापोटी तेवढीच रक्कम शिल्लक राहते, हे योग्य नसल्याचे ना. भुसे म्हणाले.